मुंबई : 'धुरंधर २' हा बहुचर्चित हिंदी चित्रपट गुरुवार १९ मार्च २०२६ रोजी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर प्रदर्शित होत आहे. हा चित्रपट शोले आणि मुघल-ए-आझम पेक्षा १०० पट चांगला आहे असे मत प्रसिद्ध निर्माता दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी व्यक्त केले आहे.
After last nights watch of #Dhurandhar2 in terms of it’s sheer cumulative impact in every which way , whether on it’s expected collections , audience euphoria , social influences , cinematic grammar breaking , and above all the psychological audio visual impact , it will be a…
— Ram Gopal Varma (@RGVzoomin) March 18, 2026
'धुरंधर २' च्या निमित्ताने नवीन चित्रपटयुगाचा जन्म आहे. आणि चित्रपटसृष्टीच्या पूर्वीच्या जगात अस्तित्वात असलेल्या प्रत्येक गोष्टीचा हा निर्दयी अंत आहे. आता 'दिग्दर्शक' या शब्दाचे स्पेलिंगसुद्धा आदित्य धर असे असेल. आणि स्टीव्हन स्पीलबर्ग व क्रिस्टोफर नोलन यांनी आपली सर्व कामे सोडून 'धुरंधर २' चा प्रदर्शनाच्या दिवशीचा पहिला शो पाहणे हेच शहाणपणाचे आणि योग्य ठरेल; या शब्दात प्रसिद्ध निर्माता दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी एक्स पोस्ट (ट्विटर) करून 'धुरंधर २'चे कौतुक केले. याआधी 'धुरंधर २' मधील 'आरी आरी' या गाण्याच्या लाँचवेळी खरे धुरंधर हे प्रेक्षक असल्याचे मत अभिनेत्री साराने व्यक्त केले होते.
राम गोपाल वर्मा हा वेगळ्या धाटणीच्या चित्रपटांसाठी तसेच नवनवे धाडसी प्रयोग करण्यासाठी प्रसिद्ध असलेला निर्माता दिग्दर्शक म्हणून ओळखला जातो. त्याने हिंदी, कन्नड, तेलुगु भाषेच चित्रपट आणि टीव्ही मालिकांची निर्मिती केली आहे. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, नंदी पुरस्कार, फिल्मफेअर, दाक्षिणात्य फिल्मफेअर, आय.आय.एफ.ए. असे अनेक पुरस्कार त्याने मिळवले आहेत. शिवा, रंगीला, सत्या, शूल, जंगल, कंपनी, भूत, अब तक छप्पन, सरकार हे राम गोपाल वर्माचे प्रचंड लोकप्रिय झालेले निवडक चित्रपट आहेत.






