अर्जुन आणि सानियाला दिल्या अमित शाह यांनी खास पत्रातून शुभेच्छा

मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भारताचे माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांच्या कुटुंबाला विशेष शुभेच्छापत्र पाठवले आहे. सचिन तेंडुलकर यांचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याच्या विवाहानिमित्त हे पत्र पाठवण्यात आले आहे.


६ मार्च २०२६ रोजी पाठवलेल्या या पत्रात अमित शाह यांनी अर्जुन तेंडुलकर आणि त्याची पत्नी सानिया यांना वैवाहिक जीवनासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत. प्रेम, विश्वास आणि आनंदाने परिपूर्ण असलेल्या या नव्या आयुष्याच्या प्रवासासाठी त्यांनी या दोघांना शुभाशिर्वाद दिले आहेत.


या पत्रात भारतीय संस्कृतीत विवाह हा केवळ दोन व्यक्तींचा नव्हे तर दोन कुटुंबांचा पवित्र बंध असल्याचेही नमूद करण्यात आले आहे. भगवान श्री गणेशाच्या कृपेने या दोघांना आयुष्यात आनंद, समृद्धी आणि यश मिळो, हीच प्रार्थना.


तसेच तेंडुलकर कुटुंबाच्या संस्कारांचे कौतुक करत अमित शाह यांनी संपूर्ण कुटुंबाला शुभेच्छा दिल्या आहेत. अमित शाह यांचे हे पत्र सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

Sh. Sachin Tendulkar Ji (1)

Comments
Add Comment

Hardik Pandya : हार्दिक पांड्याच्या 'त्या' कृतीवरून वाद; राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याने पुण्यात तक्रार

हार्दिक पांड्या याच्याविरोधात राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याचा आरोप करत पुण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

FIFA 2026 : फिफा २०२६ च्या विश्वचषकातून इराण बाहेर; फिफाने ठोठावला इराणला दंड

- या भ्रष्ट राजवटीने आमच्या नेत्याची हत्या केली, आम्ही कोणत्याही परिस्थितीत विश्वचषकात सहभागी होऊ शकत

IPL 2026 : आयपीएल२०२६ पर्वाचे वेळापत्रक जाहीर; आरसीबी आणि एसआरएचमध्ये होणार सलामीची लढत

मुंबई : आयपीएल २०२६ च्या पहिल्या टप्प्याचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) १९

अर्जुन पुरस्काराचे मानकरी जलतरणपटू वीरधवल खाडे सरकारी नोकरीत

मुंबई : राज्याचे नाव क्रीडा क्षेत्रात जागतिक स्तरावर नेणारे नामवंत जलतरणपटू आणि माजी तहसीलदार वीरधवल खाडे

BCCI कडून विश्वविजेत्या टीम इंडियाला १३१ कोटींचं बक्षिस , परंतु प्रत्यक्षात एवढे पैसे मिळणार

मुंबई: टी२० विश्वचषक २०२६ मधील ऐतिहासिक विजयानंतर भारतीय संघावर बीसीसीआयकडून बक्षिसांचा वर्षाव करण्यात आला

T20 World Cup 2026 : आयसीसी 'टीम ऑफ द टूर्नामेंट'मध्ये चार भारतीय क्रिकेटपटूंचा समावेश

आयसीसीने टी-२० साठी सर्वोत्तम संघ निवडला असून या संघात चार भारतीय क्रिकेटपटूंचा समावेश करण्यात आला आहे. संजू