मुंबई : कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी समुद्रमार्गाचा पर्याय पुन्हा एकदा उपलब्ध होत आहे. मुंबई ते विजयदुर्ग दरम्यान रो रो फेरी सेवा १ मार्च २०२६ पासून सुरू होत असून, या सुविधेमुळे रस्त्यावरील दीर्घ आणि वाहतूक कोंडीचा प्रवास टाळता येणार आहे.
आणि याचे उदघाटन सिंधुदुर्गाचे पालकमंत्री नितेश राणे स्वतः मुंबई ते विजयदुर्ग असा प्रवास करून या सुविधेचे उदघाटन करणार आहेत.
असा असेल प्रवासाचा आराखडा
‘एम२एम प्रिंसेस’ ही फेरी सकाळी ८ वाजता मुंबईतून भाऊच्या धक्क्यावरून सुटेल आणि दुपारी ३ वाजता विजयदुर्ग येथे पोहोचेल. परतीची फेरी दुपारी १२ वाजता विजयदुर्गहून निघून सायंकाळी ७ वाजेपर्यंत मुंबईत दाखल होईल. एकूण प्रवासाचा कालावधी सुमारे सात तासांचा असेल.
मार्च २०२६ मधील फेऱ्या
मुंबई ते विजयदुर्ग : १, ४, ७, ११, १४, १८, २१ आणि २५ मार्च
विजयदुर्ग ते मुंबई :२, ५, ८, १२, १५, १८, २२ आणि २६ मार्च
भाडे तपशील
इकॉनॉमी – २,५०० रुपये
प्रीमियम इकॉनॉमी – ४,००० रुपये
बिझनेस क्लास – ७,५०० रुपये
फर्स्ट क्लास – ९,००० रुपये
दुचाकी – १,००० रुपये
सायकल – ६०० रुपये
चारचाकी – ६,००० रुपये
बस – १३,००० ते २१,००० रुपये
कोकणाला नवा पर्याय
समुद्रमार्गामुळे प्रवास अधिक सुखकर होण्याची अपेक्षा आहे. विशेषतः पर्यटन हंगामात या सेवेचा फायदा होणार असून स्थानिक व्यवसाय, हॉटेल उद्योग आणि व्यापार क्षेत्रालाही चालना मिळेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.