अजित पवारांच्या विमान अपघाताची सीबीआय चौकशी करावी, मुख्यमंत्री फडणवीसांची अमित शहांना विनंती

मुंबई : पुणे जिल्ह्यातील बारामती येथे २८ जानेवारी रोजी झालेल्या विमान अपघातात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे सीबीआय चौकशीचे आदेश देण्याची विनंती केली. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, महायुती सरकार अजित पवार यांच्या विमान अपघाती मृत्यूबाबत असलेले सर्व संशय दूर करू इच्छिते.


रविवारी, २२ फेब्रुवारी रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “मला भाजपची सहयोगी पक्ष एनसीपीकडून विमान अपघाताची सीबीआय चौकशी करण्याची मागणी असलेले पत्र प्राप्त झाले होते आणि याबाबत मी गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा केली आहे.” ते पुढे म्हणाले, “डीजीसीए (नागरी विमान वाहतूक महासंचालनालय) आणि राज्याच्या सीआयडी पथकाच्या चौकशीबरोबरच सीबीआय चौकशी करण्याचीही विनंती करण्यात आली आहे.”


फडणवीस यांनी सांगितले की, डीजीसीए कडून व्हीसीआर कंपनीचे लेखापरीक्षण (ऑडिट) सुरू असून कंपनीच्या सर्व लॉगबुकची तपासणी केली जात आहे. “आपल्याला चौकशी अहवालाची प्रतीक्षा करावी लागेल आणि तर्क-वितर्क टाळावेत,” असे त्यांनी नमूद केले.मुख्यमंत्री पुढे म्हणाले, “काही शंका असू शकतात; त्या योग्य प्राधिकरणाकडे पाठवण्यात येतील. आम्ही चौकशीचा नियमित पाठपुरावा देखील करू. डीजीसीए आणि नागरी विमान वाहतूक मंत्रालयाकडे लपवण्यासारखे काहीही नाही, असे मला वाटते.”


फडणवीस यांनी हेही सांगितले की त्यांनीही अनेकदा व्हीसीआर विमानाने प्रवास केला आहे. दरम्यान, २८ जानेवारी रोजी पुणे जिल्ह्यातील बारामतीजवळ विमान लँडिंग करण्याचा प्रयत्न करत असताना झालेल्या अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ देण्यात आली.

Comments
Add Comment

नागपूर येथील भारतीय व्यवस्थापन संस्थेला इन्क्यूबेशन सेंटर म्हणून मान्यता

मुंबई: विदर्भातील नवउद्योग (स्टार्टअप) परिसंस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत,

नमो शेतकरी महासन्मान निधीचा ८ वा हप्ता पुढील आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार; कृषीमंत्र्यांनी दिली माहिती

मुंबई: राज्यातील लाखो शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला असून, नमो

‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक’ विधानपरिषदेत मंजूर

मुंबई: महाराष्ट्रात गेल्या काही काळापासून चर्चेत असलेले आणि अत्यंत कडक तरतुदी असलेले ‘महाराष्ट्र

सिंधुदुर्गच्या विकासाला बुस्टर; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत १०० टक्के 'व्हिजीएफ'ला मंजुरी

मुंबई: सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटनाला आणि अर्थव्यवस्थेला मोठी गती देणारा निर्णय मंगळवारी राज्य

नंदूरबार,छत्रपती संभाजीनगरमधील गैरव्यवहारासाठी 'एसआयटी स्थापन; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विधान परिषदेत घोषणा

​मुंबई: नंदूरबार जिल्ह्यातील नवापूर येथील भूसंपादन गैरव्यवहार आणि छत्रपती संभाजीनगरमधील ब्रिजवाडी येथील ५४

मुंबईचा पश्चिम आणि पूर्व द्रुतगती महामार्ग पावसाळ्यापूर्वी समतल करा; उपमहापौरांची आयुक्तांकडे निवेदनाद्वारे मागणी

मुंबई: मुंबई महानगरातील रस्त्यांची स्थिती अधिक सुधारण्यासाठी पश्चिम व पूर्व द्रुतगती महामार्ग तसेच प्रमुख