बोर्डाच्या परीक्षेसाठी AI चा वापर करून शिक्षकांनीच पुरवल्या कॉपी; तब्बल इतके शिक्षक निलंबित

मुंबई : महाराष्ट्रात दहावी-बारावीच्या बोर्ड परीक्षेदरम्यान एआय तंत्रज्ञानाचा गैरवापर करून कॉपी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात सहभागी असल्याचे आढळल्यानंतर राज्यातील तब्बल ८१ शिक्षकांना तात्काळ निलंबित करण्यात आले आहे.


महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळा यांनी दिलेल्या माहितीनुसार, परीक्षेदरम्यान काही ठिकाणी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) चा वापर करून उत्तरं मिळवली जात होती. यासाठी विशेषतः ChatGPT सारख्या साधनांचा वापर करून कॉपी केल्याचे समोर आले आहे.


या प्रकरणात बीड जिल्ह्यात सर्वाधिक कारवाई करण्यात आली. बीडमधील चौसाळा परीक्षा केंद्रात अनेक शिक्षक यात सहभागी असल्याचे तपासात उघड झाले. काही ठिकाणी शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी संगनमत केले होते. तंत्रज्ञानाच्या मदतीने उत्तरं पुरवली जात होती.


मंडळाने केलेल्या प्राथमिक चौकशीनंतर संबंधित शिक्षकांना निलंबित करण्यात आले असून या प्रकरणात पुढील शिस्तभंगाची कारवाई होण्याची शक्यता आहे. परीक्षेची पारदर्शकता टिकवून ठेवण्यासाठी आणि तंत्रज्ञानाचा गैरवापर थांबवण्यासाठी मंडळाने ही कठोर कारवाई केल्याचे सांगितले आहे.

Comments
Add Comment

LPG Booking Rule : LPG सिलेंडरच्या बुकिंग कालावधीत वाढ; किती दिवसांनी दुसरा बुक करता येणार?

मुंबई : पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या इराण-इस्त्रायलच्या संघर्षाचा फटका आता भारताला बसत असल्याचं दिसून येतं

मालाडला पाणी पुरवठा करणाऱ्या पाण्याच्या टाकीचे बांधकाम झाले जुने

मुंबई : मालाड परिसरातील पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या मालाड टेकडी जलाशय-२ चे

महापौरांनी जाहीर केला १०० दिवसांचा कार्यक्रम

मुंबई: मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी दिनांक ११ फेब्रुवारी २०२६ रोजी महापौर पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर

बहुप्रतिक्षित गारगाई धरणाच्या कामाला गती; तब्बल १.२ मेगावॅटर वीज निर्मिती प्रकल्पही उभारणार

मुंबई: गारगाई नदीवर प्रस्तावित धरण प्रकल्पाच्या कामाला आता गती देण्यात येणार असून या धरण प्रकल्पाच्या कामासाठी

विक्रोळी,भांडुप-मुलुंडच्या एस अँड टी प्रभाग समिती अध्यक्षपदी भाजपच्या साक्षी दळवी

मुंबई: ‘एस आणि ‘टी' प्रभाग समितीच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत चक्क पुन्हा एकदा उबाठाला मोठा धक्का बसला

अंबरनाथमध्ये केमिकल कंपनीत भीषण आग; स्फोटानंतर आगीचा भडका होताच कामगार धावले

ठाणे: ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली एमआयडीसीतील कंपन्यांमध्ये होणाऱ्या स्फोटावरुन सातत्याने येथील सुरक्षेचा