Police: सरकारचा मोठा निर्णय; ५१ हजार पोलिसांना लागू होणार नवा नियम

मुंबई: पोलीस दलातील शिस्त आणि गांभीर्य टिकवून ठेवण्यासाठी प्रशासनाने एक मोठा निर्णय घेतला आहे. आता पोलीस कर्मचाऱ्यांना गणवेशात रील, मिनी-व्लॉग किंवा कोणत्याही प्रकारचे व्हिडिओ समाजमाध्यमांवर पोस्ट करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. मुंबईतील ५१ हजार पोलीस कर्मचाऱ्यांना हा नियम लागू असेल. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर शिस्तभंगविषयक कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. अनेक वेळा पोलीस आपल्या वर्दीमध्ये रिल करताना दिसत होते. त्याबाबतच्या तक्रारी वाढल्या होत्या. त्यामुळे हा निर्णय घ्याला लागला आहे.


विशेष शाखेचे उपायुक्त दत्तात्रेय कांबळे यांनी गुरुवारी परिपत्रक काढून स्पष्ट केले की, अनेक कर्मचारी गणवेशात व्हिडिओ बनवताना कर्तव्यावरील संवेदनशील ठिकाणे, सरकारी वाहने आणि शस्त्रे यांचे चित्रीकरण करतात. यामुळे ऑपरेशनल सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो. विधीमंडळातही काही आमदारांनी हा मुद्दा उपस्थित केला होता, ज्याची दखल आता प्रशासनाने घेतली आहे.


या नियमाची अंमलबजावणी करण्यासाठी मुंबई पोलिसांच्या सोशल मीडिया लॅबला विशेष जबाबदारी देण्यात आली आहे. 'खाकी स्वॅग' सारख्या ट्रेंडवर आता पूर्णपणे बंदी येणार असून, खासगी आयुष्य आणि कर्तव्य यांची सरमिसळ टाळण्याचे आदेश देण्यात आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून 'खाकी स्वॅग' नावाचा ट्रेंड पोलिसांमध्ये लोकप्रिय झाला होता. मात्र, यामुळे कर्तव्यावरील गोपनीयता भंग पावत असल्याची तक्रार होती.


पोलीस दलाची प्रतिष्ठा जपण्यासाठी सोशल मीडियाचा वापर केवळ वैयक्तिक कामासाठीच करावा, असे स्पष्ट करण्यात आले आहे. विधानसभेतही लोकप्रतिनिधींनी या विषयावर चिंता व्यक्त केली होती. त्यांनतर आता पोलीस प्रशासनाने हे पाऊल उचलले आहे. मुंबई पोलिसांची सोशल मीडिया लॅब आता सर्व प्लॅटफॉर्मवर लक्ष ठेवून असेल, जेणेकरून नियमांचे उल्लंघन होणार नाही. ज्याच्याकडून याचे उल्लंघन होईल त्याच्यावर कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे आता अशा व्हिडीओना चाप बसण्यास मदत होईल.

Comments
Add Comment

सेवानिवृत्त एस.टी. कर्मचाऱ्यांना पत्नीसह वर्षभर मोफत प्रवास करता येणार; मंत्री प्रताप सरनाईकांनी दिली माहिती

मुंबई: एस.टी. कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर सकारात्मक तोडगा काढण्यासाठी राज्याचे परिवहन मंत्री

उन्हाळ्याच्या सुट्टीनिमित्त पुण्यातून धावणार ३३४ उन्हाळी विशेष ट्रेन

पुणे : परीक्षा संपली की वेध लागतात ते सुट्टीचे, बाहेरगावी फिरायला जायचे, त्यामुळे उन्हाळ्यात रेल्वेवर

बोगस डॉक्टरांचे रॅकेट उद्ध्वस्त करणार; विधानपरिषदेत मंत्री उदय सामंत यांची मोठी घोषणा

मुंबई : राज्यातील झोपडपट्टी आणि गरीब वस्त्यांमध्ये फोफावलेल्या बोगस डॉक्टरांच्या जाळ्यावर आता राज्य सरकार

मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; महाराष्ट्रातील १० हजार गावांसाठी...

अहिल्यानगर: हवामानातील सतत होणारे बदल हे कृषी क्षेत्रासमोर मोठे आव्हान बनले असून त्याचा थेट परिणाम शेती

Chhatrapati Sambhajinagar: आर्थिक व्यवहारातून सेवानिवृत्त प्राध्यापकाची हत्या; अखेर थरारक प्रकार उघड

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये आर्थिक व्यवहारातून सेवानिवृत्त प्राध्यापकाचा खून केल्याची

पुण्यात मेट्रोचे २०० किमीचे जाळे उभारणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे मेट्रो भवनचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन पुणे :  पुणे मेट्रो प्रकल्पामुळे शहरातील