केंद्र सरकारच्या iGOT–‘Sadhana Saptah 2026’ मध्ये महाराष्ट्र अव्वल

मुंबई : केंद्र सरकारच्या ‘मिशन कर्मयोगी’ अंतर्गत आयोजित ‘साधना सप्ताह २०२६ मध्ये राज्याने देशात प्रथम क्रमांक पटकावत नवा मानदंड प्रस्थापित केला असून या अध्ययन सप्ताहात उत्स्फूर्त सहभाग नोंदवत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील या उपक्रमात सहभागी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करत, या सर्वांच्या प्रयत्नाचे कौतुक केले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्ञानोपासना, क्षमताविकास आणि उत्तम सार्वजनिक सेवा देण्याच्या दृष्टीने मिशन कर्मयोगी हे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी आणि सातत्यपूर्ण मार्गदर्शन आणि पाठबळ उपलब्ध करून दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचेही आभार मानले आहेत.

महाराष्ट्रातील अधिकारी- कर्मचाऱ्यांनी ‘आयगॉट कर्मयोगी’ प्लॅटफॉर्मवर एकूण ४६ लाख ९४ हजार ५९७ अभ्यासक्रम पूर्ण करत ६ लाख ५९ हजार ७५९ एआय-विशिष्ट प्रमाणपत्रे प्राप्त केली आहेत. हे आधुनिक सुशासन आणि क्षमता विकासाबाबत राज्याच्या दृढ वचनबद्धतेचे द्योतक, असल्याचे मुख्यमंत्री यांनी म्हटले आहे.

देशभरातील सुमारे ३३ लाख ४ हजार शासकीय अधिकारी- कर्मचाऱ्यांनी ‘साधना सप्ताहा’त सहभाग घेत ‘iGOT कर्मयोगी’ प्लॅटफॉर्मवर सुमारे चार तासांचा अभ्यासक्रम पूर्ण केला. यामध्ये राज्यातील ५ लाखांहून अधिक अधिकारी - कर्मचारी सहभागी झाले होते. या उपक्रमात महाराष्ट्राने केलेली कामगिरी ही राज्याच्या प्रशासनिक कार्यक्षमतेचा उत्कृष्ट नमुना असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.
Comments
Add Comment

Mumbai Watermelon Death Case : मुंबईतील ‘कलिंगड डेथ केस’मध्ये मोठा ट्विस्ट; फॉरेन्सिक अहवालातून धक्कादायक सत्य समोर

मुंबई : मुंबईतील पायधुनी परिसरात घडलेल्या डोकाडिया कुटुंबाच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात आता सर्वात मोठा आणि

Mumbai Rain : उकाड्याने हैराण मुंबईकरांना दिलासा; मुंबईत ५ जूनपूर्वीच पावसाचे आगमन होण्याची शक्यता!

मुंबई : मुंबईकरांनो, आता छत्र्या आणि रेनकोट तयार ठेवा! प्रचंड उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांसाठी अखेर

आयएएस तुकाराम मुंढे आता मंत्री झिरवळ यांच्या विभागात

२१ वर्षांच्या कार्यकाळात २५वी बदली; अन्न आणि औषध प्रशासन विभागाचा कारभार स्वीकारणार मुंबई : आपल्या कडक

मुंबईला जलमुक्त करण्यासाठी महापालिकेचा मास्टर प्लॅन

मुंबई : मुंबई महानगराची भौगोलिक रचना लक्षात घेता सखल भागांमध्ये साचणाऱ्या पावसाच्या पाण्याचा जलद आणि

आर्थिक संकटातील बेस्टची मदतीसाठी राज्य-केंद्राकडे धाव

मुंबई : बेस्टच्या सन २०२६-२७ च्या अर्थसंकल्पीय अंदाजामध्ये सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या थकीत उपदान (ग्रॅच्युटी)

संपूर्ण कोकणाला जलवाहतुकीने जोडणार

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; येत्या ३ वर्षांत मुंबई-महानगरात २७ जेट्टी कार्यान्वित करणार मुंबई : "मुंबई महानगर