आता गुपचूप लग्न शक्य नाही? गुजरातमध्ये विवाह नोंदणीसाठी नवा प्रस्ताव

अहमदाबाद : गुजरातमध्ये विवाहाच्या नोंदणीत काही बदल करण्यात आले आहेत. सध्याच्या नियमांनुसार, विवाहाची नोंदणी करण्यापूर्वी संबंधित जोडप्याने आपल्या आई-वडिलांना माहिती दिली असल्याची नोंद करणे अनिवार्य ठरणार आहे. या निर्णयामुळे कुटुंबीयांच्या नकळत लग्न करण्याच्या घटनांवर आळा बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


गुजरात सरकारने विवाह नोंदणी कायद्यात दुरुस्तीचा प्रस्ताव सादर केला आहे. विशेषतः नियम ४४ मध्ये बदल सुचवण्यात आला असून, हा बदल जनहिताचा असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले आहे. प्रस्तावानुसार विवाह नोंदणी अर्ज करताना आई-वडिलांची सविस्तर माहिती देणे आवश्यक राहील.



पालकांना अधिकृत सूचना


नव्या प्रक्रियेनुसार, अर्जदार जोडप्याला एक औपचारिक घोषणापत्र सादर करावे लागेल. त्यामध्ये पालकांना विवाहाबाबत माहिती दिल्याचा स्पष्ट उल्लेख करणे आवश्यक असेल. त्याचबरोबर आई-वडिलांचे ओळखपत्र, कायमचा पत्ता आणि मोबाईल क्रमांक नमूद करावा लागेल. कागदपत्रांची पडताळणी पूर्ण झाल्यानंतर सहाय्यक निबंधकांकडून संबंधित पालकांना दहा कामकाजाच्या दिवसांत इलेक्ट्रॉनिक किंवा लेखी स्वरूपात सूचना पाठवली जाणार आहे.



ऑनलाइन प्रणाली आणि प्रतीक्षा कालावधी


विवाह नोंदणीची संपूर्ण प्रक्रिया राज्याच्या केंद्रीकृत ऑनलाइन पोर्टलवर हलवण्याचा प्रस्ताव आहे. अर्ज सादर केल्यानंतर तत्काळ प्रमाणपत्र देण्याऐवजी ३० दिवसांचा अनिवार्य प्रतीक्षा कालावधी ठेवण्यात येणार आहे. या कालावधीनंतरच नोंदणी प्रमाणपत्र जारी केले जाईल.


सरकारने या प्रस्तावावर नागरिकांकडून सूचना आणि हरकती मागवण्यासाठी ३० दिवसांची मुदत दिली आहे. या बदलांमुळे प्रक्रिया अधिक पारदर्शक होणार आहे.

Comments
Add Comment

भारताच्या जहाजांना धोका नाही

इराणकडून मैत्रीचा हात पुढे नवी दिल्ली : पश्चिम आशियात इराण-इस्रायल तणावामुळे जागतिक सागरी व्यापार धोक्यात आला

इराण युद्धामुळे भरपूर नफा ?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा नवी दिल्ली  : ज्या देशांमध्ये युद्ध होते, त्यांचे अतोनात

प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा २२ वा हप्ता वितरित

मुंबई: सरकार शेतकऱ्यांच्या कल्याणाला सर्वोच्च प्राधान्य देत असून किसान सन्मान निधी योजना शेतकऱ्यांना आर्थिक

गॅस सिलिंडरच्या मागणीत २० ते २२ लाखांनी वाढ

नवी दिल्ली : गॅस तुटवड्यामुळे केवळ व्यावसायिकच नव्हे, तर त्यावर अवलंबून असणारे शेकडो कामगार आणि स्थानिक

मासिक पाळी रजा अनिवार्य करण्यास नकार, सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने मासिक पाळी रजा अनिवार्य करण्याची मागणी करणारी जनहित याचिका फेटाळून लावली आहे.

कुंभमेळ्यातील व्हायरल गर्ल मोनालिसा आणि फरमान यांच्या लग्नावर वडिलांचा गंभीर आरोप; त्यांनी माझ्या डोळ्यासमोर...

मुंबई: कुंभमेळ्यातील व्हायरल गर्ल मोनालिसा भोसले सध्या तिच्या आंतरधर्मीय लग्नामुळे चर्चेत आहे. मल्याळम