साखरपुड्यानंतर ४ दिवसांत जोडप्याचा दुर्दैवी अंत; धाराशिवमध्ये कारचा भीषण अपघात

धाराशिव : लग्नसमारंभाला अवघे काही दिवस बाकी असताना दोन कुटुंबांवर काळाने घाला घातला आहे. धाराशिव जिल्ह्यातील रत्नापूर पाटी परिसरात पहाटे घडलेल्या भीषण अपघातात नुकतेच साखरपुडा झालेले जोडपे जागीच मृत्युमुखी पडले. या घटनेने वाशी तालुक्यासह परिसरात शोककळा पसरली आहे.


सोलापूर–धुळे राष्ट्रीय महामार्गावरील रत्नापूर पाटीजवळ आज पहाटे साडेपाच ते सहाच्या दरम्यान ही दुर्घटना घडली. Tata Nexon या चारचाकीने तीव्र वळण घेताना नियंत्रण गमावले आणि समोरील टोल कमानीवर जोरात आदळली.


या अपघातात वाशी तालुक्यातील पारा येथील अक्षय रामभाऊ शिनगारे (२५) आणि वाशी येथील अक्षया सुनील चव्हाण (२३) यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. दोघांचा चार दिवसांपूर्वी साखरपुडा पार पडला होता. लग्नाच्या तयारीला सुरुवात झालेली असतानाच घडलेल्या या घटनेने दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.



नेमके काय घडले?


मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, अक्षया चव्हाण हिच्या महापारेषण परीक्षेसाठी दोघे लातूरकडे निघाले होते. रत्नापूर पाटीजवळील वळणावर चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने कार थेट कमानीवर जाऊन धडकली. अपघाताची तीव्रता इतकी होती की वाहनाच्या पुढील भागाचा चुराडा झाला.



वाहतूक काही काळ ठप्प


घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि महामार्ग सुरक्षा पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमी चालकाला उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले असून त्याची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जाते. अपघातानंतर काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.


पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. अपघात प्रकरणी पोलीस तपास सुरू आहे. लग्नाच्या उत्साहात असलेल्या दोन कुटुंबांवर आलेल्या या दुर्दैवी प्रसंगाने संपूर्ण परिसर हळहळ व्यक्त करत आहे.

Comments
Add Comment

राज्यात 'लव्ह जिहाद व अवैध धर्मांतर विरोधी' कायदा तात्काळ करण्याच्या मागणीला जोर

- हिंदू जनजागृती समितीसह हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून राज्यभर ठिकठिकाणी प्रशासनाला निवेदने मुंबई : गेल्या दोन

चेन्नईत बीचवर अडकले महाराष्ट्रातील विद्यार्थी, मुख्यमंत्री तामिळनाडू सरकारच्या संपर्कात

मुंबई : चेन्नई (तामिळनाडू) येथील गोल्डन बीचवर फिरण्यासाठी गेलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या गटासोबत

Solapur Crime: हातावर सुसाईट नोट लिहत विवाहितेने संपवलं आयुष्य; सोलापुरातील नातेपुते शहरातील हृदयद्रावक घटना

सोलापूर: सोलापूर जिल्ह्यातील नातेपुते येथे एका विवाहितेने आपल्या हातावर मजकूर लिहून आत्महत्या केल्याने खळबळ

आता… ‘गाव तिथे एसटी’ नव्हे... ‘आदिवासी पाडा, तिथे एसटी’! - परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

सह्याद्री व मेळघाटच्या कुशीत, धुक्याने वेढलेल्या डोंगरदऱ्यांमध्ये, आजवर केवळ पायवाटांनीच ओलांडलेले अंतर आता

Mumbai-Nashik Local Train: मुंबई-नाशिक लोकलसेवा सुरु होणार; रेल्वे मार्गाच्या विस्ताराला मंजुरी

मुंबई: मुंबई आणि नाशिक या दोन महत्त्वाच्या शहरांमधील प्रवास आता अधिक वेगवान आणि सुखकर होणार आहे. मुंबईच्या

Pune: पुण्यात मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश; महिलांच्या जीवाशी खेळणाऱ्या बाबू भैय्याचं पितळ उघड

पुणे: पुण्याच्या गजबजलेल्या बुधवार पेठेत गेल्या २० वर्षांपासून बाबू भैय्या हे नाव अत्यंत दबदब्यानं घेतलं जातं.