Ahilyanagar: लग्नाच्या आमिषाने तरुणीचे लैंगिक शोषण; श्रीरामपूरात गुन्हा दाखल

श्रीरामपूर: लग्नाचे आमिष दाखवून एका २३ वर्षीय तरुणीचे दीर्घकाळ लैंगिक शोषण केल्याप्रकरणी अक्षय विश्वनाथ गवळी (रा. संजयनगर, श्रीरामपूर) याच्याविरोधात श्रीरामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी ही घरकाम करून उदरनिर्वाह करत असून, तिचा २०१९ मध्ये विवाह झाला होता. वैवाहिक आयुष्यातील वाद आणि अत्याचारामुळे ती माहेरी राहत असताना आरोपी अक्षय गवळी याच्याशी तिची ओळख झाली. सुरुवातीला फोनवरून संपर्क साधत आरोपीने तिचा विश्वास संपादन केला. यानंतर आरोपीने लग्नाचे आमिष दाखवत २०२२ पासून वेळोवेळी तिच्याशी जबरदस्तीने तसेच फसवणूक करून शारीरिक संबंध ठेवले. पुढे पीडितेला घटस्फोट घेण्यास प्रवृत्त करून शिरसगाव येथे भाड्याच्या खोलीत पती-पत्नीप्रमाणे राहूनही आरोपीने तिचे शोषण सुरूच ठेवले.


दरम्यान, मार्च २०२६ मध्ये आरोपी दुसऱ्या मुलीशी विवाह करत असल्याचे समजताच पीडित तरुणीने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. उपचारादरम्यान आरोपीने दुसरे लग्न केल्याचेही उघड झाले. त्यानंतरही आरोपीने पीडितेला मारहाण करून घराबाहेर काढल्याची तक्रार आहे. या प्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम ६४(2)(m) अन्वये गुन्हा रजि नं. २३६/२०२६ दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दादाभाई मगरे हे करत आहे.

Comments
Add Comment

बालकांच्या कर्करोग उपचारांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचा पुढाकार

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष पुढाकाराने मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष, भारत पेट्रोलियम

Nitesh Rane: मंत्री नितेश राणेंच्या प्रमुख उपस्थितीत साजरा झाला राष्ट्रीय सागरी दिन

मुंबई: भारताच्या आर्थिक महासत्तेकडे होणाऱ्या वाटचालीत सागरी क्षेत्राचा वाटा मोलाचा असून, बंदरांच्या

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत कोयना महोत्सवाची यशस्वी सांगता

सातारा: राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पर्यटन नकाशावर अग्रस्थानी नेण्याचा निर्धार व्यक्त करत पर्यटन, शेती आणि रोजगार

मुख्यमंत्र्यांच्या पाठबळामुळे ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील पर्यावरणीय पुनरुज्जीवन प्रकल्पाला मिळाली चालना

मुंबई: जैवविविधतेने समृद्ध अशा ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प परिसरातील जागेचे पर्यावरणीय पुनरुज्जीवन

‘पीएनजी’ क्षेत्रातील नागरिकांना ३० जूननंतर ‘एलपीजी’ गॅस पुरवठा बंद; पर्यायी इंधन म्हणून केरोसीनचे वाटप होणार

मुंबई: राज्यातील ज्या शहरी भागांमध्ये पाइपद्वारे गॅस (पीएनजी) जोडणीची सुविधा उपलब्ध आहे, तिथे नागरिकांनी पीएनजी

प्राजक्त तनपुरेंनी माघार घेताच शरद पवारांकडून गोविंद मोकाटेंना उमेदवारी

मुंबई: आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या राहुरी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत