Tuesday, March 31, 2026

Kalyan News : कल्याण हादरलं! गांधारी परिसरात नागाचा थरार; एकापाठोपाठ तीन भटक्या कुत्र्यांचा मृत्यू

Kalyan News : कल्याण हादरलं! गांधारी परिसरात नागाचा थरार; एकापाठोपाठ तीन भटक्या कुत्र्यांचा मृत्यू

कल्याण : कल्याण पश्चिम भागातील गांधारी परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि भीतीदायक घटना समोर आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून एका गॅरेजमध्ये लपून बसलेल्या विषारी नागाने परिसरात दहशत निर्माण केली असून, या नागाच्या दंशामुळे तीन भटक्या कुत्र्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे गांधारी परिसरातील रहिवाशांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे.

नेमकी घटना काय?

">मिळालेल्या माहितीनुसार, गांधारी परिसरातील एका गॅरेजमध्ये हा नाग गेल्या अनेक दिवसांपासून लपून होता. परिसरात वावरणाऱ्या तीन भटक्या कुत्र्यांवर या नागाने अचानक हल्ला चढवला. नागाने केलेल्या विषारी दंशामुळे या तिन्ही कुत्र्यांची प्रकृती खालावली आणि काही वेळातच त्यांचा मृत्यू झाला. एकापाठोपाठ एक अशा तीन कुत्र्यांचा मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आणि नागरिकांच्या लक्षात आले की परिसरात एखादा विषारी साप वावरत आहे. परिसरात नाग असल्याची खात्री पटताच स्थानिक नागरिकांनी तातडीने सर्पमित्र दत्ता बोंबे यांना पाचारण केले. दत्ता बोंबे यांनी घटनास्थळी धाव घेत अत्यंत कौशल्याने त्या नागाला पकडले. हा नाग प्रचंड विषारी असल्याची माहिती समोर आली आहे. नागाला पकडल्यानंतर नागरिकांनी सुटकेचा निःश्वास टाकला. पकडलेल्या नागाला सुरक्षितरीत्या वनविभागाच्या मदतीने नैसर्गिक अधिवासात (जंगलात) सोडण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

प्रशासनाचे आणि सर्पमित्रांचे आवाहन

या घटनेमुळे गांधारी परिसरात भीतीचे सावट अजूनही कायम आहे. पावसाळा आणि वाढलेले गवत यामुळे सापांचा मानवी वस्तीत वावर वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे नागरिकांनी आपल्या घराच्या आसपासचा परिसर स्वच्छ ठेवावा, भंगार किंवा गॅरेज सारख्या ठिकाणी अंधारात जाताना काळजी घ्यावी, असे आवाहन सर्पमित्र दत्ता बोंबे आणि प्रशासनाकडून करण्यात आले आहे. तसेच साप आढळल्यास त्याला मारू नका, तर तात्काळ सर्पमित्रांशी संपर्क साधावा, अशी विनंतीही करण्यात आली आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >