IND vs WI: एका ओव्हरमध्येच सगळंच बदललं; भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्यात सर्वात मोठा टर्निंग पॉईंट कधी झाला?

मुंबई : भारताने दक्षिण आफ्रिका संघाचा पाच विकेटने पराभव करत सेमी फायनलमध्ये आपली जागा निश्चित केली आहे. भारताकडून संजू सॅमसनने केलेल्या नाबाद ९७ धावांच्या खेळीने हा विजय सहज साकार करता आला. या सामन्यात वेस्ट इंडिज संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना २० ओव्हर मध्ये १९५-४ धावा केल्या होत्या. भारताने १९.२ ओव्हर मध्ये हे आव्हान पूर्ण करत पाच विकेटने विजय मिळवला. भारताने हा विजय मिळवला असला तरी वेस्ट इंडिजने काही सहजासहजी सामना सोडलेला नव्हता. संपूर्ण सामन्याचा एक असा टर्निंग पॉईंट आहे, जिथे खऱ्या अर्थाने म्हणता येईल की भारताच्या बाजूने सामना झुकला. नेमका कोणता जाणून घ्या.


या सामन्यामध्ये देव पावला अन् सूर्यकुमार यादवने टॉस जिंकला. भारताने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. वर्ल्ड कप मधील सर्व सामने पाहता, भारताची गोलंदाजी कुठेतरी कमकुवत दिसली. त्यामुळे आजच्या सामन्यातही गोलंदाजांच्या कामगिरीवर सर्वांचं लक्ष लागून होतं. आजचा सामना खऱ्या अर्थाने गोलंदाजीमध्येच फिरला तो नेमका कुठे?


वेस्ट इंडिज संघाने बॅटींगला आल्यावर सुरुवातीला थोडासा सावध पवित्रा घेतलेला पाहायला मिळाला. सुरुवातीच्या दोन ओवर्समध्ये त्यांनी थेट आक्रमण केले नाही पण त्यानंतर तिसऱ्या ओव्हरपासून सुरुवात केली होती. कॅप्टन शाई होप आज गतीने खेळताना दिसला नाही. त्यामुळे रोस्टन चेज याने आक्रमक खेळायला सुरुवात केली होती. मात्र वरूण चक्रवर्तीने ९ नव्या ओव्हरला त्याला आऊट केले. त्यानंतर मैदानात आलेल्या हेटमायर याने आपल्या शैलीत खेळायला सुरुवात केली. अवघ्या १२ बॉलमध्येच त्याने २७ धावा करत भारतीय गोलंदाजांवर दबाव आणला होता. त्यामुळे वेस्ट इंडिज मोठ्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल करणार असा दिसू लागलं होतं. पण त्यावेळी भारताचा संकट मोचक आणि यॉर्कर किंग म्हणून प्रसिद्ध असलेला बुमराहने संपूर्ण सामनाच एक ओव्हरला फिरवला. जर हेटमायर संजूसारखा टिकला असता तर सहज स्कोरही जास्त झाला असता. त्यामुले हेटमायरची विकेट महत्त्वाची होती.


वेस्ट इंडिज संघाची पहिली विकेट ६८ धावांवर गेली होती त्यानंतर हेटमायर त्याच्या खऱ्या रूपात यायला लागला होता. परंतु बुमराहने त्याला आपल्या जाळ्यात अडकवत त्याला आऊट केलं. बर हा गडी इतक्यावरच थांबला नाही, याच ओव्हरमध्ये पाचव्या चेंडूवर बुमराहने चेजला आऊट करत सामना पलटवला. त्यामुळे बुमराहने एकाच ओव्हरमध्ये घेतलेल्या दोन विकेट सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरल्या असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. भारताने आता या विजयासह सेमी फायनलमध्ये प्रवेश केला आहे.

Comments
Add Comment

T20 World Cup 2026 Ind vs WI : वेस्ट इंडिज विरुद्धच्या विजयी खेळीनंतर संजू सॅमसन भावुक

टी-२० विश्वचषकामध्ये सुपर ८ च्या एका महत्त्वाच्या सामन्यात वेस्ट इंडिजला पाच विकेट्सनी पराभूत करत भारताने

संजूची बॅट तळपली, टीम इंडिया उपांत्य फेरीत पोहोचली

कोलकाता : ईडन गार्डनवर झालेल्या सुपर आठ फेरीतल्या वेस्ट इंडिज विरूद्धच्या सामन्यात भारत पाच विकेट राखून जिंकला.

बुमराहसमोर वेस्ट इंडिजचा हेटमायर हतबल

कोलकाता : आयसीसी मेन्स टी ट्वेंटी वर्ल्डकप २०२६ मध्ये सुपर एट फेरीत आज भारत विरुद्ध वेस्ट इंडिज हा निर्णायक सामना

द. आफ्रिकेचा झिम्बाब्वेवर ५ गडी राखून विजय

नवी दिल्ली : टी-२० विश्वचषकातील सुपर आठ फेरीत दक्षिण आफ्रिकेने झिम्बाब्वेचा ५ गडी राखून पराभव केला. झिम्बाब्वेचा

कांगारूंनी भारतीय महिलांचा उडवला धुव्वा!

होबार्ट : ऑस्ट्रेलियन महिला संघाने फलंदाजी आणि गोलंदाजी अशा दोन्ही आघाड्यांवर भारतीय महिला संघाला पूर्णपणे

नागपूरच्या गनपावडर कारखान्यात स्फोट, १७ ठार

नागपूर : महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपूरमधून होलिकोत्सवाच्या आदल्या दिवशी एक दुःखद बातमी आली आहे.