नवी दिल्ली : इराण आणि इस्रायलमध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे जागतिक स्तरावर इंधनाचे संकट ओढवले असून, याचे पडसाद भारतातही उमटताना दिसत आहेत. एलपीजी गॅसच्या वाढत्या तुटवड्यामुळे सर्वसामान्यांमध्ये चिंतेचे वातावरण असतानाच, केंद्र सरकारने एक दिलासादायक पाऊल उचलले आहे. विशेषतः विद्यार्थी आणि स्थलांतरित कामगारांची सोय लक्षात घेऊन सरकारने ५ किलोच्या गॅस सिलिंडरचा पुरवठा आता दुप्पट करण्याचा निर्णय घेतला आहे. जागतिक संकटामुळे उद्भवलेल्या टंचाईवर मात करण्यासाठी सरकारने हा 'डबल सिलिंडर'चा कोटा लागू केला आहे. या निर्णयाचा सर्वाधिक फायदा रोजंदारीवर काम करणारे मजूर, शहरात राहणारे विद्यार्थी आणि नोकरीनिमित्त स्थलांतर करणाऱ्या प्रवाशांना होणार आहे. गॅस तुटवड्यामुळे निर्माण झालेली ओढाताण कमी करण्यासाठी आणि गरजूंपर्यंत इंधन पोहोचवण्यासाठी सरकारने ही यंत्रणा अधिक गतीमान केली आहे, ज्यामुळे सर्वसामान्यांना मोठा आधार मिळाला आहे.
सांगली : सांगली जिल्ह्यात गेल्या २४ तासांत घडलेल्या तीन वेगवेगळ्या खुनांच्या घटनांनी कायदा-सुव्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. कवलापूर आणि ...
५ किलो सिलिंडरचा कोटा दुप्पट
स्थलांतरित आणि विद्यार्थ्यांसाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय
आता स्थलांतरित कामगार, मजूर आणि विद्यार्थ्यांना गॅस कनेक्शनसाठी पत्त्याच्या पुराव्याची (Address Proof) अट राहणार नाही. केवळ आपले ओळखपत्र दाखवून ५ किलोचा 'एफटीएल' (FTL) सिलिंडर सहज खरेदी करता येणार आहे, ज्यामुळे कागदपत्रांच्या कटकटीतून त्यांची मुक्तता झाली आहे. या योजनेतंर्गत, केंद्र सरकार राज्य सरकारांच्या अन्न व नागरी पुरवठा विभागामार्फत या छोट्या सिलिंडरचा साठा उपलब्ध करून देत आहे. तेल विपणन कंपन्यांमार्फत थेट वितरण केले जाणार असल्याने, रोजंदारीवर काम करणाऱ्यांना आणि बाहेरगावी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना हा गॅस वेळेवर मिळणे सोपे होणार आहे. जागतिक संघर्षाचा फटका सर्वसामान्यांच्या चुलीला बसू नये, यासाठी सरकारने वितरणाची ही नवीन आणि सोपी व्यवस्था तातडीने कार्यान्वित केली आहे.






