मुंबई : धुरंधर या चित्रपटाने सर्वानाच भुरळ पाडली आहे. पहिल्या भागाने जोरदार कमाई करत. भारतीयांच्या लोकांच्या मनावर राज्य केले होते, त्याचपाठोपाठ धुरंधर २ या सिनेमानेही सर्वांवर आपली छाप सोडली आहे. हा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर प्रचंड धुमाकूळ घालताना आपल्याला दिसत आहे. सहसा बहुतेक चित्रपट थोड्याच हफ्त्यात आपला सिनेमागृहांवरून आपला गाशा गुंडाळतात, परंतु रिलीज नंतर १९ दिवस उलटूनही धुरंधर २ हा चित्रपट अजूनही ठाण मांडून बसला आहे.
या सिनेमाची छाप ही सर्वांच्याच मनावर पडली. अगदी सामान्य प्रेक्षक वर्गापासून ते नेतेमंडळी, ज्येष्ठ अभिनेता - अभिनेत्री आणि आता चक्क क्रिकेटच्या देवाला विराट आणि अनुष्काला देखील या सिनेमाची भुरळ पडली आहे. आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर फोटो शेअर करत. सिनेमाबद्दल स्तुतीसुमने उधळली आहेत.
दिग्दर्शक आदित्य धरवरही कोहलीनं स्तुतिसुमनं उधळली "तुम्ही निर्माण केलेल्या प्रत्येक गोष्टीतून तुमची प्रतिभा आणि समर्पण स्पष्टपणे दिसतंय. तुम्हाला माझा सलाम! तुम्ही खरोखरंच एक अद्भूत आहात..." अभिनेता रणवीर सिंहबद्दल बोलताना म्हणाला की, या सिनेमानंतर तुम्ही एका वेगळ्याच उंचीवर पोहोचला आहे तुमचा अभिनय केवळ अप्रतिमच नव्हे, तर त्याहूनही कितीतरी श्रेष्ठ आहात.
अनुष्का म्हणते की
आदित्य धरला टॅग करत अनुष्काने लिहिले: "तुम्ही अप्रतिम चित्रपट बनवला आहे, ४ तासांचा असे प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा सिनेमे बनवायला खूप धाडस लागत, यात अनेक बारीक आब्रिक गोष्टींवर लक्ष ठेवले गेले आहे तुम्ही एक अत्यंत मौलिक आणि आत्मविश्वासू चित्रपट निर्माते आहात."
आपला पहिला सहकलाकार रणवीर सिंगच्या 'उत्कृष्ट' अभिनयाचे कौतुक करत अनुष्काने लिहिले: "तू आयुष्यात एकदाच मिळणारी भूमिका साकारलीस आणि एक दमदार, निर्दोष अभिनय सादर केलास." अनुष्का
"माधवन, रामपाल, राकेश बेदी सर आणि चित्रपटातील प्रत्येक उत्कृष्ट कलाकार—प्रत्येकाचा अभिनय अगदी अचूक आहे; तुमच्या प्रत्येकाशिवाय या चित्रपटाची कल्पनाच करता येत नाही. यामागे असलेल्या प्रत्येकाचे खूप खूप अभिनंदन," असे अनुष्का पुढे म्हणाली
एकीकडे बॉक्स ऑफिसवर यशाची घोडदौड आणि दुसरीकडे विराटसारख्या मोठ्या नावाकडून मिळालेलं कौतुक, यामुळे ‘धुरंधर 2’ची लोकप्रियता आणखी वाढण्याची शक्यता असून, पुढील काही दिवसांत चित्रपट आणखी नवे विक्रम प्रस्थापित करेल अशी सर्वाना खात्री आहे.






