मुंबई ते विजयदुर्ग रो रो सेवा १ मार्चपासून सुरू होणार

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात मुंबई आणि कोकणाला जलवाहतुकीच्या माध्यमातून जोडण्यासाठी राज्य शासनाने जलवाहतूक सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला. यासाठी नियोजन सुरू आहे. सुरक्षेचे आवश्यक ते उपाय करून, पुरेशी खबरदारी घेऊन रविवार १ मार्च २०२६ पासून मुंबई ते विजयदुर्ग रो रो सेवा सुरू करत आहोत, अशी घोषणा राज्याचे मत्स व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी केली. लवकरच मुंबई ते रत्नागिरी, मुंबई ते महाड अशा विविध मार्गांवर जलवाहतूक सुरू करण्याचे नियोजन सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.


मुंबई ते विजयदुर्ग या रो रो सेवेच दर आणि वेळापत्रक या संदर्भातली माहिती अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहे. तिकिटांचे बुकिंग ऑनलाईन पद्धतीने सुरू आहे आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.


शिमोगोत्सवासाठी मुंबईतून कोकणात जाण्यासाठी रो रो हा एक सुरक्षित आरामदायी आणि वेगवान प्रवासाचा पर्याय उपलब्ध आहे. नागरिक याला सकारात्मक प्रतिसाद देत आहेत आणि यापुढेही उत्साहवर्धक प्रतिसाद असेल असे दिसत आहे. रो रो सेवेच्या माध्यमातून मुंबईला अन्य राज्यांबरोबर जोडण्याचे काम आणि पर्यटन, रोजगार आणि कृषी क्षेत्राला चालना देण्याचे काम होणार आहे.


रो रो सेवेमुळे मुंबई ते कोकण प्रवास वेगाने करता येईल. वेळेची बचत होण्यास मदत होईल.  आंबा, काजू, मासेमारी व्यवसायाला चालना मिळेल. पर्यटन आणि रोजगाराला मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन मिळेल. पर्यावरणपूरक विकास हाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचा हेतू आहे. हा हेतू साध्य करण्यासाठीचा प्रयत्न म्हणून रो रो सेवेचे नियोजन सुरू असल्याची माहिती मंत्री नितेश राणे यांनी दिली.

Comments
Add Comment

LPG Gas Cylinder : मोठी बातमी! आता ५ किलोचे गॅस सिलिंडर मिळणार 'डबल'; LPG बाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय

नवी दिल्ली : इराण आणि इस्रायलमध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे जागतिक स्तरावर इंधनाचे संकट ओढवले

Sangli Crime News : तमाशातील वाद, दारू प्रेमसंबंधांचा शेवट; २४ तासांत सांगलीत सलग तीन खुनांनी खळबळ

सांगली : सांगली जिल्ह्यात गेल्या २४ तासांत घडलेल्या तीन वेगवेगळ्या खुनांच्या घटनांनी कायदा-सुव्यवस्थेबाबत

Mumbai Metro 9 Inauguration : अखेर दहिसर-काशिगाव मेट्रो लाईन ९ चे होणार उद्घाटन; जाणून घ्या स्थानके, तिकीटाची किंमत

मुंबई : तारीख पे तारीख म्हणत आज अखेर मुंबई मेट्रो ९ ( दहिसर ते काशीगाव ) या मार्गिकेचे उदघाटन संपन्न होणार आहे.

IPL 2026: मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स आज आमनेसामने; विजयासाठी दोन्ही संघ सज्ज

मुंबई : आयपीएल 2026 मधील आजचा सामना क्रिकेटप्रेमींसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स

Ashok Kharat Case : नाशिक खरात प्रकरण: मंदिरातील देणग्या ते परदेशी दुव्यांपर्यंत SIT ची चौकशी

मुंबई : नाशिकमधील अशोक खरात प्रकरणात तपास दिवसेंदिवस अधिक व्यापक होत असून, विशेष तपास पथक (SIT) विविध अंगांनी चौकशी

रस्ते विकासाच्या कामांबाबत मनसेच्या किल्लेदारांचा स्थायी समिती अध्यक्षांना सवाल

अर्थसंकल्पावरील भाषणात घेतला समाचार मुंबई : मुंबईतील अनेक रस्त्यांच्या कामांच्या विकासाची कामे