समुद्रमार्गाने गाठा कोकणाची वाट; मुंबई–विजयदुर्ग रो रो फेरी १ मार्चपासून सेवेत; जाणून घ्या वेळ आणि तिकीट

मुंबई : कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी समुद्रमार्गाचा पर्याय पुन्हा एकदा उपलब्ध होत आहे. मुंबई ते विजयदुर्ग दरम्यान रो रो फेरी सेवा १ मार्च २०२६ पासून सुरू होत असून, या सुविधेमुळे रस्त्यावरील दीर्घ आणि वाहतूक कोंडीचा प्रवास टाळता येणार आहे.


आणि याचे उदघाटन सिंधुदुर्गाचे पालकमंत्री नितेश राणे स्वतः मुंबई ते विजयदुर्ग असा प्रवास करून या सुविधेचे उदघाटन करणार आहेत.



असा असेल प्रवासाचा आराखडा


‘एम२एम प्रिंसेस’ ही फेरी सकाळी ८ वाजता मुंबईतून भाऊच्या धक्क्यावरून सुटेल आणि दुपारी ३ वाजता विजयदुर्ग येथे पोहोचेल. परतीची फेरी दुपारी १२ वाजता विजयदुर्गहून निघून सायंकाळी ७ वाजेपर्यंत मुंबईत दाखल होईल. एकूण प्रवासाचा कालावधी सुमारे सात तासांचा असेल.



मार्च २०२६ मधील फेऱ्या


मुंबई ते विजयदुर्ग : १, ४, ७, ११, १४, १८, २१ आणि २५ मार्च
विजयदुर्ग ते मुंबई :२, ५, ८, १२, १५, १८, २२ आणि २६ मार्च



भाडे तपशील


इकॉनॉमी – २,५०० रुपये
प्रीमियम इकॉनॉमी – ४,००० रुपये
बिझनेस क्लास – ७,५०० रुपये
फर्स्ट क्लास – ९,००० रुपये
दुचाकी – १,००० रुपये
सायकल – ६०० रुपये
चारचाकी – ६,००० रुपये
बस – १३,००० ते २१,००० रुपये



कोकणाला नवा पर्याय


समुद्रमार्गामुळे प्रवास अधिक सुखकर होण्याची अपेक्षा आहे. विशेषतः पर्यटन हंगामात या सेवेचा फायदा होणार असून स्थानिक व्यवसाय, हॉटेल उद्योग आणि व्यापार क्षेत्रालाही चालना मिळेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Comments
Add Comment

सफाईच्या कामांचे ऑडिट करण्यासाठी आयआयटी मुंबईची मदत घेणार

मुंबई: मुंबईतील नालेसफाईच्या कामाला लवकरच सुरुवात होणार असून ज्याठिकाणी मिठी नदीच्या कामासाठी नव्याने निविदा

महापालिका शालेय वस्तूंच्या खरेदीसाठी आता जेम पोर्टलवरून निविदा

मुंबई: मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये वितरीत केल्या जाणाऱ्या २७ शालेय वस्तूंची खरेदीची प्रक्रिया रद्द करून

महालक्ष्मी येथे लहान प्राणी, पक्ष्यांच्या मृतदेहांवर अंत्यविधीची सुविधा; लहान पाळीव प्राण्यांचे रुग्णालय लवकरच होणार सुरू

मुंबई: मुंबई महानगरपालिका आणि टाटा ट्रस्ट संचालित लहान प्राण्यांच्या रुग्णालयात लहान प्राणी व पक्ष्यांच्या

दिव्यांगांना शिक्षण, कौशल्य व रोजगाराच्या संधी देत मुख्य प्रवाहात आणण्यावर भर; दिव्यांग कल्याण विभाग आता दिव्यांग सक्षमीकरण विभाग नावाने ओळखला जाणार

मुंबई: राज्यातील दिव्यांग व्यक्तींच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी राज्य शासनाने महत्त्वाचा निर्णय घेत

शिधावाटप विभागाच्या धडक कारवाईत वरळीतील गॅस सिलिंडरचा काळाबाजार उघड

मुंबई: वरळी परिसरात घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलिंडरचा काळाबाजार करणाऱ्या टोळीवर शिधावाटप विभागाने धडक

राज्यातील अनधिकृत मोबाईल टॉवर्सचे लवकर सर्वेक्षण

मुंबई : केंद्र शासनाचे धोरण आणि राज्याची गरज यांचा मेळ घालून भविष्यात महाराष्ट्राची स्वतंत्र 'टॉवर पॉलिसी' कशी