रब्बी हंगामातील 'ई-पीक पाहणी'ला ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ

- ४५ टक्के शेतकरी अजूनही प्रक्रियेबाहेर; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा


मुंबई : राज्यातील रब्बी हंगाम २०२५-२६ मधील 'ई-पीक पाहणी' करण्याची मुदत आता ३१ मार्च २०२६ पर्यंत वाढवण्यात येत असल्याची घोषणा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी विधानसभेत केली.


बावनकुळे म्हणाले की, "२५ जानेवारी २०२६ पासून सहाय्यक स्तरावर ई-पीक पाहणीची नोंदणी सुरू करण्यात आली आहे. मात्र, आतापर्यंत रब्बी हंगामातील पिकांची केवळ ५५.६९ टक्के नोंदणी पूर्ण झाली आहे. सुमारे ४५ टक्के शेतकरी या नोंदणी प्रक्रियेपासून लांब आहेत. ही नोंदणी १०० टक्के पूर्ण व्हावी, या हेतूने सरकारने मुदत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.पीक विम्यासह सरकारी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी ई-पीक पाहणी अत्यंत महत्त्वाची आहे.”


जमाबंदी आयुक्त आणि कृषी आयुक्त यांनी समन्वयाने काम करून 'ॲग्री स्टॅक' मधील डेटाची नोंदणी तातडीने पूर्ण करावी," अशी सूचना प्रशासनाला केली असल्याचे सांगून बावनकुळे म्हणाले की, पीक पाहणीची पडताळणी अचूक आणि वेळेत व्हावी, यासाठी विशेष लक्ष दिले जाणार आहे.

Comments
Add Comment

ग्रामीण भागातील घरबांधणी आता होणार सुलभ; बांधकाम परवानगीचे अधिकार तालुका स्तरावर देण्याचे संकेत!

- मंत्री उदय सामंत यांचे विधानपरिषदेत आश्वासन मुंबई : राज्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना आपल्या घराच्या

Jalna: गॅस एजन्सीचे गोडाऊन फोडले अन् ११० सिलिंडर चोरले, जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

जालना: जालना तालुक्यातील रामनगर परिसरात गॅस एजन्सीच्या गोडाऊनमध्ये चक्क गॅस सिलिंडरची मोठी चोरी झाल्याचा

Weather Update: महाराष्ट्रातील ११ जिल्ह्यांना अलर्ट, ताशी ३० ते ५० किमी वेगाने वारे वाहणार

मुंबई: महाराष्ट्रावर ऐन उन्हाळ्यात अस्मानी संकट घोंघावत आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीला उष्णतेच्या लाटेने

लालपरीचा कायापालट, २२ हजार बसेस पूर्णपणे बदलणार; मंत्री सरनाईकांची माहिती

मुंबई : ग्रामीण महाराष्ट्राची लाईफलाईन मानली जाणारी लालपरी आता मोठ्या बदलाच्या दिशेने वाटचाल करत आहे. राज्य

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी, गॅस बुकींगनंतर ९६ तासांत सिलेंडर घरपोच होणार; जिल्हाधिकाऱ्यांचे एजन्सींना आदेश

पुणे: मराठी नववर्षारंभ म्हणजेच गुढी पाडव्याचा सण अवघ्या दोन-तीन दिवसांवर येऊन ठेपला असताना गॅस टंचाईमुळे

सेवानिवृत्त एस.टी. कर्मचाऱ्यांना पत्नीसह वर्षभर मोफत प्रवास करता येणार; मंत्री प्रताप सरनाईकांनी दिली माहिती

मुंबई: एस.टी. कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर सकारात्मक तोडगा काढण्यासाठी राज्याचे परिवहन मंत्री