Ready reckoner : जनतेच्या हितासाठी रेडी रेकनर दरवाढ फेटाळली

मुंबई : सध्याची जागतिक स्थिती व युद्ध परिस्थिती लक्षात घेऊन जनतेच्या हितासाठी मालमत्तेच्या दरात १२ ते १४ टक्क्यांपर्यंतची दरवाढ नाकारली, असे स्पष्टीकरण महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर आणि संभाजीनगर यांसारख्या मेट्रोपॉलिटन शहरांमध्ये आता 'मायक्रो झोनिंग' केले जाणार आहे. यामुळे प्रत्येक मालमत्तेचा दर हा त्या विशिष्ट भागातील सुविधेनुसार ठरेल. "एका घराचा दर दुसऱ्या घराला लागणार नाही, ज्याची जी किंमत आहे त्यानुसारच दर आकारला जाईल," विकास आराखडा (DP) आणि प्रादेशिक योजनांमधील बदलांनुसार दरांचे सुलभीकरण करण्यात आले आहे; असेही बावनकुळे म्हणाले.


शेतकऱ्यांच्या शेतात जाण्यासाठी असलेल्या पांदण रस्त्यांबाबतही कडक भूमिका घेण्यात आली आहे. जर कोणी सार्वजनिक रस्ता अडवला, तर त्याचे सरकारी योजनांचे आयडी पाच वर्षांसाठी ब्लॉक केले जातील. तसेच, २०२६ च्या नवीन जनगणनेमुळे राज्याच्या विकास योजनांना अधिक अचूक दिशा मिळेल. आमचे सरकार गतिमान आणि पारदर्शक असून, महसूल प्रशासनातील शेवटच्या घटकापर्यंत ही गती पोहोचवणे आमचे उद्दिष्ट आहे. अधिकारांचे विकेंद्रीकरण केल्यामुळे सर्वसामान्यांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचणार आहे, असेही बावनकुळेंनी सांगितले.


१५०० फुटांपर्यंतची बांधकामे होणार कायदेशीर : राज्यातील नागरी आणि ग्रामीण भागातील अतिक्रमणांबाबत सरकारने मोठा दिलासा दिला आहे. १ जानेवारी २०११ पूर्वीची शासकीय जमिनीवरील किंवा लेआऊटमधील निवासी बांधकामे आता नियमित केली जाणार आहेत. पूर्वी ही मर्यादा ५०० चौरस फुटांपर्यंत होती, ती आता १५०० चौरस फुटांपर्यंत वाढवण्यात आली आहे. संबंधित व्यक्ती ही महाराष्ट्रातील रहिवासी असावी आणि २०११ च्या मतदार यादीत त्याचे नाव असणे अनिवार्य आहे. १५०० फुटांवरील अनधिकृत बांधकामांवर मात्र कारवाई केली जाईल.


‘व्हर्जन २' लाँच : शेतकऱ्यांसाठी जमीन मोजणीची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी भूमी अभिलेख विभागातर्फे 'व्हर्जन २' (Version 2) हे नवीन सॉफ्टवेअर लाँच केले जात आहे. पूर्वी पोट हिस्सा मोजणीसाठी मोठा खर्च करावा लागत असे. आता केवळ २०० रुपये प्रति पोट हिस्सा या दराने मोजणी करता येईल. यामुळे १०,००० रुपयांत होणारी मोजणी आता केवळ १००० रुपयांत शक्य होईल. सर्व मालमत्तांचा डेटा आता आय-क्लाउडवर सुरक्षित ठेवला जाणार असून मोजणीचा कालावधीही मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.


अधिकारांचे विकेंद्रीकरण : शर्तभंगाच्या प्रकरणांसाठी आता सामान्य जनतेला मंत्रालयात येण्याची गरज भासणार नाही. अधिकारांचे विकेंद्रीकरण करत सरकारने जिल्हाधिकारी यांना १० लाख रुपयांपर्यंतचे, विभागीय आयुक्तांना २० लाख रुपयांपर्यंत, तर १ कोटी रुपयांपर्यंतचे निर्णय आता स्थानिक पातळीवरच होतील. तसेच, महसूल संबंधित सर्व अर्ध-न्यायिक खटले ९० दिवसांत आणि केवळ दोन सुनावण्यांमध्ये निकाली काढण्याचे बंधनकारक निर्देश देण्यात आले आहेत.

Comments
Add Comment

Central Railway Power Block Update : मध्य रेल्वेवर पॉवर ब्लॉक; ६ जूनला अनेक गाड्या रद्द, वेळापत्रकात बदल, लोकल सेवांवरही परिणाम!

कल्याण (Mumbai Central Railway Block) : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात आटगाव स्थानकावर नवीन इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग (Electronic Interlocking)

Monsoon News : मान्सून केरळमध्ये दाखल! देशातील १८ राज्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची इशारा

मुंबई : दक्षिण-पश्चिम मान्सूनने (Monsoon) अखेर केरळमध्ये (Kerala) अधिकृत प्रवेश केला असून आता त्याचा वेग वाढला आहे. केरळनंतर

जेम पोर्टलवरून शालेय वस्तुंची खरेदी करताच काँग्रेसला लागल्या मिरच्या

- शालेय वस्तूंची खरेदी निविदेची चौकशी करण्याची केली मागणी - मुलांना वस्तूंचे वाटप वेळेत होऊ नये यासाठी

World Environment Day 2026 : कांजूरमार्ग डम्पिंग ग्राउंड येथे होणार १६ हजार वृक्षांची लागवड

- शुक्रवारी ५ जून २०२६ रोजी सकाळी ८ वाजता या उपक्रमाचा शुभारंभ - मुंबईकर नागरिकांनी या वृक्ष लागवड मोहिमेत सहभागी

Aamir Khan : आमिर खानची तिसऱ्या लग्नाची तयारी ; चर्चांवर आमिर खानची प्रतिक्रिया

मुंबई : वयाच्या ६१ व्या वर्षी आमिर खान तिसऱ्यांदा लग्न बंधनात अडकणार आहे अशी घोषणा त्याने स्वतःह एका मुलाखती

Wipro Office Religious Harassment : TCS नंतर आता विप्रोही वादाच्या भोवऱ्यात? धर्म बदलण्यास नकार दिल्याने नोकरी गमवावी लागली; पुण्यातील माजी कर्मचारीचा गंभीर आरोप

पुणे : नाशिकमधील TCS कार्यालयात कथित धार्मिक छळ आणि धर्मांतराच्या दबावाच्या आरोपांनंतर आता पुण्यातील आयटी कंपनी