अहमदाबाद : गुजरातच्या अहमदाबादमधील चांदखेडा येथे झालेल्या दुहेरी मृत्यूने सर्वाना धक्का बसला आहे. एकाच कुटुंबातील दोन चिमुरड्या बहिणींचा मृत्यू झाल्याचे सगळीकडे खळबळ उडाली आहे. निमित्त ठरल बाहेरून आणलेले डोशाच पीठ. आईने डोसे केले घरात सर्वानी ते खाल्ले आणि त्याच डोश्यानी त्यांना मृत्यूच्या दाढेत ढकलले, परंतु पोलिसांना मृत्यूचे वेगळेच धागेदोरे सापडले असून यातून अनेक खुलासे बाहेर येण्याची शक्यता आहे.
नेमकं घडलं काय ?
दोन शक्यता वर्तवण्यात येत आहेत
१. पीठ नासले म्हणून
डेअरी मालक केतन पटेल यांच्या सांगण्यानुसार ते सारखेच पीठ त्याने जवळपास २०० लोकांना दिले, शिवाय आमच्या कुटुंबाने देखील खाल्ले त्यापैकी एकाचीही अशी कोणतीच तक्रार आली नाही. कुटुंबाने रात्री डोसे करून पुन्हा दुसऱ्या दिवशी त्या पिठाचे डोसे खाल्ले तेव्हा ते पीठ नासले असण्याची शक्यता असून ते खाल्ल्यामुळे चिमुरडीचा मृत्यू झाला असावा
२. विषबाधा केल्याचा संशय
कारण ३ महिन्यांची राहा केवळ आईचे दूध पीत असल्याने तिने डोसा खाल्ल्याची शक्यात तर मुळीच नाही, तरीही तिची प्रकृती खालावली, जर स्तनपानामुळे तिच्यावर परिणाम झाला असेल तर तिच्या आईची प्रकृती देखील गंभीर असली असती. परंतु आई वडिलांची प्रकृती ही चिंताजनक नसल्याने
या विषयाला अनेक फाटे फुकट आहेत.
डेअरीमधून ३ किलो पीठ खरेदी करण्यात आले, परंतु त्यातील केवळ छोटासा भाग खाण्यात आला, ज्यामुळे तपासात आणखी गुंतागुंत निर्माण झाली आहे .
दरम्यान अपघाती मृत्यू अशी नोंद करण्यात आली असून विविध बाजूनी तपासा सुरु आहे, आता पुढील निष्कर्ष न्यायवैद्क अहवालावर अवलंबून आहे. असे पोलीस निरीक्षकांनी स्पष्ट केले आहे.