राज्यसभेच्या निवडणुकांची तारीख जाहीर झाली आहे. येत्या १६ मार्च रोजी ही निवडणूक लढवली जाणार आहे. त्यामुळे सध्या राजकीय वर्तुळात हालचालींना वेग आला आहे.
राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या जागांसाठी निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. एप्रिल २०२६ मध्ये सदस्यांचा कार्यकाळ संपत असल्याने राज्यसभेसाठी निवडणूक होणार आहे. देशभरातील विविध राज्यांतील जागांसाठी मतदान होणार असून त्यामध्ये महाराष्ट्रातून सर्वाधिक ७ जागांसाठी निवडणूक होणार आहे. महाराष्ट्रातील ७ जागांसाठी होणारी ही निवडणूक राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जात आहे. विधानसभेतील पक्षीय संख्याबळाच्या पार्श्वभूमीवर कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
विधानसभेतील संख्याबळ लक्षात घेत महायुतिचे ६ तर महाविकास आघाडीचा १ उमेदवार राज्यसभेवर निवडला जाऊ शकतो.
कुणाचे किती संख्याबळ?
भाजप - १३१
शिवसेना - ५७
राष्ट्रवादी (अजित पवार) - ४०
उबाठा - २०
काँग्रेस - १६
राष्ट्रवादी (शरद पवार) - १०
अपक्ष आणि इतर - १२
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राहुरीचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे विधानसभेतील २ जागा रिक्त आहेत.
मतांचे गणित कसे असेल?
राज्यसभेवर निवडून जाण्यासाठी पहिल्या पसंतीच्या ३७ मतांची गरज आहे. पक्षीय बलानुसार भाजपचे ४, शिंदेसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचा प्रत्येकी १, महविकास आघाडीचा १ उमेदवार निवडून जाऊ शकतो.
महाराष्ट्रातून एनडीएचे निवडणूक कार्यक्रम:
अधिसूचना : २६ फेब्रुवारी
उमेदवारी अर्ज अंतिम मुदत : ५ मार्च
उमेदवारी अर्जाची छाननी : ६ मार्च
अर्ज माघारीची मुदत : ९ मार्च
मतदान : १६ मार्च (स. ९ ते संध्या. ४)
मतमोजणी : १६ मार्च (संध्या. ५ पासून)







