दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणी एनआयएची काश्मिरात छापेमारी

श्रीनगर : दिल्लीतील लाल किला स्फोट प्रकरणाच्या तपासात राष्ट्रीय जांच एजेंसी (एनआयए) ने आज, सोमवारी पहाटे काश्मीर खोऱ्यात मोठी कारवाई करत एकूण १२ ठिकाणी छापेमारी केली. या कारवाईत हंदवाडा, कुपवाडा, कुलगाम, रफियाबाद आणि सोपोर या भागांचा समावेश होता.


हंदवाडा जिल्ह्यातील गुलोरा परिसरात एका मोठ्या व्यावसायिकाच्या घरावर एनआयएच्या पथकाने छापा टाकला. अधिकाऱ्यांनी संबंधित ठिकाणी सखोल झडती घेत कागदपत्रे, इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि इतर संशयास्पद साहित्याची तपासणी केली. सूत्रांच्या माहितीनुसार, पथकाने पहाटेच कारवाई सुरू केली होती. यापूर्वीही दिल्लीतील स्फोट प्रकरणाच्या अनुषंगाने एनआयएने काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणावर छापेमारी केली होती. काजीगुंड, शोपियां आणि पुलवामा या भागांमध्ये संशयितांच्या ठिकाणांची तपासणी करण्यात आली होती. या कारवाईत डॉ. अदील, जासिर बिलाल, मौलवी इरफान, डॉ. मुझम्मिल आणि आमिर रशीद यांच्याशी संबंधित ठिकाणांचा समावेश होता.


दरम्यान, दिल्लीतील लाल किला मेट्रो स्थानकाजवळ १० नोव्हेंबर २०२५ रोजी झालेल्या स्फोटात १५ जणांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यात एका जिहादी दहशतवाद्याने कारमधून स्वतःला उडवून दिले होते. या घटनेनंतर देशभरातील सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाल्या असून तपास यंत्रणा या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

Comments
Add Comment

एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेसचा पश्चिम आशियासाठी ३० विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय

नवी दिल्ली : अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यांनंतर, अनेक विमान कंपन्यांना पश्चिम आशियाई देशांमधील

धक्कादायक! भारतीय वायुसेना कर्मचारी करत होता पाकिस्तानसाठी हेरगिरी; आसाममधून अटक

वायुसेना आणि राजस्थान गुप्तचर विभागाच्या संयुक्त पथकाने आसाममधील वायुसेना तळावर कार्यरत असलेल्या एका

मुस्लिम डॉक्टरने गुंगीचे इंजेक्शन देत केला हिंदू मुलीवर बलात्कार; मध्यप्रदेशातील संतापजनक घटना

इंदूर: मध्य प्रदेशातील इंदूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका मुस्लिम डॉक्टरने एका हिंदू तरुणीवर

भारताने पुन्हा एकदा गाठला एक अब्ज टन कोळसा उत्पादनाचा टप्पा

- देशाच्या ऊर्जा सुरक्षेला मिळणार आणखी बळकटी भारताने २० मार्च २०२६ रोजी सलग दुसऱ्या वर्षी १ अब्ज टन कोळसा

Iran-US-Israel War : भारतीय भूमीचा इराण हल्ल्यासाठी वापर नाही; भारताने फेटाळून लावले 'ते' दावे

भारत सरकारने सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका दाव्याचे खंडन करत स्पष्ट केले आहे की, भारताने अमेरिकेला आपल्या

आसाममध्ये पोलीस कमांडो कॅम्पवर दहशतवादी हल्ला

तिनसुकिया : आसामच्या तिनसुकिया जिल्ह्यातील पोलीस कमांडो कॅम्पवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. रविवारी मध्यरात्री