भाईंदर : मुंबईजवळील भाईंदर परिसरात सिलेंडर स्फोटाची घटना घडली असून परिसरात घबराट पसरली आहे. झोपडपट्टी भागात लागलेल्या आगीत अनेक झोपड्या जळून खाक झाल्या असून काही लोकांचा मृत्यू झाला आहे. काही जण गंभीर जखमी असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
अवैध साठ्यामुळे दुर्घटना?
प्राथमिक माहितीनुसार, संबंधित ठिकाणी मोठ्या प्रमाणात गॅस सिलेंडरचा अवैध साठा करण्यात आला होता. युद्धाच्या पार्श्वभूमीवर गॅसचा तुटवडा आणि वाढलेले दर याचा फायदा घेत हा साठा केल्याचा संशय आहे.
नाशिक : नाशिकमध्ये चर्चेत असलेल्या स्वयंघोषित कॅप्टन भोंदू अशोक खरात प्रकरणात नवे धक्कादायक प्रकरणे समोर येत आहेत. तपास यंत्रणांनी तब्बल १६० जीबी ...
नेमकी घटना कशी घडली?
इंद्रलोक परिसरात शुक्रवारी रात्री सुमारे ८ ते ८.३० वाजण्याच्या दरम्यान ही दुर्घटना घडली. लोंढा कॉम्प्लेक्सच्या मागील मोकळ्या जागेत उभारलेल्या तात्पुरत्या शेडमध्ये ठेवलेल्या सिलेंडरना अचानक आग लागली आणि त्यानंतर एकामागून एक स्फोट झाले.
स्फोटांची मालिका आणि आगीचा फैलाव
या आगीत सुमारे २० ते ३० सिलेंडरचा स्फोट झाल्याची माहिती समोर येत आहे. स्फोटांच्या तीव्रतेमुळे आग वेगाने पसरली आणि आसपासच्या झोपड्यांना आगीच्या भक्ष्यस्थानी आल्या. काही वाहनांचेही मोठे नुकसान झाले.
जेरुसलेम : इराण आणि अमेरिका यांच्यात सध्या युद्धविराम सुरू आहे आणि तो पुढे वाढवण्यासाठी चर्चा होणार आहे. दरम्यान, इस्रायलच्या लढाऊ विमानांनी ...
जीवितहानी आणि जखमी
या दुर्घटनेत आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. अनेक जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. काहींची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
अग्निशमन दल
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. स्थानिकांच्या मदतीने आग नियंत्रणात आणण्यात यश आले. घटनास्थळावरून सुमारे २६ ते २९ सिलेंडर आढळल्याचेही समोर आले आहे.
आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, निवासी भागात इतक्या मोठ्या प्रमाणात सिलेंडर साठा कसा करण्यात आला? , याबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.





