Hrithik Roshan Divorce : 'या' कारणामुळे हृतिक आणि सुझाननं घेतला घटस्फोट, अभिनेता जायेद खाननं केला खुलासा

मुंबई : बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता हृतिक रोशन (Hrithik Roshan) नुकताच पुतण्याचा लग्नातील डानसमुळे चर्चेत आला होता. हृतिक डान्स आणि अभिनयासोबतच त्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबतही सतत चर्चेत असतो. त्याच्या आणि सुझान खानच्या (Sussanne Khan) नात्याविषयी कायम चर्चा रंगलेली असते. विशेष म्हणजे दोघांच्या घटस्फोट याविषयी अनेकदा बोललं जातं.


१४ वर्षांच्या संसारानंतर ऋतिक आणि सुझान विभक्त झाले होते. मात्र, अजूनही त्यांच्यातील मैत्री कायम आहे. आपल्या मुलांच्या संगोपनासाठी ते कायम एकत्र येताना दिसतात. ऋतिकनं घटस्फोट दिला तेव्हा त्याच्या चाहत्यांसह मनोरंजन विश्वात सगळ्यांनाच धक्का बसला होता. आता जायेद खाननं दोघांच्या घटस्फोटावर खुलासा केला आहे.


सुझानचा भाऊ जायेद खाननं नुकताच दिलेल्या एका मुलाखतीत दोघांच्या घटस्फोटाचं कारण सांगितलंय. याबाबत बोलताना जायेद म्हणाला " एकत्र राहणं त्यांच्या नशिबात लिहिलं नसावं. तर एखादी गोष्ट टिकणार नसते, त्याला ओढून ताणून धरण्याचा प्रयत्न करणं फार वाईट असतं. यामुळे दोन्ही व्यक्तींना त्रास होतो. हे सगळं कशासाठी ? अखेर तुम्हाला तुमच्या मुलांच्या भविष्याचा विचार करायचा असतो, त्यांच्या आयुष्याचा तुम्ही भाग असता, तुम्हाला त्यांना लहानाचं मोठं होताना पाहायचं असतं. ऋतिक आणि सुझानच्या नात्यात असंच झालं. आणि दोघांचा उद्देश मुलांवर लक्ष केंद्रित करणं हा बनला.'


पुढे जायेद म्हणाला ' जे झालं ते झालं. आता सगळं संपलंय. आता तुम्ही तुमच्या भविष्यावर लक्ष द्या. स्वतःचा आनंद शोधा, असा विचार आमच्या कुटुंबानं केला आहे. आम्ही समाजाच्या दबावाखाली जगणारं कुटुंब नाही. आम्ही काही गोष्टींबाबत खूप जागरूक आणि सुशिक्षित आहोत. अनेकांना असं वागणं विचित्र वाटतं, मला माहित आहे . बरेचजण याबद्दल नाराजी व्यक्त करतात. पण ठीक आहे. आम्हाला त्याची काहीही अडचण नाही."


यावेळी जायेद ऋतिकच्या नव्या गर्लफ्रेंड विषयी बोलताना म्हणाला ' दोघांनाही खूप चांगले जोडीदार मिळाले असून सबा खूप चांगली आहे. तर सुजानचा बॉयफ्रेंड अर्सलान माझा धाकट्या भावाप्रमाणे आहे. ज्या परिस्थितीतून या दोघांना जावं लागलं ते मी शब्दात मांडू शकत नाही. ज्या पद्धतीनं त्यांनी ही परिस्थिती हाताळली, आपापल्या आयुष्यात प्रगती केली आणि पुन्हा एकदा प्रेमात पडले त्याबद्दल त्यांचा मला आदर वाटतो. कारण ही गोष्ट सोपी नाही.


महत्त्वाचं काय आहे ? तर तुमच्याकडे अशी एखादी व्यक्ती असावी जिच्यावर तुम्ही पूर्ण विश्वास ठेवू शकता. जर ही व्यक्ती खंबीर नसेल तर या जगात वावरणं खूप कठीण आहे. प्रेम हा खूप व्यापक शब्द आहे. ऋतिक आणि सुजानला एकमेकांबद्दल वाटणारा आदर आणि काळजीही प्रेमापेक्षा जास्त अर्थपूर्ण आहे . असं यावेळी बोलताना सुझानचा भाऊ अभिनेता जायेद खाननं स्पष्ट केलं आहे.

Comments
Add Comment

Aamir Khan : आमिर खानला बिश्नोई गँगच्या नावाने धमकी? सोशल मीडियावरील पोस्टमुळे खळबळ; ‘लव्ह जिहाद’चा केला उल्लेख

मुंबई : बॉलिवूड (Bollywood) अभिनेता आमिर खान (Aamir Khan) याला लॉरेन्स बिश्नोई गँगच्या (Lawrence Bishnoi Gang) नावाने सोशल मीडियावर (Social Media) धमकी

Upcoming Hollywood Movies Releases : २०२६ मध्ये चित्रपटसृष्टीत महाधमाका! ‘स्पायडर-मॅन’पासून ‘अ‍ॅव्हेंजर्स डूम्सडे’पर्यंत मोठ्या सिनेमांची मेजवानी

हॉलीवूड (Hollywood) सिनेमांसाठी २०२६ हे वर्ष खास ठरणार आहे. क्रिस्टोफर नोलन यांच्या ‘द ओडिसी’ (The Odyssey) या बिग बजेट

Aamir Khan On Sonam Wangchuk : 'रँचो' आणि सोनम वांगचुक यांचा संबंध नाही! आमिर खाननं '3 इडियट्स'च्या गैरसमजावर दिलं स्पष्टीकरण

मुंबई : बॉलिवूड अभिनेता आमिर खाननं (Aamir Khan) ‘3 इडियट्स’ (3 Idiots) चित्रपटातील ‘रँचो’ (Rancho) हे पात्र प्रसिद्ध शास्त्रज्ञ सोनम

‘ Samarth Marathi Movie : समर्थ’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

समर्थ रामदास स्वामींच्या प्रेरणादायी विचारांना आजच्या काळाशी जोडणाऱ्या ‘समर्थ’ या आगामी मराठी चित्रपटाचा

Ramayana Movie : 'रामायण'च्या ट्रेलरला सेन्सॉर बोर्डाची मंजुरी

मुंबई : रणबीर कपूरची मुख्य भूमिका असलेल्या आणि अत्यंत बहुप्रतिक्षित अशा 'रामायण: पार्ट १' ( Ramayana Movie) या पौराणिक

Itha Movie : 'इठा' चित्रपटात मूळ इतिहासाची तोडफोड; विठाबाई यांच्या कुटुंबियांकडून गंभीर आरोप

पुणे : तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगांवकर ( Itha Movie) यांनी आपल्या अद्वितीय कलेच्या जोरावर महाराष्ट्राच्या