Anna Bansode : युवा आमदारांनी तंत्रज्ञान, शिक्षण आणि कौशल्य विकासावर भर द्यावा; विकसित भारतासाठी अण्णा बनसोडे यांचे आवाहन

मुंबई : विधिमंडळातील युवा सदस्यांनी आपल्या मतदारसंघाच्या विकासाबरोबरच शिक्षण, रोजगार, कौशल्य विकास, तंत्रज्ञान आणि उद्योजकता यांसारख्या व्यापक विषयांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. कृत्रिम बुद्धिमत्ता, डेटा सायन्स आणि नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर करून प्रशासन अधिक पारदर्शक आणि गतिमान करण्यासाठी पुढाकार घेण्यात यावा, असे आवाहन महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी केले.


राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या महाराष्ट्र - गोवा – गुजरात या विभाग – ७ च्या पणजी येथे आयोजित वार्षिक परिषदेमध्ये "विकसित भारत – २०२७ चे उद्दीष्ट साध्य करतांना विधिमंडळातील युवा सदस्यांची भूमिका" या विषयावर ते बोलत होते. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक ९ व १० एप्रिल, २०२६ रोजी ही परिषद पणजी येथे आयोजित करण्यात आली असून त्यास राज्यसभेचे उप सभापती हरिवंश सिंह, महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे, महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, विधानपरिषदेच्या उप सभापती नीलम गोऱ्हे, महाराष्ट्रासह राज्यविधानमंडळांचे सदस्य उपस्थित आहेत. गोवा विधानसभेचे अध्यक्ष डॉ. गणेश गावकर आणि गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनीही या परिषदेत आपले महत्वपूर्ण विचार मांडले.



महाराष्ट्र विधानसभा अण्णा बनसोडे यावेळी बोलतांना पुढे म्हणाले -


भारत हा जगात तरुणांची सर्वाधिक संख्या असलेला देश आहे. लोकशाही प्रक्रियेत युवा आमदारांचा वाढता सहभाग ही सकारात्मक बाब आहे. तरुण सदस्यांनी सभागृहात सातत्याने उपस्थित राहणे आवश्यक आहे. महाराष्ट्राचे दिवंगत माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची एक आठवण मला इथे सांगावीशी वाटते. सभागृहात नवीन आलेल्या सदस्यांनी सभागृहाची बैठक सुरू झाल्यापासून ती संपेपर्यंत संपूर्ण दिवस सभागृहात उपस्थित रहायला हवे, असा त्यांचा नेहमी आग्रह असे. इतकेच नव्हे, तर ते स्वतः संपूर्ण वेळ सभागृहात उपस्थित राहात असत. असे केल्याने राज्यातील सर्व प्रश्नांची माहिती होते आणि त्या माध्यमातून राज्यातील सर्वसामान्य जनतेचे, नव्या पिढीचे, युवकांचे प्रश्न सोडवता येऊ शकतात, अशी त्यामागे त्यांची भूमिका असे. विकसीत भारताचा संकल्प पूर्ण करण्याकरिता नव्या पिढीतील आमदारांच्या भूमिकेचा विचार करताना एका अनुभवसंपन्न नेत्याच्या या विचारांचे अनुसरण करण्याचा प्रयत्न नव्या सदस्यांनी करायला हवा, असे मला वाटते. शिक्षण आणि कौशल्य विकास हा विकसित भारताचा पाया असल्याचे नमूद करत, शाळा, महाविद्यालये आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी युवा लोकप्रतिनिधींनी प्रयत्नशील राहावे, असे आवाहन त्यांनी केले.


पर्यावरण संवर्धनाच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी शाश्वत विकासाची गरज अधोरेखित केली. हरित ऊर्जा, जलसंधारण आणि प्रदूषणमुक्त विकास यावर भर देत पुढील पिढ्यांसाठी सुरक्षित भविष्य घडवण्यासाठीची आवश्यकता असल्याचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी स्पष्ट केले.

Comments
Add Comment

Jayant Patil : जयंत पाटील यांनी घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट

आमदार जितेंद्र आव्हाडही सोबत; 'नंदनवन'वर एक तास खलबते मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे

Ro-ko Unstoppable : रोहित आणि विराटने रचला इतिहास; गांगुली-द्रविडला मागं टाकतं ही कामगिरी करणारी ठरली तिसरी जोडी

Mumbai : भारत आणि इंग्लंड यांच्यात दुसरा एकदिवसीय सामना कार्डिफ येथे सुरु आहे. इंग्लंडनं टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी

India's energy storage : भारताची ऊर्जा साठवणूक क्षमता २०३५-३६ पर्यंत दहा पटींनी वाढणार

नवी दिल्ली : भारताच्या विकासाच्या प्रवासात ऊर्जा क्षेत्राचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. देशाची वाढती वीज गरज आणि

Indian Fishermen : शिक्षा पूर्ण होऊनही १७८ भारतीय मच्छीमार पाकिस्तानच्या तुरुंगात

कॉन्स्युलर कराराचे उल्लंघन; डहाणू-तलासरीतील १८ कुटुंबांचा न्यायासाठी आक्रोश डहाणू : भारत-पाकिस्तानदरम्यान

CUTS International : बाईक टॅक्सींसाठी देशव्यापी सुसंगत धोरणाची गरज, 'कट्स इंटरनॅशनल'चा अहवाल

नवी दिल्ली : देशातील बाईक टॅक्सी सेवांसाठी सध्या असलेल्या विसंगत राज्यनिहाय नियमांऐवजी, एक सुसंगत आणि

Jagannath Rath Yatra Stampede : जगन्नाथ रथयात्रेदरम्यान प्रचंड गर्दीमुळे चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती; एकाचा मृत्यू, अनेक जखमी

भुवनेशवर : ओडिसातील पुरी येथे गुरुवारी जगप्रसिद्ध जगन्नाथ रथयात्रेदरम्यान चेंगराचेंगरीसदृश परिस्थिती