IND vs WI: एका ओव्हरमध्येच सगळंच बदललं; भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्यात सर्वात मोठा टर्निंग पॉईंट कधी झाला?

मुंबई : भारताने दक्षिण आफ्रिका संघाचा पाच विकेटने पराभव करत सेमी फायनलमध्ये आपली जागा निश्चित केली आहे. भारताकडून संजू सॅमसनने केलेल्या नाबाद ९७ धावांच्या खेळीने हा विजय सहज साकार करता आला. या सामन्यात वेस्ट इंडिज संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना २० ओव्हर मध्ये १९५-४ धावा केल्या होत्या. भारताने १९.२ ओव्हर मध्ये हे आव्हान पूर्ण करत पाच विकेटने विजय मिळवला. भारताने हा विजय मिळवला असला तरी वेस्ट इंडिजने काही सहजासहजी सामना सोडलेला नव्हता. संपूर्ण सामन्याचा एक असा टर्निंग पॉईंट आहे, जिथे खऱ्या अर्थाने म्हणता येईल की भारताच्या बाजूने सामना झुकला. नेमका कोणता जाणून घ्या.


या सामन्यामध्ये देव पावला अन् सूर्यकुमार यादवने टॉस जिंकला. भारताने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. वर्ल्ड कप मधील सर्व सामने पाहता, भारताची गोलंदाजी कुठेतरी कमकुवत दिसली. त्यामुळे आजच्या सामन्यातही गोलंदाजांच्या कामगिरीवर सर्वांचं लक्ष लागून होतं. आजचा सामना खऱ्या अर्थाने गोलंदाजीमध्येच फिरला तो नेमका कुठे?


वेस्ट इंडिज संघाने बॅटींगला आल्यावर सुरुवातीला थोडासा सावध पवित्रा घेतलेला पाहायला मिळाला. सुरुवातीच्या दोन ओवर्समध्ये त्यांनी थेट आक्रमण केले नाही पण त्यानंतर तिसऱ्या ओव्हरपासून सुरुवात केली होती. कॅप्टन शाई होप आज गतीने खेळताना दिसला नाही. त्यामुळे रोस्टन चेज याने आक्रमक खेळायला सुरुवात केली होती. मात्र वरूण चक्रवर्तीने ९ नव्या ओव्हरला त्याला आऊट केले. त्यानंतर मैदानात आलेल्या हेटमायर याने आपल्या शैलीत खेळायला सुरुवात केली. अवघ्या १२ बॉलमध्येच त्याने २७ धावा करत भारतीय गोलंदाजांवर दबाव आणला होता. त्यामुळे वेस्ट इंडिज मोठ्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल करणार असा दिसू लागलं होतं. पण त्यावेळी भारताचा संकट मोचक आणि यॉर्कर किंग म्हणून प्रसिद्ध असलेला बुमराहने संपूर्ण सामनाच एक ओव्हरला फिरवला. जर हेटमायर संजूसारखा टिकला असता तर सहज स्कोरही जास्त झाला असता. त्यामुले हेटमायरची विकेट महत्त्वाची होती.


वेस्ट इंडिज संघाची पहिली विकेट ६८ धावांवर गेली होती त्यानंतर हेटमायर त्याच्या खऱ्या रूपात यायला लागला होता. परंतु बुमराहने त्याला आपल्या जाळ्यात अडकवत त्याला आऊट केलं. बर हा गडी इतक्यावरच थांबला नाही, याच ओव्हरमध्ये पाचव्या चेंडूवर बुमराहने चेजला आऊट करत सामना पलटवला. त्यामुळे बुमराहने एकाच ओव्हरमध्ये घेतलेल्या दोन विकेट सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरल्या असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. भारताने आता या विजयासह सेमी फायनलमध्ये प्रवेश केला आहे.

Comments
Add Comment

ICC T20 Ranking : अभिषेक, ईशान, तिलक आणि सूर्यकुमार अव्वल १० मध्ये कायम

मुंबई : भारताचा अभिषेक शर्मा टी-२० फलंदाजीच्या क्रमवारीत अव्वल स्थानी कायम असून, तो सध्या त्याचा सहकारी ईशान

कोलकाता नाईट रायडर्सने आंद्रे रसेलची जर्सी केली निवृत्त

कोलकाता : कोलकाता नाईट रायडर्सने त्यांचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू आंद्रे रसेलच्या सन्मानार्थ त्याची १२

सौरव गांगुली बनला जॅक्सन ग्रुपचा पहिल्या ब्रँड अ‍ॅम्बेसेडर

 नेतृत्‍व स्‍थान अधिक दृढ करण्‍यासह शाश्वत विकासाला गती देणार मुंबई : जॅक्‍सन ग्रुप या भारतातील आघाडीच्‍या

फुटबॉलपटू मोहम्मद सलाह नऊ वर्षांनंतर लिव्हरपूलची साथ सोडणार

नवी दिल्ली : इजिप्शियन फुटबॉलचा दिग्गज फुटबॉलपटू मोहम्मद सलाहने लिव्हरपूल फुटबॉल क्लब सोडण्याची घोषणा केली आहे.

आयपीएलपूर्वी केकेआरचा मोठा निर्णय, रिंकू सिंगची उपकर्णधारपदी नियुक्ती

कोलकाता : तीन वेळच्या विजेत्या कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) संघाने २०२६ च्या आयपीएल हंगामाच्या सुरुवातीपूर्वी

आयपीएल २०२६: राजस्थाननंतर आरसीबीची विक्री

-१६,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीला विकली गेली फ्रँचायझी-आदित्य बिर्ला ग्रुपसह चार कंपन्यांनी आरसीबी घेतली