मध्य-पूर्वेतील महायुद्ध सुरु होऊन ५ दिवस झाले असून याची झळ आता भारतालाही बसली आहे. या युद्धात भारताच्या २५ वर्षीय दीक्षितचा ड्रोनने बळी घेतला आहे. ओमानच्या किनारपट्टीवर मस्कतजवळ एका मालवाहू ऑईल टँकरवर झालेल्या ड्रोन हल्ल्यात मुंबईतील कांदिवली परिसरात राहणाऱ्या दीक्षित सोलंकी याचा मृत्यू झाला आहे.
मूळचा दीवचा असलेला २५ वर्षीय दीक्षित सोलंकी काही काळापूर्वी व्यवसायानिमित्त मुंबईत स्थायिक झाला होता. तो मुंबईतील कांदिवली भागात वास्तव्यास होता. ओमानच्या मस्कत किनारपट्टीपासून ५२ नॉटिकल मैलांवर 'MKD Vyom' या ऑईल टँकरवर स्फोटकांनी भरलेल्या ड्रोन बोटीने धडक दिली. या भीषण स्फोटात टँकरच्या इंजिन रूमला आग लागली आणि त्यात दीक्षितचा जागीच मृत्यू झाला.
दीक्षित हा दीवमधील मच्छीमार व्यावसायिक अमृतलाल सो25-year-oldलंकी यांचा धाकटा मुलगा होता. महिनाभरापूर्वीच आईच्या निधनानंतर तो गावी आला होता आणि पुन्हा कर्तव्यावर परतला होता, मात्र काळाने त्याच्यावर झडप घातली.
भारतीय दूतावासाकडून दुःख व्यक्त :
ओमानमधील भारतीय दूतावासाने दीक्षित सोलंकीच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. टँकरवरील इतर २५ क्रू मेंबर्सची (ज्यात १६ भारतीय होते) सुखरूप सुटका करण्यात आली आहे.







