मुंबईच्या नायर रुग्णालयाला ईमेलद्वारे बॉम्बस्फोटाची धमकी

मुंबई : मुंबईच्या नायर रुग्णालयाला ईमेलद्वारे धमकी मिळाली आहे. संध्याकाळी चार वाजता बॉम्बस्फोट करून रुग्णालय उडवून देऊ अशी धमकी देण्यात आली आहे. धमकी मिळताच रुग्णालय प्रशासनाने पोलिसांना माहिती दिली आहे. माहिती मिळताच मुंबई पोलिसांचे पथक तसेच बॉम्ब स्क्वाड आणि डॉग स्क्वाड घटनास्थळी पोहोचले. संपूर्ण रुग्णालयात तपासणी करण्यात आली. या तपासणीत बॉम्ब सापडला नाही. अखेर ई मेलद्वारे फक्त त्रास देण्याच्या हेतूने धमकी देण्यात आल्याचे लक्षात आले. पोलिसांनी सायबर तज्ज्ञांच्या मदतीने ई मेल पाठवणाऱ्या व्यक्तीचा शोध सुरू केला. धमकीचा मेल पाठवणाऱ्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.


धमकी देऊन दहशत पसरवणे, अफवा पसरवून दहशत निर्माण करणे, दिशाभूल करणारी माहिती देऊन सार्वजनिक व्यवस्थेवर ताण निर्माण करणे हे गंभीर गुन्हे आहेत. नायर रुग्णालय प्रकरणी सायबर तज्ज्ञांची मदत घेतली जात आहे. धमकी देणाऱ्या व्यक्तीला लवकरच शोधू आणि अटक करू, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला.

Comments
Add Comment

BMC : स्वच्छतेबाबत महापालिकेचा वॉर रुम; महापालिका आयुक्तांनी दिले निर्देश

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईत स्वच्छतेसंदर्भातील कामकाज प्रभावीपणे होत असल्याच

Gargai Water Project : उबाठाला द्यायचे नाही मुंबईकरांना अतिरक्त पाणी; गारगाई पाणी प्रकल्पाला केला विरोध

- गारगाई पाणी प्रकल्पाला महापालिकेची मंजुरी, बहुमताच्या जोरावर प्रस्ताव मंजूर मुंबई (विशेष

Shivendrasinhraje Bhonsle : मंत्रालयातील नवीन इमारतीच्या बांधकामाचा सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी घेतला सविस्तर आढावा

मंत्रालय परिसरात उभारण्यात येत असलेल्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या बांधकामाचा सार्वजनिक बांधकाम मंत्री

Saudi and Iran : शस्त्रसंधीनंतर सौदी आणि इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांमध्ये महत्त्वाची चर्चा

इराण, इस्रायल आणि अमेरिका (Iran-US-Israel War) यांच्यात पाकिस्तानमध्ये होणाऱ्या निर्णायक शांतता चर्चेपूर्वीच सौदी अरेबिया

Intelligence Bureau : पालघरमध्ये 'इंटेलिजन्स ब्युरो'साठी हक्काची जागा

- महसूल विभागाचा मोठा निर्णय; वसईत कार्यालय आणि निवासस्थानांचा मार्ग मोकळा मुंबई : पालघर जिल्ह्याच्या

Cyclone Shelter Center in Dapoli : दापोली तालुक्यातील चक्रीवादळ निवारा केंद्रासाठी महसूलकडून विनामूल्य जागा

मुंबई : कोकण किनारपट्टीवरील आपत्ती व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला