धर्मांतराविरुद्ध सर्व देशवासियांनी एकत्र येणं गरजेचं - अमित शाह

शीख पंथाच्या दहा गुरूंनी अशी परंपरा निर्माण केली आहे, जी केवळ भारतासाठीच नव्हे तर संपूर्ण जगासाठी अनुकरणीय आहे. त्यामुळे शीखांच्या गुरूंच्या जीवनातून प्रेरणा घेऊन धर्मांतराच्या विरोधात सर्व देशवासीयांनी एकजूट व्हायला हवे असे गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितले.


नवी मुंबई येथे गुरु श्री तेगबहादूर जी यांच्या ३५० व्या शहीदी दिवस समागम समारंभात गुरु साहेबांच्या स्मृतीस अभिवादन करून उपस्थितांशी अमित शाह यांनी संवाद साधला. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.



काय म्हणाले अमित शाह ?


आपल्या संबोधनात केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय स्तरावर श्री गुरु तेगबहादूर साहिब जी यांचा ३५० वा शहीदी दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला, जो संपूर्ण भारतासाठी भाग्याचा विषय आहे. ते म्हणाले की, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण महाराष्ट्रात गुरु तेगबहादूर यांचे जीवनकार्य तरुणांपर्यंत पोहोचवण्यासाठी विशेष कार्यक्रम आयोजित केले. जर नववे गुरु तेगबहादूर यांनी हिंदू धर्म आणि हिंदूंच्या रक्षणासाठी बलिदान दिले नसते, तर संपूर्ण जगात एकही हिंदू उरला नसता. संपूर्ण भारत आणि जगभरातील सनातन धर्माचे अनुयायी गुरु तेगबहादूर यांनी हिंदू धर्म वाचवण्यासाठी यातना सहन करत आपले बलिदान दिले.





अमित शाह पुढे म्हणाले की, शीख परंपरेचा मूळ आधार एकता, बंधुत्व, सर्वसमावेशकता आणि वीरता हा राहिला आहे आणि गुरु ग्रंथ साहिबमध्ये याच तत्वांचा समावेश करण्यात आला आहे. संत नामदेव, नरसी मेहता, कबीर, संत रविदास यांसारख्या अनेक प्रसिद्ध संतांच्या पदांना गुरु ग्रंथ साहिबमध्ये स्थान देण्याचे काम दशम पित्याने केले आहे. त्यांनी असेही नमूद केले की, महाराष्ट्र सरकारने अनेक समाजांना गुरु तेगबहादूर जी यांच्या विचारांशी जोडण्याचे काम केले आहे.


Comments
Add Comment

धक्कादायक! भारतीय वायुसेना कर्मचारी करत होता पाकिस्तानसाठी हेरगिरी; आसाममधून अटक

वायुसेना आणि राजस्थान गुप्तचर विभागाच्या संयुक्त पथकाने आसाममधील वायुसेना तळावर कार्यरत असलेल्या एका

मुस्लिम डॉक्टरने गुंगीचे इंजेक्शन देत केला हिंदू मुलीवर बलात्कार; मध्यप्रदेशातील संतापजनक घटना

इंदूर: मध्य प्रदेशातील इंदूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका मुस्लिम डॉक्टरने एका हिंदू तरुणीवर

भारताने पुन्हा एकदा गाठला एक अब्ज टन कोळसा उत्पादनाचा टप्पा

- देशाच्या ऊर्जा सुरक्षेला मिळणार आणखी बळकटी भारताने २० मार्च २०२६ रोजी सलग दुसऱ्या वर्षी १ अब्ज टन कोळसा

Iran-US-Israel War : भारतीय भूमीचा इराण हल्ल्यासाठी वापर नाही; भारताने फेटाळून लावले 'ते' दावे

भारत सरकारने सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका दाव्याचे खंडन करत स्पष्ट केले आहे की, भारताने अमेरिकेला आपल्या

आसाममध्ये पोलीस कमांडो कॅम्पवर दहशतवादी हल्ला

तिनसुकिया : आसामच्या तिनसुकिया जिल्ह्यातील पोलीस कमांडो कॅम्पवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. रविवारी मध्यरात्री

तिबेटशी व्यापार करणाऱ्या भारतीयांसाठी आनंदाची बातमी

पिथोरगड : भारतीय व्यावसायिक जून २०२६ पासून तकलाकोटमधील कायमस्वरुपी दुकानांतून तिबेटशी थेट व्यापार करू शकणार