Hrithik Roshan Divorce : 'या' कारणामुळे हृतिक आणि सुझाननं घेतला घटस्फोट, अभिनेता जायेद खाननं केला खुलासा

मुंबई : बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता हृतिक रोशन (Hrithik Roshan) नुकताच पुतण्याचा लग्नातील डानसमुळे चर्चेत आला होता. हृतिक डान्स आणि अभिनयासोबतच त्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबतही सतत चर्चेत असतो. त्याच्या आणि सुझान खानच्या (Sussanne Khan) नात्याविषयी कायम चर्चा रंगलेली असते. विशेष म्हणजे दोघांच्या घटस्फोट याविषयी अनेकदा बोललं जातं.


१४ वर्षांच्या संसारानंतर ऋतिक आणि सुझान विभक्त झाले होते. मात्र, अजूनही त्यांच्यातील मैत्री कायम आहे. आपल्या मुलांच्या संगोपनासाठी ते कायम एकत्र येताना दिसतात. ऋतिकनं घटस्फोट दिला तेव्हा त्याच्या चाहत्यांसह मनोरंजन विश्वात सगळ्यांनाच धक्का बसला होता. आता जायेद खाननं दोघांच्या घटस्फोटावर खुलासा केला आहे.


सुझानचा भाऊ जायेद खाननं नुकताच दिलेल्या एका मुलाखतीत दोघांच्या घटस्फोटाचं कारण सांगितलंय. याबाबत बोलताना जायेद म्हणाला " एकत्र राहणं त्यांच्या नशिबात लिहिलं नसावं. तर एखादी गोष्ट टिकणार नसते, त्याला ओढून ताणून धरण्याचा प्रयत्न करणं फार वाईट असतं. यामुळे दोन्ही व्यक्तींना त्रास होतो. हे सगळं कशासाठी ? अखेर तुम्हाला तुमच्या मुलांच्या भविष्याचा विचार करायचा असतो, त्यांच्या आयुष्याचा तुम्ही भाग असता, तुम्हाला त्यांना लहानाचं मोठं होताना पाहायचं असतं. ऋतिक आणि सुझानच्या नात्यात असंच झालं. आणि दोघांचा उद्देश मुलांवर लक्ष केंद्रित करणं हा बनला.'


पुढे जायेद म्हणाला ' जे झालं ते झालं. आता सगळं संपलंय. आता तुम्ही तुमच्या भविष्यावर लक्ष द्या. स्वतःचा आनंद शोधा, असा विचार आमच्या कुटुंबानं केला आहे. आम्ही समाजाच्या दबावाखाली जगणारं कुटुंब नाही. आम्ही काही गोष्टींबाबत खूप जागरूक आणि सुशिक्षित आहोत. अनेकांना असं वागणं विचित्र वाटतं, मला माहित आहे . बरेचजण याबद्दल नाराजी व्यक्त करतात. पण ठीक आहे. आम्हाला त्याची काहीही अडचण नाही."


यावेळी जायेद ऋतिकच्या नव्या गर्लफ्रेंड विषयी बोलताना म्हणाला ' दोघांनाही खूप चांगले जोडीदार मिळाले असून सबा खूप चांगली आहे. तर सुजानचा बॉयफ्रेंड अर्सलान माझा धाकट्या भावाप्रमाणे आहे. ज्या परिस्थितीतून या दोघांना जावं लागलं ते मी शब्दात मांडू शकत नाही. ज्या पद्धतीनं त्यांनी ही परिस्थिती हाताळली, आपापल्या आयुष्यात प्रगती केली आणि पुन्हा एकदा प्रेमात पडले त्याबद्दल त्यांचा मला आदर वाटतो. कारण ही गोष्ट सोपी नाही.


महत्त्वाचं काय आहे ? तर तुमच्याकडे अशी एखादी व्यक्ती असावी जिच्यावर तुम्ही पूर्ण विश्वास ठेवू शकता. जर ही व्यक्ती खंबीर नसेल तर या जगात वावरणं खूप कठीण आहे. प्रेम हा खूप व्यापक शब्द आहे. ऋतिक आणि सुजानला एकमेकांबद्दल वाटणारा आदर आणि काळजीही प्रेमापेक्षा जास्त अर्थपूर्ण आहे . असं यावेळी बोलताना सुझानचा भाऊ अभिनेता जायेद खाननं स्पष्ट केलं आहे.

Comments
Add Comment

Ranbir Kapoor : रणबीर कपूर झाला अयोध्यावासी! ‘रामायण’ रिलीजआधी राम मंदिराजवळ ३.३१ कोटींची प्रॉपर्टी खरेदी

अयोध्या : रणबीर कपूर (Ranbir Kapoor) सध्या त्याच्या बहुचर्चित रामायण (Ramayana) चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात तो प्रभू

Indian Musician Death : भारतीय शास्त्रीय संगीतविश्वाला मोठा धक्का! ज्येष्ठ तबला वादक उस्ताद साबिर खान यांचं निधन

कोलकाता : भारतीय शास्त्रीय संगीतविश्वासाठी अत्यंत दुःखद बातमी. प्रख्यात तबला वादक उस्ताद साबिर खान यांचे

Mouni Roy-Suraj Nambiar Divorce : “आम्ही वेगळं होण्याचा निर्णय घेतलाय…”; अखेर मौनी रॉयने घटस्फोटावर मोडलं मौन

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून 'नागिन' फेम अभिनेत्री मौनी रॉय (Mouni Roy) आणि तिचा पती सूरज नांबियार (Suraj Nambiar) यांच्या

Ruchira Jadhav : काळ्या ब्लेझरमध्ये रुचिरा जाधवचा बोल्ड अंदाज; कॅप्शनचीही चर्चा

मुंबई : मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय आणि ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून रुचिरा जाधव (Ruchira Jadhav) हिचं नाव घेतलं जातं.

Marathi Actor Cannes Look : कान्सच्या रेड कार्पेटवर मराठमोळा जलवा! पुष्कर जोगचा डॅशिंग लूक चर्चेत

फ्रान्स : सध्या जगभरात ७९ व्या कान्स फिल्म फेस्टिवलची जोरदार चर्चा सुरू आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही बॉलिवूड आणि

Sharib Hashmi : कर्करोगाशी पत्नीची जीवघेणी लढाई; अभिनेत्याच्या पत्नीची हृदयद्रावक कहाणी

मुंबई : ‘द फॅमिली मॅन’ (The Family Man) या लोकप्रिय वेब सीरिजमधील श्रीकांत तिवारी जितका चर्चेत राहिला, तितकंच