उन्हाळा येताच लिंबू महागले

मुंबई : उन्हाळा येताच किरकोळ बाजारात लिंबू महागले आहे. सध्या किरकोळ बाजारात आकारमानानुसार लिंबू प्रति नग १०, १२, १५ रुपये दराने विकले जात आहे. अन्नाची लज्जत वाढवणारे, पचनक्रिया सुधारण्यास मदत करणारे, शरीराची क जीवनसत्त्वाची (व्हिटॅमिन सी) गरज भागवणारे, उन्हाळ्यात सरबताच्या रुपात तहान भागविणारे लिंबू महागले आहे. यामुळे एरवी बाजारात आल्यास हमखास लिंबू खरेदी करणारे ग्राहक आता हात आखडता घेऊ लागले आहेत.


महाराष्ट्रात प्रामुख्याने अहिल्यानगरमधील श्रीगोंदे तसेच सोलापूर, जळगाव, बुलढाणा आणि अकोल्याच्या काही भागांतून मोठ्या प्रमाणात लिंबांचा पुरवठा होतो. आंध्र प्रदेश आणि कर्नाटकमधूनही राज्यात लिंबाची आवक होते. पण राज्यातले लिंबाचे आगार म्हणून श्रीगोंद्याचीच ओळख आहे. मात्र सध्या लिंबाच्या व्यापारावर प्रतिकूल परिणाम झाला आहे.


उत्पादकांकडून दलाल प्रतिकिलो ८० ते ८५ रुपये दराने लिंबाची खरेदी करत आहेत. एका किलोत साधारण २५ ते ३० लिंब दलाल घेत आहेत. हे दलाल मुंबई - पुण्यातील घाऊक व्यापाऱ्यांना प्रतिकिलो १५० रुपये दराने लिंबांची विक्री करत आहेत. घाऊक व्यापाऱ्यांकडून किरकोळ व्यापारी लिंब खरेदी करून ती ग्राहकांपर्यंत पोहोचवत आहेत. उत्पादक, दलाल, घाऊक व्यापारी, किरकोळ व्यापारी ते ग्राहक अशी ही साखळी आहे. या साखळीत दलालापासून ते किरकोळ व्यापाऱ्यापर्यंतचे सगळे नफा कमावत आहेत. यामुळेच ग्राहकाला लिंबू दहा ते पंधरा रुपये प्रति नग या दराने उपलब्ध आहे. एरवी दहा रुपयांत किमान दोन ते तीन लिंबू उपलब्ध असतात. पण सध्या दहा ते पंधरा रुपयांत एक मध्यम आकाराचे लिंबू मिळत आहे.

Comments
Add Comment

Anant Ambani : हिप्पोंना मारु नका, वनतारामध्ये पाठवा; अनंत अंबानी यांची कोलंबिया सरकारला विनंती

मुंबई : उद्योगपती अनंत अंबानी यांचे प्राणीप्रेम पुन्हा एकदा समोर आले आहे. दक्षिण अमेरिकेतील कोलंबिया देशात

Mumbai News : मुंबईत पाण्याचा निचरा करण्यासाठी ५४७ पंपांची आणि फिरते डीवॉटरिंग पंप असणाऱ्या १० वाहनांची व्यवस्था

मुंबईत यंदा पाणी साचण्याची फक्त ८० ठिकाणे मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईत पावसाळ्यात पाणी साचणाऱ्या ठिकाणांची

BMC News : 'मध्य वैतरणा प्रकल्प राबवताना तुमचे पर्यावरण प्रेम कुठे होते?'

मुंबई : मुंबई महापालिकेच्यावतीने गारगाई पाणी प्रकल्पाच्या कामाला गती देण्यासाठी स्थायी समिती व महापालिका

single-window clearance : लाईव्ह इव्हेंट्स परवानगीसाठी ‘एक खिडकी’ सुविधा

मुंबई : राज्यातील लाईव्ह मनोरंजन क्षेत्राला चालना देण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. लाईव्ह

Godavari to Narmada : असा होणार गोदा ते नर्मदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलयात्रेचा समारोप समारंभ

मुंबई : जलव्यवस्थापन अधिक गतिमान, लोकाभिमुख आणि जनसहभागातून प्रभावी करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या

Seeds Act : राज्याचा स्वतंत्र बियाणे कायदा करणार

मुंबई : शेतकऱ्यांना स्वतःचे बियाणे साठवणे, वापरणे, देवाणघेवाण करणे आणि (ब्रँडेड नाव न वापरता) विक्री करण्यास