Friday, March 13, 2026

Ratnagiri: रत्नागिरीत भूकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये भीती

Ratnagiri: रत्नागिरीत भूकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये भीती

रत्नागिरी: कोकणात सध्या अनेक गावात पालखी येते.त्यामुळे कोकणवासियांची कोकणात प्रचंड गर्दी जमली आहे. अनेक चाकरमानी या पालखीसाठी आपआपल्या गावी गेले आहेत.या दरम्यान रत्नागिरीत भुकंपाचे धक्के बसल्याची घटना घडली आहे. आज रात्री ८.१९ मिनिटांनी हा भूकंप नोंदविण्यात आला आहे. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता २.८ इतकी मोजण्यात आली आहे.

नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीने दिलेल्या माहितीनुसार,१२ मार्च २०२६ रोजी ८.१९ मिनिटांनी हा भूकंप नोंदविण्यात आला आहे. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता २.८ इतकी मोजण्यात आली आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू अक्षांश १६.९२ उत्तर व रेखांश ७३.४४ पूर्व या दरम्यान रत्नागिरी परिसरात जमीनीखाली सुमारे १० किलोमीटर खोलीवर असल्याची नोंद करण्यात आली आहे.

रिष्टर स्केलवर या भूकंपाच्या धक्क्याची तीव्रता २.८ इतकी नोंदवली आहे.त्यामुळे हा एक सौम्य धक्का होता.यामुळे काही वेळ नागरीक घराबाहेर पडले होते. या घटनेत सुदैवाने कोणतीही वित्तहानी आणि जिवीतहानी झालेली नाही आहे.पण या घटनेने गावात घबराट पसरली आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >