मुंबई ते विजयदुर्ग रो रो सेवा १ मार्चपासून सुरू होणार

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात मुंबई आणि कोकणाला जलवाहतुकीच्या माध्यमातून जोडण्यासाठी राज्य शासनाने जलवाहतूक सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला. यासाठी नियोजन सुरू आहे. सुरक्षेचे आवश्यक ते उपाय करून, पुरेशी खबरदारी घेऊन रविवार १ मार्च २०२६ पासून मुंबई ते विजयदुर्ग रो रो सेवा सुरू करत आहोत, अशी घोषणा राज्याचे मत्स व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी केली. लवकरच मुंबई ते रत्नागिरी, मुंबई ते महाड अशा विविध मार्गांवर जलवाहतूक सुरू करण्याचे नियोजन सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.


मुंबई ते विजयदुर्ग या रो रो सेवेच दर आणि वेळापत्रक या संदर्भातली माहिती अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहे. तिकिटांचे बुकिंग ऑनलाईन पद्धतीने सुरू आहे आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.


शिमोगोत्सवासाठी मुंबईतून कोकणात जाण्यासाठी रो रो हा एक सुरक्षित आरामदायी आणि वेगवान प्रवासाचा पर्याय उपलब्ध आहे. नागरिक याला सकारात्मक प्रतिसाद देत आहेत आणि यापुढेही उत्साहवर्धक प्रतिसाद असेल असे दिसत आहे. रो रो सेवेच्या माध्यमातून मुंबईला अन्य राज्यांबरोबर जोडण्याचे काम आणि पर्यटन, रोजगार आणि कृषी क्षेत्राला चालना देण्याचे काम होणार आहे.


रो रो सेवेमुळे मुंबई ते कोकण प्रवास वेगाने करता येईल. वेळेची बचत होण्यास मदत होईल.  आंबा, काजू, मासेमारी व्यवसायाला चालना मिळेल. पर्यटन आणि रोजगाराला मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन मिळेल. पर्यावरणपूरक विकास हाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचा हेतू आहे. हा हेतू साध्य करण्यासाठीचा प्रयत्न म्हणून रो रो सेवेचे नियोजन सुरू असल्याची माहिती मंत्री नितेश राणे यांनी दिली.

Comments
Add Comment

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे

मालेगाव महापालिकेत नमाजपठण कशाला? हे तर ‘जिहाद’चेच रूप - नितेश राणे

- राज्यातील सर्व मदरसे बंद करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार - नितेश राणे मुंबई : निवडणुकीच्या पूर्वी ‘जय

महाराष्ट्र शासन आणि ब्रिस्टॉल विद्यापीठ यांच्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार

गुणवंत विद्यार्थ्यांसाठी १०० टक्के शिष्यवृत्ती मुंबई : महाराष्ट्रातील गुणवंत विद्यार्थ्यांना जागतिक

महाराष्ट्रातील व्याघ्र संवर्धनासमोर मोठे आव्हान: वर्षात ४१ वाघांना मुकलो, मानवनिर्मित कारणांमुळे धोक्यात वाढ

मुंबई : महाराष्ट्र राज्यामध्ये २०२५ या एकाच वर्षात तब्बल ४१ वाघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती

काजू उत्पादक शेतकऱ्याला जगवण्यासाठी आयात शुल्कात २० टक्क्यांची वाढ करा - आमदार निलेश राणे

- निलेश राणे यांची विधानसभेत मागणी; अमली पदार्थ, गो-हत्या आणि बेकायदा वृक्षतोडीवरून धरले धारेवर मुंबई : कोकणातील

'BMC सोबत समन्वयातून टिळक मनपा मार्केटमधील कोळी बांधवांच्या समस्यांवर तोडगा काढणार'; मंत्री नितेश राणे यांचे आश्वासन

बीएमसीसोबत चर्चा करून मार्केटच्या पुनर्विकासावर तोडगा काढण्याचे  मुंबई : लोकमान्य टिळक महापालिका मार्केटच्या