मे महिन्याच्या सुट्टीत भरणार गुरुजींची ‘शाळा’

नवशिक्षण धोरणाच्या अंमलबजावणीसाठी विशेष प्रशिक्षण; दुसरी ते चौथीच्या शिक्षकांना उपस्थिती बंधनकारक


मुंबई : उन्हाळ्याची प्रदीर्घ सुट्टी म्हणजे शिक्षकांसाठी हक्काच्या विश्रांतीचा आणि पर्यटनाचा काळ. मात्र, यंदा शिक्षकांच्या या सुट्टीवर विरजण पडण्याची चिन्हे आहेत. आगामी शैक्षणिक वर्षापासून लागू होणाऱ्या नव्या अभ्यासक्रमाचे धडे गिरवण्यासाठी शिक्षकांना मे महिन्याच्या रणरणत्या उन्हात प्रशिक्षणाला सामोरे जावे लागणार असून, पर्यायाने यंदा गुरुजींची 'शाळा' सुट्टीतच भरणार आहे.



राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने (एससीईआरटी) हे पाऊल उचलले आहे. शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून इयत्ता दुसरी, तिसरी आणि चौथीचा नवा अभ्यासक्रम लागू होत आहे. या अभ्यासक्रमाची व्याप्ती आणि शिकवण्याच्या नव्या पद्धती समजून घेण्यासाठी ४ मेपासून राज्यभर प्रशिक्षण वर्गांचे आयोजन करण्यात आले आहे. १५ जून रोजी शाळांची घंटा वाजण्यापूर्वी सर्व शिक्षकांचे प्रशिक्षण पूर्ण करण्याचे उद्दिष्ट शिक्षण विभागाने ठेवले आहे. 'एससीईआरटी'च्या सहसंचालिका डॉ. कमलादेवी आवटे यांनी यासंदर्भात परिपत्रक काढून प्रशिक्षणाला उपस्थित राहणे बंधनकारक असल्याचे स्पष्ट केले आहे.


हे प्रशिक्षण राज्य, जिल्हा आणि तालुका अशा तीन टप्प्यांत पार पडणार आहे. राज्यस्तरावर ४ ते ७ मे दरम्यान मराठी आणि उर्दू माध्यमाच्या शिक्षकांसाठी पहिले सत्र होईल. पुढे ११ ते १४ मे दरम्यान जिल्हा स्तरावर प्रशिक्षण दिले जाईल. त्यानंतर १८ ते ३० मे या शेवटच्या टप्प्यात तालुका स्तरावर शिक्षकांना प्रशिक्षित केले जाईल. विनाअनुदानित आणि स्वयंअर्थसाहाय्यित शाळांतील शिक्षकांसाठीही हे प्रशिक्षण खुले ठेवण्यात आले आहे. मात्र, या शाळांमधील शिक्षकांच्या प्रशिक्षणासाठी शासनाकडून कोणतीही आर्थिक तरतूद केली जाणार नाही, असे परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे. परिणामी, अशा शाळांना आपल्या शिक्षकांसाठी स्वतंत्र व्यवस्था करावी लागणार आहे. इयत्ता सहावीच्या प्रशिक्षणाबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नसून, त्याबाबतच्या सूचना नंतर दिल्या जातील, असे 'एससीईआरटी'ने स्पष्ट केले आहे.



प्रशिक्षकांची फौज तयार होणार


राज्यस्तरावरील प्रशिक्षणासाठी तज्ज्ञ प्रशिक्षकांची फौज तयार केली जात आहे. प्रादेशिक विद्या प्राधिकरण आणि जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थांना (डाएट) २० एप्रिलपर्यंत पात्र प्रशिक्षकांची नावे सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हे प्रशिक्षक पुढे जिल्हा आणि तालुका स्तरावर शिक्षकांना मार्गदर्शन करतील. इयत्ता दुसरीसाठी ३ दिवस, तर तिसरी-चौथीसाठी ४ दिवसांचे प्रशिक्षण असेल. १५ जून २०२६ पूर्वी सर्व प्रशिक्षण पूर्ण करणे अनिवार्य आहे.

Comments
Add Comment

Devendra Fadnavis : आता शाळेत मिळणार 'ड्रग्ज'च्या दुष्परिणामांचे धडे

मख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश; अंमली पदार्थमुक्त महाराष्ट्र व्यूहरचना आणि कृती योजनेबाबत

Central Railway : कर्जत-लोणावळा रेल्वे मार्ग पूर्णपणे पूर्ववत; 17 जुलैपासून अनेक एक्सप्रेस गाड्या पुन्हा मूळ मार्गावर

मुंबई : कर्जत-लोणावळा (Karjat lonavala) दरम्यानच्या मध्य रेल्वेच्या दक्षिण-पूर्व डाऊन मार्गावरील रेल्वे सेवा पूर्णपणे

Transformation of railway stations : पंतप्रधान मोदी उद्या ७५ स्थानके राष्ट्राला करणार समर्पित; 'अमृत भारत' योजनेचा वेग वाढला

मुंबई: रेल्वे प्रवाशांना जागतिक दर्जाच्या सुविधा मिळाव्यात आणि स्थानकांचे रूप पालटावे, या उद्देशाने

Pratap Sarnaik : ओला, उबरसह सर्व कंपन्यांना आता राज्य सरकारचा परवाना बंधनकारक

महाराष्ट्राचे नवे ॲग्रीगेटर धोरण लागू; रिक्षा टॅक्सीप्रमाणे चालकांना बॅच बंधनकारक मुंबई : महाराष्ट्रातील

Devendra Fadnavis : महाराष्ट्राला सर्वाधिक सुलभ शासकीय सेवा देणारे राज्य बनवा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; गव्हर्नन्स प्रोसेस रि-इंजिनियरिंग संदर्भात तिसऱ्या टप्प्याची बैठक मुंबई : राज्य

Mumbai News : पवई-विहार तलाव परिसरातील अवैध बांधकामांवर खासदार रवींद्र वायकर आक्रमक; केंद्राकडे तातडीच्या कारवाईची मागणी

मुंबई : पवई, पासपोली आणि विहार तलाव परिसरात सुरू असलेल्या कथित अवैध बांधकामांमुळे येथील जैवविविधता धोक्यात आली