सेमी फायनलच्या दिवशी अर्जुनचं लग्न, फायनलच्या दिवशी पृथ्वीचा साखरपुडा

मुंबई : गोव्याकडून डोमेस्टिक आणि लखनऊ सुपर जायंट्सकडून आयपीएल खेळणाऱ्या क्रिकेटपटू अर्जुन तेंडुलकरचे लग्न बिझनेसवुमन सानिया चंडोकशी झाले. हे लग्न गुरुवार ५ मार्च २०२६ म्हणजेच भारताच्या टी ट्वेंटी वर्ल्डकपच्या सेमी फायनलच्या दिवशी झाले. पाठोपाठ महाराष्ट्राकडून डोमेस्टिक आणि दिल्ली कॅपिटल्सकडून आयपीएल खेळणाऱ्या क्रिकेटपटू पृथ्वी शॉचा साखरपुडा झाला. हा साखरपुडा रविवार ८ मार्च २०२६ म्हणजेच भारताच्या टी ट्वेंटी वर्ल्डकपच्या फायनलच्या दिवशी झाला. आंतरराष्ट्रीय महिला दिनाचा योग साधून पृथ्वीने त्याची गर्लफ्रेंड आकृती अग्रवालशी साखरपुडा केला.





'मैदानावर षटकार मारण्यापासून ते आयुष्यभरापर्यंत. ही माझी परिपूर्ण खेळी आहे' असे टाइप करून पृथ्वीने साखरपुड्याचे फोटो पोस्ट केले आहेत. पृथ्वीने स्वतःच्या इन्स्टावर साखरपुड्याचे फोटो पोस्ट केले. हे फोटो आता व्हायरल होत आहेत. चाहते आणि सहकारी क्रिकेटपटू यांच्याकडून पृथ्वीवर अभिनंदनाचा वर्षाव सुरू आहे.


पृथ्वी शॉची होणारी वधू, आकृती अग्रवाल ही सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आहे. आकृतीचे इन्स्टावर ३२ लाखांपेक्षा जास्त फॉलोअर आणि यूट्युबवर ९० हजारांपेक्षा जास्त सबस्क्रायबर आहेत. ती फॅशन, लाईफस्टाईल आणि डान्सशी संबंधित अनेक रील करत असते. लवकरच ती त्रिमुखा या तेलुगु चित्रपटातून अभिनेत्री म्हणून मोठ्या पडद्यावर येणार आहे.


पृथ्वी भारताकडून टेस्ट, वन डे आणि टी ट्वेंटी या तिन्ही प्रकारात काही काळ खेळला आहे. मागील चार वर्षांपासून तो टीम इंडियात पुन्हा येण्यासाठी प्रयत्न करत आहे. डोमेस्टिक क्रिकेटमध्ये तो धावांचा पाऊस पाडत आहे. सुरुवातील मुंबईकडून खेळणारा पृथ्वी आता महाराष्ट्र क्रिकेट संघाकडून डोमेस्टिक क्रिकेट खेळत आहे. पृथ्वीने भारतीय संघासाठी पाच कसोटी, सहा एकदिवसीय आणि एक टी-२० आंतरराष्ट्रीय सामना खेळला आहे. या काळात त्याने कसोटी सामन्यांमध्ये ४२.३७ च्या सरासरीने ३३९ धावा केल्या आहेत. यात एक शतक आणि दोन अर्धशतकांचा समावेश आहे. एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने ३१.५० च्या सरासरीने १८९ धावा केल्या आहेत. तो जेमतेम २६ वर्षांचा आहे. त्याने भारताकडून शेवटचा सामना जुलै २०२१ मध्ये कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर श्रीलंकेविरुद्ध खेळला होता.

Comments
Add Comment

IPL 2026 : सामना न खेळणाऱ्या खेळाडूंसाठी बीसीसीआयने जाहीर केली नवीन नियमावली; नियमांचे पालन न केल्यास होणार कारवाई

मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने म्हणजेच बीसीसीआयने आयपीएलसाठी अनेक कठोर नियम लागू केले आहेत. या नवीन

Bangladesh Cricket Board : अखेर बांगलादेश नरमला; बांग्लादेश क्रिकेट बोर्डाकडून भारताला आमंत्रण

बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने (बीसीबी) (Bangladesh Cricket Board) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसी) पत्र लिहून कळवले आहे की,

IPL 2026 Sunil Gavaskar : सुनील गावस्करांची अनफिट क्रिकेटपटूंवर टीका

मुंबई : भारताचे महान फलंदाज सुनील गावस्कर यांनी पुन्

IPL 2026 : गुवाहाटीवर पावसाचे सावट! MI vs RR थरार रंगणार की सामना होणार रद्द?

IPL 2026: मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स आज आमनेसामने; विजयासाठी दोन्ही संघ सज्ज

मुंबई : आयपीएल 2026 मधील आजचा सामना क्रिकेटप्रेमींसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स

Umpire Killed Over Run-Out Argument : विशाखापट्टणम हादरलं! रनआऊट दिलं म्हणून थेट अंपायरचीच केली हत्या

विशाखापट्टणम येथे घडलेल्या एका धक्कादायक घटनेने क्रीडा क्षेत्र हादरले आहे. स्थानिक स्तरावर सुरू असलेल्या