ठाणे : दहिसर-काशीगाव मेट्रोच्या यशानंतर आता ठाणे शहरात धावणाऱ्या 'ऑरेंज लाईन' मेट्रो ५ च्या कामाला मोठी गती मिळाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या ठाणे-भिवंडी मेट्रो प्रकल्पासाठी आता नवी डेडलाईन निश्चित करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या मेट्रोचे काम येत्या डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. तांत्रिक चाचण्या आणि सर्व सोपस्कार पार पडल्यानंतर, जानेवारी २०२७ मध्ये ही मेट्रो प्रवाशांच्या सेवेत दाखल होण्याची दाट शक्यता आहे. या मेट्रोमुळे ठाणे आणि भिवंडीतील प्रवासाचा वेळ कमालीचा वाचणार आहे.
- पायलटची गंभीर चूक; हेलिपॅडऐवजी थेट वाहनांच्या पार्किंगमध्ये लँडिंगचा प्रयत्न मुंबई : राज्याचे अन्न व नागरी पुरवठा ...
दहिसर-काशीगाव मेट्रोनंतर आता ठाणे-भिवंडी मेट्रोची प्रतीक्षा
मार्ग कसा असणार ?
ठाणे, भिवंडी आणि कल्याण या शहरांना जोडणाऱ्या २५ किमी लांबीच्या मेट्रो ५ (ऑरेंज लाईन) प्रकल्पाने आता वेग घेतला आहे. यातील पहिल्या टप्प्यात ठाणे ते भिवंडी दरम्यानचे काम प्राधान्याने पूर्ण केले जात आहे. सध्या भिवंडीतून मुंबईला जाण्यासाठी थेट रेल्वे सेवा उपलब्ध नसल्याने प्रवाशांना ठाणे किंवा कल्याणमार्गे बसने प्रवास करावा लागतं. मात्र, मेट्रो सुरू होताच हा त्रास कायमचा संपणार आहे. भाजप आमदार महेश चौघुले यांच्या उपस्थितीत भिवंडी महापालिका आणि एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी नुकतीच कामाची पाहणी केली. या पाहणीनंतर, तांत्रिक कामे अंतिम टप्प्यात असून डिसेंबर २०२६ पर्यंत हा मार्ग पूर्णपणे तयार होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. यामुळे ठाणे आणि भिवंडी दरम्यानचा प्रवासाचा वेळ निम्म्यावर येणार आहे.




