मुंबई : भारताने सुरु केलेली यूपीआय ही डिजिटल प्रणाली आज जगभर पोहोचली आहे. हातात कॅश नसेल तर आता घाबरून न जात आपण बिनधास्तपणे डिजिटल प्रणाली वापरत आहोत. अगदी किराणा मालापासून ते लाखोंचे व्यवहार करण्यापर्यंत युपीआय वापरले जाते आहे. सणासुदीच्या काळात तर या व्यवहारांत अधिक भर पडते.
प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीनुसार मागच्या मार्च महिन्यात युपीआयने पेमेंट करणाऱ्यांची संख्या ही कोटींपर्यंत पोहोचली आहे. आणि एकट्या मार्च महिन्यात २२.६४ अब्ज असे विक्रमी संख्येने व्यवहार पार पडले आहेत. मार्च २०२५ महिन्याची तुलना करता, मार्च २०२६ मध्ये या व्यवहारांमध्ये १९ टक्के वाढ नोंदवली गेली आहे. तसेच फेब्रुवारीत एकूण २६.८४ लाख रुपये इतके व्यवहार झाले असून मार्च महिन्यात त्यात १० टक्क्यांनी वाढले आहेत.
मार्च महिन्यातील सण
मार्च महिन्यात होळी, धूलिवंदन, रंगपंचमी, गुढीपाडवा, ईद असे अनेक सण तसेच देवतांच्या यात्रा - जत्रा, उत्सव असतात. या निमित्ताने देशात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात खरेदी होते. या खरेदीसाठी यूपीआयचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला. दररोज सरासरी ७३ कोटी व्यवहार झाले आहेत असे निदर्शनास आले. ज्यांचे दैनिक मूल्य हे ९५,२४३ कोटी रुपये इतके आहे.
आजच्या काळात भारतात डिजिटल पेमेंट्सवर जास्त भर दिला जात आहे. एकूण डिजिटल व्यवहारांपैकी जवळपास ८५ टक्के व्यवहार हे पूर्णपणे युपीआयच्या आधाराने केले जातात.






