मुंबई असुरक्षित असल्याच्या अफवा संजय राऊत पसरवतात, नवनाथ बन यांचा हल्लाबोल

मुंबई : मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये मुंबई, महाराष्ट्र सुरक्षित आहे. संजय राऊतांना त्याची काळजी करण्याची गरज नाही. विधानभवनाबद्दल धमकी आणि ज्या कोणी अफवा पसरवण्याचे काम केले त्यावर निश्चितपणे कारवाई केली जाईल. मात्र ‘मुंबई सुरक्षित नाही’ अशा पद्धतीच्या अफवा पसरवण्याचे काम नियोजनबद्ध रीतीने राऊत यांच्यामार्फत केले जात आहे असा हल्लाबोल भारतीय जनता पार्टीचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी गुरुवारी केला. जेव्हापासून केंद्रामध्ये पंतप्रधान मोदी आहेत, तेव्हापासून मुंबईकडे कोणी वाकड्या नजरेने बघू शकले नाही. तत्कालिन मविआ सरकारचे गृहमंत्री शंभर कोटींची वसुली कशी करत होते हे राऊतांनी आठवावे आणि मग इतरांवर टीका करावी असे टीकास्त्रही त्यांनी सोडले.


स्वतः सालगडी असणा-या राऊतांनी साला या शब्दावर आक्षेप घेणे म्हणजे विनोद आहे असा टोमणा बन यांनी लगावला. काँग्रेसला देशाची आणि भारतीयांची काळजी नाही. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेसची कॉमेडी सर्कस सुरू असून या सर्कसमध्ये मनोरंजनासाठी विदूषक म्हणून संजय राऊतांना चाकरीला ठेवले आहे असे शरसंधान त्यांनी साधले.


इराण इस्राएल युद्धाच्या परिस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी नेमके काय करतात या भानगडीत राऊतांनी पडू नये. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देश प्रगतीपथावर असून आखाती देशांतील युद्धाच्या स्थितीतही सुरक्षित आहे. पंतप्रधान काय करतात हे आत्ता युद्धजन्य स्थितीत दिसून आले पण हे समजण्याएवढी राऊतांची बौद्धीक कुवत नाही. जगातील भल्या भल्या देशांना युद्धाची झळ बसली असताना भारत देश आणि भारतीय निश्चिंत आणि सुरक्षित रहावेत यासाठी पंतप्रधान मोदी आणि त्यांचे मंत्रिमंडळ सातत्याने बैठका घेतात, युद्धस्थितीत भारताला कमीतकमी झळ बसावी यासाठी उपाययोजना करत आहेत. घरात बसून फेसबुक लाईव्ह करणा-यांना याचे मोल कळणार नाही असा टोला नवनाथ बन यांनी लगावला.


अफजलखान, औरंगजेबाचा उदो उदो करण्यात धन्यता मानणा-या राऊतांना, उबाठा गटाला ‘जय श्री राम’ घोषणेचे महत्व कळणार नाही अशी बोचरी टीका बन यांनी केली. ‘जय श्री राम’ चे नामस्मरण करण्यास तुम्हाला लाज वाटत असेल आम्हाला मन:शांती आणि आनंद मिळतो. ‘जय श्री राम’ चा संबंध गॅस सिलेंडर पुरवठा करण्याशी जोडून राऊतांनी वैचारिक आणि बौद्धीक पातळी किती खालावली आहे हे दाखवून दिले आहे. देशाचे संरक्षण करण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी सक्षम आहेत त्याची चिंता राऊतांनी करूच नये असेही बन यांनी खडसावले.

Comments
Add Comment

सुधीर मुनगंटीवार आणि विधानसभा अध्यक्षांमध्ये नियमावलीवरून जुंपली

संविधानातील कलमाचा दाखला देत नार्वेकरांनी फटकारले; खासगी विधेयकावरून विधानसभेत खडाजंगी मुंबई : सरकारी

लाडकी बहीण योजनेतील चुकीच्या तांत्रिक माहितीमुळे लाभ थांबलेल्या महिलांना न्याय!

मंत्री आदिती तटकरे यांची मोठी घोषणा मुंबई : 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेचा लाभ घेणाऱ्या संगमनेर

'टेक्नोक्राफ्ट कंपनीच्या संपावर तोडगा काढून कामगारांना त्वरित कामावर घ्या'

कामगार मंत्री आकाश फुंडकर यांचे निर्देश मुंबई : टेक्नोक्राफ्ट इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेड (धानिवली, ता. मुरबाड, जि.

“देशाची बदनामी करून राजकारण करणाऱ्यांना जनता ओळखते”

- राहुल गांधींवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची जोरदार टीका - देशात गॅस किंवा इंधनाचा तुटवडा निर्माण होऊ नये

राज्याला जागतिक स्तरावर नेण्यासाठी पायाभूत विकासाला प्राधान्य

मुंबई : महाराष्ट्र देशाच्या आर्थिक आणि औद्योगिक विकासाचे इंजिन असून राज्याला जागतिक स्तरावर नेण्यासाठी

संगणक परिचालकांचे मानधन १५ हजार होणार; कंत्राटी पद्धत हटवून थेट मानधन देण्याबाबत सरकार सकारात्मक

मंत्री जयकुमार गोरे यांची विधान परिषदेत मोठी घोषणा मुंबई : राज्यातील ग्रामपंचायती आणि जिल्हा परिषदांमध्ये