उत्तर महाराष्ट्रात उबाठाची 'मशाल' विझली

माजी खासदार उन्मेष पाटील शिवसेनेच्या वाटेवर; ६ मार्चला मुंबईत पक्ष प्रवेश होणार


मुंबई : राजकारणात 'मैत्री' आणि 'शत्रुत्व' यापेक्षा 'संधी'ला किती महत्त्व असते, याचा प्रत्यय जळगावच्या राजकारणाने पुन्हा एकदा दिला आहे. उत्तर महाराष्ट्रातील 'उबाठा' गटाचा प्रमुख चेहरा आणि माजी खासदार उन्मेष पाटील यांनी अखेर ठाकरेंना 'जय महाराष्ट्र' ठोकण्याचा निर्णय घेतला असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत ते प्रवेश करणार आहेत. येत्या शुक्रवारी (६ मार्च) मुंबईत हा पक्षप्रवेशाचा सोहळा रंगणार असून, जळगावच्या राजकारणात 'गुलाबराव-उन्मेष' ही नवी युती काय चमत्कार घडवते, याकडे राजकीय धुरिणांचे लक्ष लागले आहे.


२०१९ मध्ये भाजपकडून ४ लाखांच्या विक्रमी मताधिक्याने खासदार झालेल्या उन्मेष पाटलांचा राजकीय प्रवास गेल्या दोन वर्षांत मोठ्या वळणांवरून गेला आहे. २०२४ मध्ये भाजपने उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांनी तडकाफडकी 'मातोश्री'वर धाव घेत हाती मशाल घेतली होती. मात्र, त्यांना मानहानीकारक पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे आता त्यांनी पुन्हा सत्तेच्या प्रवाहात सामील होणे पसंत केले आहे. दिल्लीत खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट घेतल्यानंतर त्यांच्या 'घरवापसी'वर शिक्कामोर्तब झाले.


गेल्या काही दिवसांपासून उन्मेष पाटील आणि जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यातील वाढती जवळीक चर्चेचा विषय होती. एकनाथ शिंदे यांच्या कामाची पद्धत आणि विकासाचा वेग हीच आपल्या पक्षप्रवेशाची प्रेरणा असल्याचे पाटील यांनी सांगितले.

Comments
Add Comment

मागासवर्गीय शासकीय वसतिगृहांना महापुरुषांची नावे देण्याचा सामाजिक न्याय विभागाचा निर्णय

मुंबई : सामाजिक न्याय विभागांतर्गत चालविण्यात येणाऱ्या मागासवर्गीय मुला-मुलींच्या शासकीय वसतिगृहांना

भाजपाध्यक्ष राज्यसभेवर जाणार, भाजपचे राज्यसभेचे नऊ उमेदवार जाहीर

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाने अर्थात भाजपने बिहारमधून आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी पक्षाचे उमेदवार म्हणून

पश्चिम आशियातील संघर्षावर भारताने दिली अधिकृत प्रतिक्रिया

नवी दिल्ली : इराण आणि आखाती प्रदेशात २८ फेब्रुवारी २०२६ पासून संघर्ष सुरू आहे. हा संघर्ष सुरू झाल्याचे समजताच

मध्य पूर्वेतल्या बदलत्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारत ऊर्जेसंदर्भात पूर्णपणे सज्ज

विविध स्रोतांकडून कच्चे तेल आणि पेट्रोलियम खरेदी, पुरवठ्याच्या स्थितीवर देखरेखीसाठी 24×7 नियंत्रण कक्ष नवी

फुलांची होळी उपक्रमातून महापौर रितू तावडे यांनी दिला पर्यावरणपूरक सण साजरे करण्याचा संदेश

मुंबई : होळी व धुळवड/रंगपंचमी हे सण आनंदात साजरे करावेत आणि त्यासोबत पर्यावरणाचे संरक्षण करण्याचे सामाजिक

दोन महिन्यांत राज्यातील सव्वा कोटी नागरिकांची आरोग्य तपासणी

आरोग्य जागर : सिकलसेलपासून कर्करोगापर्यंतच्या मोहिमांना मोठे यश मुंबई : राज्यातील जनतेचे आरोग्य सुदृढ