पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात ९३ टक्क्यांपेक्षा जास्त मतदान

नवी दिल्ली : पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या २९४ जागांपैकी १५२ जागांसाठी पहिल्या टप्प्यात २३ एप्रिल २०२६ रोजी मतदान झाले. या टप्प्यात ९३.१९ टक्के असे ऐतिहासिक मतदान झाले. उर्वरित १४२ जागांसाठी दुसऱ्या टप्प्यात २९ एप्रिल २०२६ रोजी मतदान होणार आहे. मतमोजणी ४ मे रोजी आहे.


पहिल्या टप्प्यात विक्रमी मतदान झाल्यामुळे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची धाकधूक वाढली आहे. झालेले मतदान सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या बाजूने आहे की विरोधात यावरून चर्चेला उधाण आले आहे.


पश्चिम बंगालमध्ये १९७७ ते २०११ या ३४ वर्षांच्या कालावधीत साम्यवादी विचारांच्या अर्थात कम्युनिस्ट विचारांच्या पक्षांचीच म्हणजेच डाव्यांची सत्ता होती. यानंतर तृणमूल काँग्रेस सत्तेत आली आणि ममता बॅनर्जी मुख्यमंत्री झाल्या. ममता बॅनर्जी २० मे २०११ पासून पश्चिम बंगालमध्ये सत्तेवर आहेत. या सरकार विरोधात भारतीय जनता पार्टी मैदानात उतरली आहे. वारंवार प्रयत्न करूनही भाजपला तृणमूलचा पराभव करणे जमले नाही. पण यंदाच्या विधानसभा निवडणुकीत पहिल्याच टप्प्यात विक्रमी मतदान झाल्यामुळे भाजपला जिंकण्याची आशा वाटू लागली आहे.


याआधी ९ एप्रिल रोजी आसाम, केरळ आणि पुदुचेरीमध्येही विक्रमी मतदान झाले. आसामध्ये ८५.९१ टक्के, पुदुचेरीमध्ये ९० टक्के आणि केरळमध्ये १९८७ नंतरचे सर्वाधिक ७८.२७ टक्के मतदान झाले. तसेच २३ एप्रिल रोजी तामिळनाडूमध्ये सर्व २३४ जागांवर एकाच टप्प्यात विक्रमी ८४.६९ टक्के मतदान झाले. तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये इतिहासात प्रथमच सर्वाधिक मतदान झाले. पाचही राज्यांमधील विधानसभा निवडणुकांचे निकाल ४ मे रोजी एकाच वेळी जाहीर केले जातील.


पाचही राज्यांमधील विधानसभा निवडणुकांचे निकाल ४ मे रोजी एकाच वेळी जाहीर केले जातील. यामुळे पाचही राज्यांमध्ये तिथले सरकार सत्ता टिकवणार की सत्तांतर होणार याकडे अनेकांचे लक्ष आहे.

Comments
Add Comment

Football fever in Kolhapur : क्रिकेटच्या देशात फुटबॉलचा थरार; अर्जेंटिनाच्या विजयाने कोल्हापूर झाले 'फुटबॉलमय'!

Kolhapur : भारत हा तसा क्रिकेटवेडा देश, पण कोल्हापूरची गोष्टच न्यारी आहे! 'सॉकर सिटी' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या

Murshidabad Train Accident : मुर्शिदाबादमध्ये भीषण अपघात! ट्रेन-स्कूल व्हॅनच्या धडकेत ३ विद्यार्थ्यांचा मृत्यू

मुर्शिदाबाद : पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद (Murshidabad) जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी भीषण रेल्वे अपघात (Train Accident) झाला.

FIFA WORLDCUP 2026 : अर्जेंटिनाच्या टीकाकारांना मेस्सीचे चोख उत्तर: 'आम्हाला काहीही आयते मिळालेले नाही'

लिओनेल मेस्सीने अर्जेंटिनाच्या विश्वचषक प्रवासावर टीका करणाऱ्यांना खडे बोल सुनावले आहेत. "आम्हाला काहीही फुकट

Major Cricket League : एका सामन्यात ३ शतकं, ५१ सिक्स अन् ५३७ रन; क्रिकेटच्या इतिहासात लिहिला गेला नवा अध्याय

मुंबई : टी-२० क्रिकेटच्या इतिहासात असा सामना पाहायला मिळाला, ज्याने या फॉरमॅटमधील (Format) जवळपास सगळे मोठे विक्रम (Records)

ICC : वर्ल्ड कपमध्ये आयसीसीचा ‘मास्टर प्लॅन’? भारत-पाक सामन्यांसाठी मोठा बदल

मुंबई : क्रिकेट विश्वातील सर्वात चर्चेचा विषय ठरलेला भारत-पाकिस्तान सामना पुन्हा एकदा केंद्रस्थानी आला आहे.

BMC : धारावी, काळा किल्ला बेस्ट बस आगाराची जागा धारावी विकास प्रकल्पासाठीसाठी हस्तांतरीत

महापालिका सभागृहात बहुमताने प्रस्ताव मंजूर मुंबई : धारावी (Dharavi) बस डेपोची जागा पीपीपी तत्त्वावर धारावी विकास