Police: सरकारचा मोठा निर्णय; ५१ हजार पोलिसांना लागू होणार नवा नियम

मुंबई: पोलीस दलातील शिस्त आणि गांभीर्य टिकवून ठेवण्यासाठी प्रशासनाने एक मोठा निर्णय घेतला आहे. आता पोलीस कर्मचाऱ्यांना गणवेशात रील, मिनी-व्लॉग किंवा कोणत्याही प्रकारचे व्हिडिओ समाजमाध्यमांवर पोस्ट करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. मुंबईतील ५१ हजार पोलीस कर्मचाऱ्यांना हा नियम लागू असेल. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर शिस्तभंगविषयक कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. अनेक वेळा पोलीस आपल्या वर्दीमध्ये रिल करताना दिसत होते. त्याबाबतच्या तक्रारी वाढल्या होत्या. त्यामुळे हा निर्णय घ्याला लागला आहे.


विशेष शाखेचे उपायुक्त दत्तात्रेय कांबळे यांनी गुरुवारी परिपत्रक काढून स्पष्ट केले की, अनेक कर्मचारी गणवेशात व्हिडिओ बनवताना कर्तव्यावरील संवेदनशील ठिकाणे, सरकारी वाहने आणि शस्त्रे यांचे चित्रीकरण करतात. यामुळे ऑपरेशनल सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो. विधीमंडळातही काही आमदारांनी हा मुद्दा उपस्थित केला होता, ज्याची दखल आता प्रशासनाने घेतली आहे.


या नियमाची अंमलबजावणी करण्यासाठी मुंबई पोलिसांच्या सोशल मीडिया लॅबला विशेष जबाबदारी देण्यात आली आहे. 'खाकी स्वॅग' सारख्या ट्रेंडवर आता पूर्णपणे बंदी येणार असून, खासगी आयुष्य आणि कर्तव्य यांची सरमिसळ टाळण्याचे आदेश देण्यात आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून 'खाकी स्वॅग' नावाचा ट्रेंड पोलिसांमध्ये लोकप्रिय झाला होता. मात्र, यामुळे कर्तव्यावरील गोपनीयता भंग पावत असल्याची तक्रार होती.


पोलीस दलाची प्रतिष्ठा जपण्यासाठी सोशल मीडियाचा वापर केवळ वैयक्तिक कामासाठीच करावा, असे स्पष्ट करण्यात आले आहे. विधानसभेतही लोकप्रतिनिधींनी या विषयावर चिंता व्यक्त केली होती. त्यांनतर आता पोलीस प्रशासनाने हे पाऊल उचलले आहे. मुंबई पोलिसांची सोशल मीडिया लॅब आता सर्व प्लॅटफॉर्मवर लक्ष ठेवून असेल, जेणेकरून नियमांचे उल्लंघन होणार नाही. ज्याच्याकडून याचे उल्लंघन होईल त्याच्यावर कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे आता अशा व्हिडीओना चाप बसण्यास मदत होईल.

Comments
Add Comment

Latur: वडिलांच्या निधनानंतर अवघ्या दीड तासात दिला बारावीचा पेपर; शिवानीची जिद्द मनाला चटका लावून गेली

लातूर: लातूरमधील एका १७ वर्षीय मुलीच्या जिद्दीला सलाम करणारी घटना समोर आली आहे. या मुलीने शिक्षणासाठी दाखवलेली

Maharashtra Agri AI : केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी केले महाराष्ट्र ‘अॅग्री एआय पॉलिसी’चे कौतुक

मुंबई : महाराष्ट्राने जाहीर केलेली स्वतंत्र ‘अ‍ॅग्री एआय पॉलिसी’ स्वागतार्ह असून इतर राज्यांनीही त्याचे

Pune Airport: हवाई प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी; 'या' आंतरराष्ट्रीय मार्गावरील विमानसेवा रद्द

पुणे: थायलंडच्या सहलीचं नियोजन करणाऱ्या पुणेकरांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे. प्रसिद्ध विमान कंपनी 'इंडिगो'ने

Buldhana News : शिवरायांच्या पुतळ्याचा वाद चिघळला; गावात संचारबंदी लागू

बुलढाणा : बुलढाणा मधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून सुरु झालेला वाद चांगलाच चिघळला आहे. याच

Maharashtra Unseasonal Rain: महाराष्ट्रावर अवकाळीचं संकट; 'या' जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस

मुंबई: विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये रविवारी रात्री जोरदार पाऊस पडल्याची माहिती समोर आली आहे. नागपूर, गोंदिया

साखरपुड्यानंतर ४ दिवसांत जोडप्याचा दुर्दैवी अंत; धाराशिवमध्ये कारचा भीषण अपघात

धाराशिव : लग्नसमारंभाला अवघे काही दिवस बाकी असताना दोन कुटुंबांवर काळाने घाला घातला आहे. धाराशिव जिल्ह्यातील