Arbaz Patel : अरबाज आणि निक्की विवाहबंधनात अडकणार ? काय म्हणाला अरबाज ?

मुंबई : टेलिव्हिजन विश्वात सध्या रिअॅलिटी शो मोठ्या प्रामणात गाजताना पाहायला मिळतात. हे शो अनेक गोंष्टींमुळे चर्चेतही असतात. या रिअॅलिटी शोमधील भाडणं, वादविवाद, याबरोबरच अनेकांच्या जोड्याही जुळतात. मात्र, शो संपल्यानंतर यांपैकी काही जोड्या कायम एकत्र राहतात तर काही जोड्या तुटतात. अशीच एक सतत चर्चेत असणारी जोडी म्हणजे अरबाज पटेल (Arbaz patel) आणि निक्की तांबोळी (nikki tamboli) ही आहे.


निक्की आणि अरबाज ही जोडी बिग बॉस मराठीच्या मागील पर्वात सहभागी झालेली. त्यावेळी बिग बॉसच्या घरात दोघांची मैत्री झाली आणि मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. शोनंतर दोघांनी आपल्या नात्याची कबुली दिली. तर हे कपल सोशल मीडियावरही एकमोकांबद्दल प्रेम व्यक्त करत असतात. ही जोडी नुकताच पुन्हा एकदा 'द 50' या रिअॅलिटी शोमध्येदेखील सहभागी झालेली या शोमध्ये दोघांची केमिस्ट्री सर्वांना प्रचंड आवडली.


बिग बॉसच्या घरातून सुरू झालेलं यांचं नातं अजूनही टिकून आहे, त्यांच्या जोडीवर चाहतेही सतत प्रेमाचा वर्षाव करत असतात. अशातच आता दोघांना अनेकवेळा लग्न करणार का? असा प्रश्न विचारला जातो.


नुकताच द 50 रिअॅलिटी शोचा फिनाले पार पडला असून या शोचा विजेता शिव ठाकरे ठरला आहे. या शोनंतर एका मुलाखतीत बोलत असताना अरबाजने शोमधील वाद, राडा यासोबतच त्याच्या आणि निक्कीच्या नात्याबद्दलही गप्पा मारल्या. यादरम्यान दोघेही लग्न कधी करणार? या प्रश्नाचंही उत्तर अरबाजनं दिलं आहे.


दोघांच्या लग्नाबद्दल बोलताना अरबाज म्हणाला की आमच्याबद्दल तुम्ही एवढा चांगला विचार करताय, हे ऐकून खूप आनंद होतोय, लवकरच एक चांगला मुहूर्त काढू, जो चांगला मुहूर्त असेल, त्या मुहूर्तावर लग्न करू, पण सध्या ही काम करण्याची आणि यश मिळवण्याची वेळ आहे. हे वय आणि ही वेळ पैसे कमावण्याचं आणि जीवनात पुढे जाण्याचं आहे. तर जेवढ्या चांगल्या गोष्टी होतील, तेवढ्या लवकर आम्ही लग्न करू असं अरबाज दोघांच्या लग्नाबाबत म्हणाला आहे.

Comments
Add Comment

Aditya Dhar : धुरंधर २ अडचणीत येणार ? प्रसिद्ध फिल्ममेकरचे दिग्दर्शक आदित्य धरवर गंभीर आरोप, कारवाईचाही इशारा

मुंबई : धुरंधर २ सिनेमा जगभरात धूमाकूळ घालत आहे. या सिनेमानं कमाईच्या बाबतीतही सगळे रेकॉर्डब्रेक केले आहेत.

Disha Vakani : 'या' कारणामुळे तारक मेहता का उल्टा चष्मामध्ये कमबॅक करणार नाही दयाबेन? मिसेस सोडीनं केला मोठा खुलासा

मुंबई : घराघरात मोठ्या उत्सुकतेनं पाहिली जाणारी लोकप्रिय मालिका तारक मेहता का उल्टा चष्मामध्ये मिसेस सोडीची

Raja Shivaji : अखेर प्रेक्षकांची प्रतीक्षा संपली, 'राजा शिवाजी' सिनेमाचा टीझर रिलीज

मुंबई : अभिनेता रितेश देशमुखचा ( Riteish Deshmukh ) बहुप्रतिक्षित छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित सिनेमा राजा

Shahrukh Khan's King Movie : आखाती देशातील युद्धाचा बॉलीवुडलाही फटका; शाहरुखच्या 'किंग'मधील ॲक्शन सीक्वेन्समध्ये बदल

- दुबईऐवजी मुंबईत होणार चित्रीकरण मुंबई : आखाती देशातील युद्धाचा परिणाम आता चित्रपट सृष्टीवरही होताना दिसत आहे.

Dhurandhar 2 Box Office Collection Day 12 : बॉक्स ऑफिसवर 'धुरंदर २ चं' वादळ! KGF २ च्या विक्रमांना लोळवत ९०० कोटींच्या उंबरठ्यावर!

मुंबई : बॉलिवूडचा सुपरस्टार रणवीर सिंह सध्या आपल्या 'धुरंधर: द रिवेंज' (Dhurandhar 2) या चित्रपटामुळे चर्चेच्या

Persimmon of My Love : पहिला रशियन सिनेमा ज्यात खच्चून भरलाय बॉलिवूडचा मसाला

नवी दिल्ली : बातमीचं हेडिंग वाचून चक्रावला असाल. पण हा एक अभिनव प्रयोग आहे. भारतात मुंबई, उदयपूर, जयपूर येथे या