बदलापूरमध्ये IVF सेंटरमध्ये बेकायदा स्त्रीबीज विक्री प्रकरण; तीन महिलांना अटक

बदलापूर : ठाणे जिल्ह्यातील बदलापूर परिसरात पैश्यांचे आमिष देत महिलांकडून स्त्रीबीज संकलन करून त्यांची अवैध विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी बदलापूर पूर्व पोलिसांनी तीन महिलांना ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरू आहे.



गुप्त माहितीवरून कारवाई


जोवेली परिसरातील नॅनो सिटी येथील एका सदनिकेत संशयास्पद हालचाली सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर बदलापूर पूर्व पोलीस ठाण्याच्या पथकाने बदलापूर ग्रामीण रुग्णालयाच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. सावंत यांच्या उपस्थितीत छापा टाकला. कारवाईदरम्यान बीजोत्सर्जन वाढवण्यासाठी वापरली जाणारी इंजेक्शने आणि वैद्यकीय साहित्य आढळून आले.



महिलांना पैशांचे आमिष


प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, आर्थिक अडचणीत असलेल्या महिलांना संपर्क करून त्यांना पैश्याचे आश्वासन दिले जात होते. संबंधित महिलांना स्त्रीबीज वाढवण्याचे इंजेक्शन देण्यात येत होते त्यानंतर महिलांना आयव्हीएफ केंद्रात पाठवून स्त्रीबीज काढून त्यांची विक्री केली जात होती.



मोबाईलमधून धक्कादायक पुरावे


मुख्य आरोपीच्या मोबाईलमध्ये विविध महिलांची कागदपत्रे, कथित बनावट प्रतिज्ञापत्रे, सोनोग्राफी अहवाल, औषधांची माहिती आणि आर्थिक व्यवहारांशी संबंधित छायाचित्रे आढळली आहेत. या आधारे गरजू महिलांचा पुन्हा पुन्हा ‘डोनर’ म्हणून वापर केल्याचा संशय बळावला आहे.



तिघींना अटक, आणखी तपास सुरू


या प्रकरणी सुलक्षणा गाडेकर (४४), अश्विनी चाबुकस्वार (२९) आणि मंजुषा वानखेडे (४६) यांना अटक करण्यात आली आहे. परिमंडळ चार, उल्हासनगरचे पोलिस उपायुक्त यांनी दिलेल्या माहितीनुसार, या रॅकेटमध्ये २० हून अधिक महिलांचा सहभाग असण्याची शक्यता आहे. प्रत्येक महिलेला अंदाजे २५ ते ३० हजार रुपये देण्यात येत होते, अशी माहिती तपासात पुढे आली आहे. या अवैध जाळ्यामागे आणखी कोणी आहे का, याचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून सखोल चौकशी सुरू आहे.

Comments
Add Comment

Kumbhdoot App : मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले 'कुंभदूत ॲप'चे अनावरण

- एआय समिटमधील महाराष्ट्र पॅव्हेलियनला भेट नवी दिल्ली येथील भारत मंडपम येथे आयोजित 'इंडिया एआय समिट २०२६' मध्ये

पाक मिस्ट्री स्पिनर्सना रोखण्याचे 'किवीं'समोर आव्हान

कोलंबो :टी-२० विश्वचषकाच्या 'सुपर-८' फेरीचा थरार आजपासून खऱ्या अर्थाने सुरू होत असून, ग्रुप-२ मध्ये न्यूझीलंड आणि

Thane Municipal Corporation : ‘माझी वसुंधरा अभियान ५.०’ मध्ये ठाणे महापालिकेने पटकाविला तिसरा क्रमांक

ठाणे : राज्य शासनाच्या पर्यावरण व वातावरण बदल विभागामार्फत राबविण्यात आलेल्या ‘माझी वसुंधरा अभियान ५.०’

सैनिक शाळेत शिकण्याची सुवर्णसंधी

पुणे : महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय भारतीय सैन्य महाविद्यालय, डेहराडून, उत्तराखंड येथील इयत्ता

Central Government : निर्यातवाढीसाठी केंद्र सरकारकडून सात उपाययोजना जाहीर

नवी दिल्ली : देशाच्या निर्यातीला चालना देण्यासाठी केंद्र सरकारकडून एकूण सात उपाययोजना जाहीर करण्यात आल्या आहेत.

Nashik Mumbai : खड्ड्यांचं टेन्शन खल्लास! फक्त १२० मिनिटांत गाठाल मुंबई; नाशिक ते मुंबई प्रवासासाठी सरकारचा 'सुपर प्लॅन' काय आहे?

नाशिक : नाशिककरांसाठी विकासाची एक नवी पहाट उजाडली असून, मुंबई आणि नाशिकमधील प्रवासाचा वेळ आता निम्म्यावर येणार