२४ लाख ७३ हजार थकबाकीदार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा

३० जूनआधी प्रक्रिया पूर्ण करणार; राज्यस्तरीय बँकर्स कमिटीचा अहवाल तयार


मुंबई : राज्यातील लाखो शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजने'च्या अंमलबजावणीला आता वेग आला आहे. राज्यस्तरीय बँकर्स कमिटीने थकबाकीदार शेतकऱ्यांचा सविस्तर अहवाल तयार केला असून, यामुळे सुमारे २४ लाख ७३ हजार ५६६ शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा झाला आहे. ३० जूनपर्यंत ही सर्व प्रक्रिया पूर्ण करण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवले आहे.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात दोन लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीची घोषणा केली होती. या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी सहकार विभागाने जिल्हा मध्यवर्ती आणि राष्ट्रीयीकृत बँकांकडून थकबाकीदार शेतकऱ्यांची माहिती संकलित केली आहे. विशेष म्हणजे, केवळ पीककर्जच नव्हे, तर मध्यम व दीर्घ मुदतीच्या कर्जाचाही यात समावेश करण्यात आला असून, ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत थकबाकी असलेल्या पात्र शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे.


बँकर्स कमिटीच्या अहवालानुसार, राज्यातील १ कोटी ३३ लाख शेतकऱ्यांपैकी सुमारे २४ लाख ७३ हजार शेतकरी थकबाकीदार आहेत. त्यांच्याकडे एकूण ३५ हजार ४७७ कोटी रुपयांची थकबाकी आहे. यात सोलापूर, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, नांदेड आणि अहिल्यानगरसह एकूण १४ जिल्ह्यांमध्ये थकबाकीचे प्रमाण सर्वाधिक आहे. या शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन लाख रुपयांपर्यंतची रक्कम थेट जमा केली जाणार आहे.



नेमके निकष काय?


या कर्जमाफीबाबत महत्त्वाची बाब म्हणजे, फक्त थकीत पीककर्जच माफ होईल असा निकष सरकारने ठेवलेला नाही. अनेक शेतकऱ्यांचे पीककर्ज नियमित असले तरी शेतीसाठी घेतलेले मध्यम किंवा दीर्घ मुदतीचे कर्ज थकले आहे. अशा शेतकऱ्यांनाही दोन लाखांच्या मर्यादेत कर्जमाफीचा लाभ दिला जाणार आहे. पीककर्ज परतफेडीची मुदत ३० जून असते, त्याआधीच ही प्रक्रिया पूर्ण करून शेतकऱ्यांना सातबारा कोरा करण्याची संधी दिली जाईल, असे सहकार विभागातील सूत्रांनी सांगितले.

Comments
Add Comment

BMC News : मालाड धारवलीत अनधिकृत डेब्रीज टाकणाऱ्यांविरोधात एफआयआर; महापालिकेने कंबर कसली, आता यापुढे गय केली जाणार नाही!

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेने बांधकाम व पाडकामाचा रोडारोड्याची अनधिकृत विल्हेवाट

BMC News : मुंबईत स्मार्ट कृत्रिम टर्फ धोरणाची मागणी; महापालिकेचा महसूल वाढवण्यासाठी नगरसेवकाने केली सूचना

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईकरांचे मोकळे मैदान, सार्वजनिक शांतता आणि आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी, 'कृत्रिम टर्फ'

Pradeep Rawat : लगान, गझनीतून चमकलेले; महाभारतातील अश्वत्थामा फेम अभिनेते प्रदीप रावत यांचे ७४ व्या वर्षी निधन

मुंबई : लगान, गझनी, छावा अशा अनेक गाजलेल्या हिंदी चित्रपटांतून भूमिका साकारलेले महाभारतातील अश्वत्थामा फेम

UPI : आता UPI सशुल्क होणार ? लोकसभेत सादर झालेल्या विधेयकातील तरतुदी समजून घ्या

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मंगळवार ४ ऑगस्ट २०२६ रोजी लोकसभेत एक विधेयक सादर केले. या

SIR Campaign : राज्यात 'एसआयआर' मोहिमेला १७ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

मुंबई : राज्यात सुरू असलेल्या विशेष सघन मतदार यादी पुनरिक्षण म्हणजेच 'एसआयआर' मोहिमेला (SIR Campaign) १७ ऑगस्टपर्यंत

Bihar and Bengal : बिहार-बंगालमध्ये वीज कोसळून ११ मृत्यू , भूस्खलनामुळे बद्रीनाथ महामार्ग ठप्प; मुसळधार पावसाचा अनेक राज्यांना वेढा

नवी दिल्ली : अनेक राज्यांत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवनावर मोठा परिणाम झाला असून वाहतूक, दैनंदिन