Thursday, February 26, 2026

कॅनडातील हिंसक घटनांशी भारताचा संबंध नाही, कार्नी सरकारची अधिकृत भूमिका

कॅनडातील हिंसक घटनांशी भारताचा संबंध नाही, कार्नी सरकारची अधिकृत भूमिका

ओटावा : कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांच्या भारत दौऱ्याचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. कार्नी भारत दौऱ्यात मोदींना भेटणार आहेत. ही भेट होण्याच्या काही तास आधीच कॅनडा सरकारने एक महत्त्वाची माहिती दिली आहे. मागील काही महिन्यांमध्ये कॅनडात खलिस्तान समर्थक असलेल्यांचा मृत्यू झाला. अज्ञातांच्या हल्ल्यांमध्ये खलिस्तान समर्थक असलेल्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणांमध्ये तपास सुरू आहे. आतापर्यंच्या तपासातून भारताचा या कारवायांमध्ये हात असल्याचा एकही ठोस पुरावा मिळालेला नाही. यामुळे कॅनडातील हिंसक घटनांशी भारताचा संबंध नाही असे कार्नी सरकारच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

कॅनडातील हिंसक घटनांमध्ये भारताचा हात असता तर कार्नी सरकारने भारत दौऱ्याचे नियोजनच केले नसते. आता पंतप्रधान कार्नी भारत दौरा करत आहेत याचाच दुसरा अर्थ कॅनडातील हिंसक घटनांमध्ये भारताचा हात नाही, असे कार्नी सरकारच्या उच्चाधिकाऱ्यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले. कॅनडा सरकार भारतासोबत मैत्री दृढ करण्यास इच्छुक आहे. भारत - कॅनडा यांच्यातील व्यापार वाढावा आणि दोन्ही देशांना आर्थिक लाभ व्हावा यासाठी चर्चा होणार असल्याचे संकेत कार्नी सरकारच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांच्या भारत दौऱ्याआधी राजधानी ओटावात सरकारच्यावतीने पत्रकार परिषद घेण्यात आली. यात पत्रकार परिषदेत कॅनडा सरकारने पंतप्रधान कार्नी यांच्या भारत दौऱ्याचा कार्यक्रम जाहीर केला. भारतासोबत व्यापार आणि संरक्षणाच्या क्षेत्रातले सहकार्य वाढवण्यासाठी चर्चा करत असल्याची माहिती कार्नी सरकारने पत्रकार परिषदेत दिली.

Comments
Add Comment