'मेट्रो ९' आणि '२-बी'चे लोकार्पण; ठाणे-बोरिवली अंतर आता काही मिनिटांवर
मुंबई : मुंबईच्या दळणवळण व्यवस्थेचा चेहरामोहरा बदलणाऱ्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन मंगळवार, ७ एप्रिल रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. यामध्ये मेट्रो मार्गिका ९ आणि २-बी च्या पहिल्या टप्प्यांचे उद्घाटन, ठाणे-बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्पाचा शुभारंभ आणि अत्याधुनिक 'पॉड टॅक्सी' प्रकल्पाचे ई-भूमिपूजन अशा 'विकासाच्या चतुःसूत्री'चा समावेश आहे.
फायदा काय होणार?
मेट्रो मार्गिका ९ आणि २-बी मुळे उपनगरातील प्रवाशांचा लोकलवरील ताण कमी होणार असून, पश्चिम आणि पूर्व उपनगरे मेट्रोने अधिक सक्षमपणे जोडली जाणार आहेत.






