मुंबई : ‘द वायरल फीवर’ (TVF) निर्मित ‘एस्पिरेंट्स’ सीझन ३ चे दिग्दर्शन दीपेश सुमित्रा जगदीश यांनी केले आहे. या सीझनमध्ये नवीन कस्तुरिया, शिवांकित सिंह परिहार, अभिलाष थपलियाल, सनी हिंदुजा, नमिता दुबे आणि तेंगम सेलीन हे त्यांच्या जुन्या भूमिकांमध्ये परतत आहेत, तर जतिन गोस्वामी या वेळी नव्या सदस्याच्या रूपात टीममध्ये सहभागी झाले आहेत. ‘एस्पिरेंट्स’ सीझन ३ चा प्रीमियर १३ मार्च रोजी भारतासह जगभरातील २४० पेक्षा अधिक देश आणि प्रदेशांमध्ये केवळ प्राइम व्हिडिओवर होणार आहे.
https://www.instagram.com/reel/DViU0yKim_s/?igsh=MWM1eHIxMnF2bXloZQ==
भारताच्या सर्वात लोकप्रिय मनोरंजन प्लॅटफॉर्मपैकी एक असलेल्या प्राइम व्हिडिओने आज आपल्या लोकप्रिय हिंदी ड्रामा मालिकेचा ‘एस्पिरेंट्स’ चा तिसऱ्या सीझनचा ट्रेलर रिलीज केला आहे. सीझन ३ सोबत ही कथा एका नव्या टप्प्यावर पोहोचते, जिथे जुन्या महत्त्वाकांक्षा आणि सध्याच्या जबाबदाऱ्या यांच्यात संघर्ष दिसून येतो. मुखर्जी नगरमध्ये सुरू झालेली जुनी स्पर्धा आता सत्तेच्या उंच पदांवर पुन्हा एकदा समोर येताना दिसते.
‘द वायरल फीवर’ (TVF) निर्मित या सीझनचे दिग्दर्शन दीपेश सुमित्रा जगदीश यांनी केले आहे. यात नवीन कस्तुरिया, शिवांकित सिंह परिहार, अभिलाष थपलियाल, सनी हिंदुजा, नमिता दुबे आणि तेंगम सेलीन हे त्यांच्या जुन्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत, तर जतिन गोस्वामी यांची या वेळी टीममध्ये नवीन सदस्य म्हणून एन्ट्री झाली आहे. ‘एस्पिरेंट्स’ सीझन ३ चा प्रीमियर १३ मार्च रोजी भारतासह जगभरातील २४० पेक्षा अधिक देश आणि प्रदेशांमध्ये केवळ प्राइम व्हिडिओवर होणार आहे.
“‘एस्पिरेंट्स’ माझ्यासाठी नेहमीच खूप खास राहिली आहे, कारण प्रेक्षकांनी फक्त अभिलाषला पडद्यावर पाहिलं नाही, तर त्याच्या प्रवासासोबत स्वतःलाही वाढताना अनुभवले आहे,” असे नवीन कस्तुरिया म्हणाले. “तिसऱ्या सीझनमध्ये आपण त्याला अशा वळणावर पाहतो, जिथे कागदोपत्री त्याचं स्वप्न पूर्ण झालेलं असतं, पण प्रत्यक्ष आयुष्यातील वास्तव खूप गुंतागुंतीचं असतं. लोकांच्या अपेक्षा, स्वतःच्या मनातील खंत आणि ज्यांनी त्याच्यावर सर्वाधिक विश्वास ठेवला त्या लोकांना गमावण्याची भीती यामध्ये तो अडकलेला असतो. माझ्यासाठी हा भाग खूप दमदार होता, कारण यात दाखवले आहे की जेव्हा सर्व काही दावावर लागलेलं असतं तेव्हा यश कसं वाटतं. या वेळी अभिलाषचं पात्र आपल्या भावना आणि कमतरतांबाबत अधिक प्रामाणिकपणे समोर येईल. लोकांना त्याच्या कथेशी जोडलेलं पाहून मला आनंद होतो आणि त्याचा पुढचा प्रवास कुठे नेतो हे दाखवण्यासाठी मी खूप उत्सुक आहे.”
“सीझन ३ मध्ये मैत्री, स्वप्नं आणि कधीकाळी सोपी वाटणारी आदर्श तत्त्वं यांचं काय होतं, जेव्हा सत्ता, अंतर आणि परिस्थिती त्यांची कसोटी घेतात, हे दाखवलं आहे,” असे सनी हिंदुजा म्हणाले. “या सीझनमध्ये संदीप भैय्या स्वतःमध्ये झालेल्या बदलांशी झुंज देताना दिसतात, आणि त्याच वेळी त्या मुलांकडे पाहत आहेत ज्यांना त्यांनी कधी मार्ग दाखवला होता, पण आता ते असे निर्णय घेत आहेत ज्यांच्याशी ते कदाचित नेहमी सहमत नसतील. या सीझनची खास गोष्ट म्हणजे यशानंतर येणाऱ्या अडचणी – मग त्या कामाशी संबंधित असोत किंवा वैयक्तिक आयुष्याशी – दाखवण्यास ही कथा मागे हटत नाही. पात्रांमधील नातेसंबंध आता आधीपेक्षा अधिक खोल झाले आहेत आणि त्यांच्या समस्या देखील तितक्याच गुंतागुंतीच्या आहेत. या जगात पुन्हा परत येणं आणि दबावाच्या काळात ही नाती कशी टिकून राहतात किंवा कशी बदलतात हे दाखवणं माझ्यासाठी खूप छान अनुभव होता. मला पूर्ण विश्वास आहे की प्रेक्षकांना या गुंतागुंतीत स्वतःची झलक दिसेल.”







