साखरपुड्यानंतर ४ दिवसांत जोडप्याचा दुर्दैवी अंत; धाराशिवमध्ये कारचा भीषण अपघात

धाराशिव : लग्नसमारंभाला अवघे काही दिवस बाकी असताना दोन कुटुंबांवर काळाने घाला घातला आहे. धाराशिव जिल्ह्यातील रत्नापूर पाटी परिसरात पहाटे घडलेल्या भीषण अपघातात नुकतेच साखरपुडा झालेले जोडपे जागीच मृत्युमुखी पडले. या घटनेने वाशी तालुक्यासह परिसरात शोककळा पसरली आहे.


सोलापूर–धुळे राष्ट्रीय महामार्गावरील रत्नापूर पाटीजवळ आज पहाटे साडेपाच ते सहाच्या दरम्यान ही दुर्घटना घडली. Tata Nexon या चारचाकीने तीव्र वळण घेताना नियंत्रण गमावले आणि समोरील टोल कमानीवर जोरात आदळली.


या अपघातात वाशी तालुक्यातील पारा येथील अक्षय रामभाऊ शिनगारे (२५) आणि वाशी येथील अक्षया सुनील चव्हाण (२३) यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. दोघांचा चार दिवसांपूर्वी साखरपुडा पार पडला होता. लग्नाच्या तयारीला सुरुवात झालेली असतानाच घडलेल्या या घटनेने दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.



नेमके काय घडले?


मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, अक्षया चव्हाण हिच्या महापारेषण परीक्षेसाठी दोघे लातूरकडे निघाले होते. रत्नापूर पाटीजवळील वळणावर चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने कार थेट कमानीवर जाऊन धडकली. अपघाताची तीव्रता इतकी होती की वाहनाच्या पुढील भागाचा चुराडा झाला.



वाहतूक काही काळ ठप्प


घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि महामार्ग सुरक्षा पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमी चालकाला उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले असून त्याची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जाते. अपघातानंतर काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.


पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. अपघात प्रकरणी पोलीस तपास सुरू आहे. लग्नाच्या उत्साहात असलेल्या दोन कुटुंबांवर आलेल्या या दुर्दैवी प्रसंगाने संपूर्ण परिसर हळहळ व्यक्त करत आहे.

Comments
Add Comment

ठाणे पूर्व येथील श्री जय अंबे माता नवरात्रोत्सव मंडळाच्या देवीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न; उपमुख्यमंत्री शिंदेंनी केली सहकुटुंब देवीची पूजा

ठाणे: चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे

‘गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार'मुळे भागली ११ हजार गावांची तहान

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची संकल्पना; ७७ लाख टँकर क्षमतेचा पाणीसाठा पुनर्संचयित, ७.७३ कोटी घनमीटर गाळ

अभ्यास न झाल्याने विद्यार्थाने चोरली प्रश्नपत्रिका, थेट...

मुंबई: राज्यात दहावी- बारावी बोर्ड परिक्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार सुरु असल्याचे समोर येत आहे. एकीकडे

Gudi Padwa 2026 : नवनियुक्त राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी दिल्या गुढीपाडव्यानिमित्त शुभेच्छा

मुंबई : महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी गुढीपाडवा व मराठी नवीन वर्षा निमित्त राज्यातील

भविष्य सांगता सांगता जमवली अवाढव्य संपत्ती, अशोक खरातचं साम्राज्य कुठे आणि किती?

अहिल्यानगर: महिलांचे शोषण करणाऱ्या आणि स्वतःला ज्योतिषी म्हणवून घेणाऱ्या अशोक खरात उर्फ कॅप्टन खरात याच्या

Gudi Padwa 2026 Muhurat: गुढीपाडव्याचा इतिहास काय आहे?, जाणून घ्या मुहूर्त, पूजा आणि विधी

मुंबई: हिंदू धर्मात गुढीपाडवा सणाला अतिशय महत्त्व आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला हा दिवस चैत्र शुद्ध