Wednesday, February 25, 2026

महाराष्ट्रातील व्याघ्र संवर्धनासमोर मोठे आव्हान: वर्षात ४१ वाघांना मुकलो, मानवनिर्मित कारणांमुळे धोक्यात वाढ

महाराष्ट्रातील व्याघ्र संवर्धनासमोर मोठे आव्हान: वर्षात ४१ वाघांना मुकलो, मानवनिर्मित कारणांमुळे धोक्यात वाढ

मुंबई : महाराष्ट्र राज्यामध्ये २०२५ या एकाच वर्षात तब्बल ४१ वाघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती वनमंत्र्यांनी विधानसभेत लेखी उत्तराद्वारे सादर केली आहे. या मृत्यूंच्या कारणांचा आढावा घेतल्यास असे दिसून येते की, २८ वाघांचा मृत्यू नैसर्गिक कारणांनी झाला असला तरी, उर्वरित १३ वाघांचा बळी हा मानवी हस्तक्षेप आणि अपघातांमुळे गेला आहे; यात ८ वाघ विविध अपघातांमध्ये, ४ वाघ विजेचा धक्का लागल्याने, तर १ वाघ शिकारीमुळे दगावला आहे.

या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर सरकारने रेल्वे आणि रस्ते अपघात रोखण्यासाठी वनक्षेत्रातील प्रस्तावित प्रकल्पांमध्ये वन्यप्राण्यांच्या सुरक्षित वावरासाठी अंडरपास व ओव्हरपास बांधण्याचे निर्देश दिले आहेत, तसेच रेल्वेचा वेग ताशी ४० किमीपर्यंत मर्यादित ठेवण्याच्या सूचनाही केल्या आहेत. शिकारीच्या संकटाचा सामना करण्यासाठी 'विशेष व्याघ्र संरक्षण दल' सक्रिय करण्यात आले असून, वनपरिक्षेत्र स्तरावर खबऱ्यांची जाळी, बिनतारी यंत्रणा आणि तपासणी नाक्यांद्वारे कडक पाळत ठेवली जात आहे. याशिवाय, वाघांच्या भ्रमणमार्गावर कॅमेरा ट्रॅप बसवणे, पंधरवड्यातून एकदा त्यांच्या अस्तित्वाचा मागोवा घेणे आणि पाणवठ्यांवरील विषप्रयोगासारख्या घटना रोखण्यासाठी नियमित गस्त घालणे अशा उपाययोजना राबविल्या जात आहेत.

व्याघ्र प्रकल्पांवर मोठ्या प्रमाणात खर्च होत असतानाही वाघांचे होणारे मृत्यू ही पर्यावरणाच्या दृष्टीने गंभीर बाब असून, मानव-वन्यजीव संघर्ष रोखणे आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने त्यांच्या नैसर्गिक अधिवासाचे रक्षण करणे, हेच खऱ्या अर्थाने संपूर्ण जंगलव्यवस्थेच्या संरक्षणासाठी अत्यावश्यक आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >