आता गुपचूप लग्न शक्य नाही? गुजरातमध्ये विवाह नोंदणीसाठी नवा प्रस्ताव

अहमदाबाद : गुजरातमध्ये विवाहाच्या नोंदणीत काही बदल करण्यात आले आहेत. सध्याच्या नियमांनुसार, विवाहाची नोंदणी करण्यापूर्वी संबंधित जोडप्याने आपल्या आई-वडिलांना माहिती दिली असल्याची नोंद करणे अनिवार्य ठरणार आहे. या निर्णयामुळे कुटुंबीयांच्या नकळत लग्न करण्याच्या घटनांवर आळा बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


गुजरात सरकारने विवाह नोंदणी कायद्यात दुरुस्तीचा प्रस्ताव सादर केला आहे. विशेषतः नियम ४४ मध्ये बदल सुचवण्यात आला असून, हा बदल जनहिताचा असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले आहे. प्रस्तावानुसार विवाह नोंदणी अर्ज करताना आई-वडिलांची सविस्तर माहिती देणे आवश्यक राहील.



पालकांना अधिकृत सूचना


नव्या प्रक्रियेनुसार, अर्जदार जोडप्याला एक औपचारिक घोषणापत्र सादर करावे लागेल. त्यामध्ये पालकांना विवाहाबाबत माहिती दिल्याचा स्पष्ट उल्लेख करणे आवश्यक असेल. त्याचबरोबर आई-वडिलांचे ओळखपत्र, कायमचा पत्ता आणि मोबाईल क्रमांक नमूद करावा लागेल. कागदपत्रांची पडताळणी पूर्ण झाल्यानंतर सहाय्यक निबंधकांकडून संबंधित पालकांना दहा कामकाजाच्या दिवसांत इलेक्ट्रॉनिक किंवा लेखी स्वरूपात सूचना पाठवली जाणार आहे.



ऑनलाइन प्रणाली आणि प्रतीक्षा कालावधी


विवाह नोंदणीची संपूर्ण प्रक्रिया राज्याच्या केंद्रीकृत ऑनलाइन पोर्टलवर हलवण्याचा प्रस्ताव आहे. अर्ज सादर केल्यानंतर तत्काळ प्रमाणपत्र देण्याऐवजी ३० दिवसांचा अनिवार्य प्रतीक्षा कालावधी ठेवण्यात येणार आहे. या कालावधीनंतरच नोंदणी प्रमाणपत्र जारी केले जाईल.


सरकारने या प्रस्तावावर नागरिकांकडून सूचना आणि हरकती मागवण्यासाठी ३० दिवसांची मुदत दिली आहे. या बदलांमुळे प्रक्रिया अधिक पारदर्शक होणार आहे.

Comments
Add Comment

इंडिया AI इम्पॅक्ट समिट २०२६ मध्ये 'कुंभदूत' एजेंटिक AI संकल्पनेचे सादरीकरण

सिंहस्थ २०२७ पूर्वी टप्प्याटप्प्याने तंत्रज्ञानाचा उपयोग नवी दिल्ली / नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

VIRAL VIDEO : सावधान! देवभूमीचा ट्रिप प्लॅन करताय? हा थरारक व्हिडिओ पाहून तुमचेही पाय लटपटतील!

देहराडून : उत्तराखंडमधील प्रसिद्ध सिद्धपीठ माता धारी देवी मंदिराजवळ नदीपात्रात दोन बोटींची समोरासमोर भीषण धडक

India AI Impact Summit 2026 : एआय समिटमध्ये महाराष्ट्राचा डंका! कृषी विकासासाठी 'महाॲग्री एआय' ठरणार गेमचेंजर - मुख्यमंत्री फडणवीस

नवी दिल्ली : कृषी क्षेत्रात आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या सहाय्याने अन्न सुरक्षितता, वातावरणातील बदलाला सामोरे

Nitesh Rane : नवी दिल्लीतील ‘इंडिया एआय इम्पॅक्ट समिट’मध्ये मंत्री नितेश राणे यांचा सहभाग

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील 'डिजिटल इंडिया'ला आता कृत्रिम बुद्धिमत्तेची (एआय) जोड देऊन

AI Authenticity Label : एआय-निर्मित डिजिटल कंटेंटसाठी ‘ऑथेंटिसिटी लेबल’ आजपासून अनिवार्य

केंद्र सरकारने एआयच्या मदतीने तयार होणाऱ्या डिजिटल कंटेंटबाबत कडक मार्गदर्शक तत्त्वे लागू केली आहेत. १०

Patna High Court: बिहार विधानसभा अध्यक्षांसह ४२ आमदारांना हायकोर्टाची नोटीस

- निवडणूक प्रतिज्ञापत्रांमध्ये खोटी माहिती दिल्याचा आरोप बिहारच्या राजकारणात एक मोठी कायदेशीर घडामोड समोर आली