महाराष्ट्र भाजपकडून 'एसआयआर' समिती गठित

मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने मतदार यादीचा विशेष सखोल फेरनिरीक्षण (एसआयआर) कार्यक्रम जाहीर केला असून, या प्रक्रियेचा राज्यभर प्रभावी पाठपुरावा करण्यासाठी भाजपने विशेष नियोजन केले आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी यासंदर्भात पक्षाची विशेष 'एसआयआर' समिती गठीत केली असून, यात अनुभवी नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे.


निवडणूक आयोगाच्या 'एसआयआर' कार्यक्रमाच्या माध्यमातून मतदार याद्यांमधील त्रुटी दूर करणे, दुबार नावे वगळणे आणि पात्र मतदारांची नोंदणी सुनिश्चित करणे हे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. या प्रक्रियेत पारदर्शकता राहावी आणि तांत्रिक बाबींची पूर्तता व्हावी, यासाठी भाजपच्या या समितीवर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. पक्षाच्या या महत्त्वाच्या समितीत माजी खासदार किरीट सोमय्या, राज्यसभा खासदार डॉ. भागवत कराड, आमदार रणधीर सावरकर, आमदार मंगेश चव्हाण, प्रदेश सरचिटणीस ॲड. माधवी नाईक, माजी संघटन मंत्री रघुनाथ कुलकर्णी, माजी आमदार सुनील राणे आणि माजी जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे यांचा समावेश आहे.

Comments
Add Comment

Mirabai Chanu : मीराबाई चानूची सोनेरी हॅटट्रिक!

ग्लासगो : भारताची स्टार वेटलिफ्टर आणि ऑलिम्पिक पदकविजेती मीराबाई चानू हिने ग्लासगो २०२६ राष्ट्रकुल क्रीडा

Ind vs Zim : श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात भारताने जिंकली पहिली टी-२० मालिका; झिम्बाब्वेचा ३-० ने व्हाईटवॉश !

भारताचा ३५ धावांनी दणदणीत विजय ! हरारे : भारत आणि झिम्बाब्वे यांच्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील तिसऱ्या

Byculla Police Station Fire: भायखळा पोलीस ठाण्याच्या पहिल्या मजल्यावर आग; अग्निशमन दलाकडून तातडीने नियंत्रण

मुंबई: मुंबईतील भायखळा पोलीस ठाण्यात रविवारी रात्री आग (Fire) लागल्याची घटना घडली. ही आग पोलीस ठाण्याच्या पहिल्या

Question Paper Leak : प्रश्नपत्रिका फुटीविरोधी नवीन विधेयक लोकसभेत सादर होणार

नवी दिल्ली: प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणावरून संसदेत निर्माण झालेला गतिरोध आता संपण्याची चिन्हे असून, आंदोलक

Dam Water Level : राज्यात ५६ टक्के उपयुक्त पाणीसाठा, मराठवाड्यात मात्र चिंता कायम

पुणे : जुलै महिन्यात झालेल्या समाधानकारक पावसामुळे राज्यातील धरणांमधील उपयुक्त पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली

Narendra Modi : परीक्षा पद्धतीत सुधारणेसाठी आणि पेपरफुटीला आळा घालण्यासाठी नंदन निलेकणींच्या नेतृत्वात उच्चाधिकार समितीची स्थापना, PM मोदींचा निर्णय

नवी दिल्ली : परीक्षा पद्धतीत सुधारणा करण्यासाठी आणि पेपरफुटीला आळा घालण्यासाठी नंदन निलेकणींच्या नेतृत्वात