अमली पदार्थ विक्रेत्यांची संपत्ती जप्त करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; कुरिअर कंपन्यांवर बारीक नजर

मुंबई : "युवा पिढीसमोर अंमली पदार्थांचे मोठे आव्हान आहे. या प्रश्नाबाबत राज्य सरकारची भूमिका अत्यंत कठोर आहे. त्यामुळेच अशा गुन्ह्यातील आरोपींना मकोका कायदा लावण्याचा निर्णय यापूर्वीच घेण्यात आला आहे. त्यातच गुन्हेगारांची मालमत्ता जप्त करण्याची तरतूद असून, त्यानुसार कारवाई करण्यात येईल", अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत दिली.


अंमली पदार्थांच्या विरोधात पोलिसांनी केलेली कारवाई आणि अंमली पदार्थांचा जप्त केलेला साठा यासंदर्भात अमिन पटेल, वरूण सरदेसाई, अस्लम शेख आदी आमदारांनी प्रश्न उपस्थित केले. यावेळी झालेल्या चर्चेला उत्तर देताना राज्यमंत्री योगेश कदम म्हणाले की अंमली पदार्थांच्या संदर्भात राज्य सरकारची भूमिका अत्यंत कठोर आहे. त्यामुळेच अशा गुन्ह्यात पोलीस अधिकाऱ्यांचा सहभाग आढळून आल्यास थेट बडतर्फीच्या कारवाईचा निर्णय करण्यात आला आहे. त्यानुसार आतापर्यंत १५ पोलिस अधिकाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई करण्यात आली असून दहाजणांना निलंबित करण्यात आले आहे.



कुरिअर कंपनीवरही नजर


अंमली पदार्थांच्या विक्रीसाठी वेगवेगळे मार्ग शोधले जात आहेत. इन्स्टाग्रामसारख्या अॅपचा 'मार्केट प्लेस' म्हणून वापर केला जात आहे. तसेच कुरिअर कंपन्यांचाही वापर केला जातो. कुरिअरद्वारे अंमली पदार्थ पाठवले जात असल्याचे आढळून आले आहे. अशा कुरिअरवर कारवाई केली जात आहे. त्यांना प्रशिक्षणही देण्यात आले आहे. मोठ्या रकमेचा साठा जप्त करण्यात आल्याच्या घटना समोर येत आहेत. कारण, अगदी छोट्या ठिकाणी कोणताही कारखाना वगैरे नसले तरी मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थ तयार करणे शक्य झाले आहे. त्यामुळे अंमली पदार्थ तयार करण्यासाठी जी सामग्री किंवा रसायने लागतात त्या परवानाधारक पुरवठादारांवरही नजर ठेवली जात आहे. अंमली पदार्थांच्या प्रत्येक घटनेत पुढची आणि मागची साखळी उघड करण्याची सरकारची भूमिका आहे. त्यामुळेच मोठ्या प्रमाणावर परराज्यातून गुन्हेगार ताब्यात घेतले. एका प्रकरणात तर परदेशातून गुन्हेगाराला पकडून आणले. अशा प्रकरणात कुठलीही तडजोड केली जाणार नाही, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.

Comments
Add Comment

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत कोयना महोत्सवाची यशस्वी सांगता

सातारा: राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पर्यटन नकाशावर अग्रस्थानी नेण्याचा निर्धार व्यक्त करत पर्यटन, शेती आणि रोजगार

मुख्यमंत्र्यांच्या पाठबळामुळे ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील पर्यावरणीय पुनरुज्जीवन प्रकल्पाला मिळाली चालना

मुंबई: जैवविविधतेने समृद्ध अशा ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प परिसरातील जागेचे पर्यावरणीय पुनरुज्जीवन

‘पीएनजी’ क्षेत्रातील नागरिकांना ३० जूननंतर ‘एलपीजी’ गॅस पुरवठा बंद; पर्यायी इंधन म्हणून केरोसीनचे वाटप होणार

मुंबई: राज्यातील ज्या शहरी भागांमध्ये पाइपद्वारे गॅस (पीएनजी) जोडणीची सुविधा उपलब्ध आहे, तिथे नागरिकांनी पीएनजी

Ramdas Athawale: केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राज्यसभा खासदार पदाची केली हॅट्ट्रिक

मुंबई: रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांची तिस-यांदा

Delhi: हातात पुष्पगुच्छ घेऊन थेट शिरला विधानसभेत, अध्यक्षांच्या गाडीजवळ फुलांचा गुच्छ ठेवला अन्...

नवी दिल्ली: दिल्ली विधानसभेत सुरक्षेचा मोठा भंग झाल्याचे वृत्त आहे. एका वाहनाने बॅरियर तोडून गेट क्रमांक २ मधून

Umpire Killed Over Run-Out Argument : विशाखापट्टणम हादरलं! रनआऊट दिलं म्हणून थेट अंपायरचीच केली हत्या

विशाखापट्टणम येथे घडलेल्या एका धक्कादायक घटनेने क्रीडा क्षेत्र हादरले आहे. स्थानिक स्तरावर सुरू असलेल्या