Tuesday, March 31, 2026

Leander Paes : प्रख्यात टेनिसपटू लिअँडर पेसचा भाजपमध्ये प्रवेश; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

Leander Paes : प्रख्यात टेनिसपटू लिअँडर पेसचा भाजपमध्ये प्रवेश; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

भारतीय टेनिस दिग्गज लिअँडर पेसने (Leander Paes) भाजपमध्ये प्रवेश केला आहे .पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी उचललेले हे पाऊल राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनले आहे. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू आणि भाजप नेते सुकांत मजुमदार यांच्या उपस्थितीत पेस यांचा पक्षप्रवेश झाला. पेस यांचे पक्षात सामील होणे पश्चिम बंगालच्या राजकारणात महत्त्वपूर्ण मानले जात आहे. पश्चिम बंगालमधील निवडणुकीचे वातावरण तापत असून, सर्व राजकीय पक्ष आपली रणनीती मजबूत करण्यात व्यस्त आहेत.

याप्रसंगी किरेन रिजिजू म्हणाले, "लिअँडर पेस (Leander Paes) यांचे भाजप परिवारात सामील होणे ऐतिहासिक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या १२ वर्षांपासून सातत्याने क्रीडा आणि खेळाडूंना प्रोत्साहन दिले आहे." लिअँडर यांनी हा त्यांच्या आयुष्यातील सर्वात खास दिवस असल्याचे म्हटले. ते म्हणाले, "हा माझ्या आयुष्यातील खूप मोठा दिवस आहे. मला पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह आणि नितीन नवीन यांचे आभार मानायचे आहेत." क्रीडा आणि तरुणांची सेवा करण्याची ही माझ्यासाठी एक मोठी संधी आहे.

लिअँडर पेसने (Leander Paes) भारतासाठी ऑलिम्पिक पदके आणि अनेक ग्रँडस्लॅम जिंकले आहेत आणि आता ते राजकारणात एक नवीन इनिंग सुरू करत आहे. त्यांचा भाजपमधील प्रवेश हे दर्शवतो की, क्रीडा जगतातील प्रमुख व्यक्तींना आपल्या पक्षात सामील करून पक्ष आपली पकड मजबूत करू पाहत आहे.

आपल्या कारकिर्दीची (Leander Paes) आठवण करून देताना पेस म्हणाले की,ते आता नवीन जबाबदाऱ्या स्वीकारण्यास तयार आहे. "मी ४० वर्षे देशासाठी खेळलो आहे, आता तरुणांची सेवा करण्याची वेळ आली आहे." लिअँडर पेसने केंद्र सरकारच्या क्रीडा योजनांची प्रशंसाही केली. ते म्हणाला, "खेलो इंडिया आणि टॉप्स योजना हे उत्कृष्ट उपक्रम आहेत. टोकियो ऑलिम्पिकमध्ये खेळाडूंची कामगिरी सुनिश्चित करण्यासाठी किरेन रिजिजूजींनी किती मेहनत घेतली हे मी पाहिले आहे. पंतप्रधानांनी त्यांना दिलेली भूमिका त्यांनी खूप चांगल्या प्रकारे पार पाडली."

यावेळी त्यांनी (Leander Paes) बंगालमधील क्रीडा सुविधांच्या कमतरतेबद्दलही उघडपणे भाष्य केले. ते म्हणाले, "भारत हा जगातील सर्वात तरुण देश आहे. पुढील २०-२५ वर्षांत आपण क्रीडा शिक्षणावर लक्ष केंद्रित केले पाहिजे." १९८६ मध्ये पश्चिम बंगालमध्ये क्रीडा पायाभूत सुविधांची खूप कमतरता होती. आजही बंगालमध्ये इनडोअर टेनिस कोर्टची कमतरता आहे. बंगाल, तामिळनाडू आणि बिहार यापेक्षा चांगली कामगिरी करू शकतात, पण आपण क्रीडा शिक्षणाच्या माध्यमातून तरुणांना प्रेरणा देण्यावर आणि त्यांना सक्षम करण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. भारतातील महिला सक्षमीकरणासाठी समान संधी शिष्यवृत्ती कार्यक्रम सुरू करणे हे माझे स्वप्न आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >