Friday, April 10, 2026

Big Boss Marathi 6 : 'तिच्या भावना खोट्या वाटतात', राखी सांवतबद्दल सागर कारंडे म्हणाला...

Big Boss Marathi 6 : 'तिच्या भावना खोट्या वाटतात', राखी सांवतबद्दल सागर कारंडे म्हणाला...

मुंबई : बिग बॉस मराठी सीझन ६ यंदा चांगलाच गाजला असून आता बिग बॉस मराठीचे काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. नुकताच घरातून सागर कारंडेची (sagar Karande) एक्झिट झाली. त्यामुळे आता बिग बॉसच्या घरात राकेश बापट, राखी सावंत , दीपाली सय्यद, अनुश्री माने, तन्वी कोलते, रेवा कौरासे आणि विशाल कोटियन हे सदस्य उरले आहेत.

बिग बॉसच्या घरात राखी सावंतचा नवीन राडा रोजच पाहायला मिळतो. ती सदस्यांमध्ये कोणत्या ना कोणत्या कारणावरून भांडण लावण्याचा प्रयत्न करते. त्याचबरोबर तिनं राकेशसोबत लव्ह अँगल करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, राकेशनं तिला मी तुला मैत्रीण मानतो, असं सांगितलं. अशातच आता सागर कारंडेनं एका मुलाखतीत राखी सावंतबद्दल भाष्य केलं आहे.

राखी सावंत, दीपालीला राकेशच्या नावानं डिवचत असते. दीपाली आणि राकेशमध्ये चांगली मैत्री असून राखीला त्यांची मैत्री खटकते. यावरून बिग बॉसच्या घरात असताना सागरनेही राखीला समजावलेलं.

आता बिग बॉसच्या घरातून बाहेर येताच सागर कारंडे म्हणाला की, 'राखीचं नातं हे गेमसाठी आहे. मला माहित आहे की, ती सगळं गेमसाठी करतेय. मला वाटतं की ते गेमसाठीच आहे. खऱ्या भावना असतील तर उत्तम आहे. ती रडली आहे, खूप वेळा भावूक झाली आहे. मला तेव्हा वाटलं होतं की, राकेशबद्दल तिच्या मनात भावना आहेत.' 'पण, का कोणास ठाऊक, त्यावर विश्वास ठेवावासा वाटत नाही. लांडगा आला रे आला म्हणतो ना, की खरोखरचा लांडगा येईल, तेव्हा कोणी विश्वास ठेवणार नाही. राखीचं तसचं झालेलं आहे. खरंच ती भावूक झाली असावी. त्याच्याबरोबर ती जोडली गेली असावी. पण मला ते खोटं वाटतंय. ती गेमसाठी काहीही करू शकते, याची मला खात्री आहे. बिग बॉससाठी ती काहीही करू शकते.' असं सागरनं पुढे सांगितलं आहे.

दरम्यान, नुकताच बिग बॉस सीझन ६ मध्ये 'तिकीट टू फिनाले' चा टास्क तन्वी कोलतेनं जिंकला असून ती फिनालेमध्ये जाणारी पहिली स्पर्धक ठरली आहे. त्यामुळे यंदा बिग बॉस मराठीच्या सीझन ६ कोण जिंकणार ? याबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >