नवी दिल्ली : तिहारमधून बाहेर आल्यानंतर अभिनेता राजपाल यादव तातडीने उत्तर प्रदेशमधील शाहजहांपूर येथे त्याच्या भाचीच्या लग्नाला उपस्थित राहण्यासाठी रवाना झाला. त्याने एक इन्स्टा पोस्ट करून सर्वांचे आभार मानले आहेत.
कोट्यवधी रुपयांच्या कर्जाच्या विळख्यात अडकलेल्या बॉलिवूड अभिनेता राजपाल यादवने कर्जाची थोडी रक्कम परत करण्यासाठी दिलेला चेक बाऊन्स झाला. या प्रकरणात न्यायालयाने आदेश दिल्यानंतर शरण आलेला आणि तिहार तुरुंगात शिक्षा भोगत असलेला राजपाल अखेर जामीन मिळवून तुरुंगाबाहेर आला आहे. न्यायालयाने राजपाल यादवला १८ मार्च २०२६ पर्यंत सशर्त जामीन दिला आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने राजपाल यादवला ९ कोटी रुपयांच्या कर्जाच्या प्रकरणात हंगामी जामीन दिला आहे. जामीन मिळताच राजपालने न्यायालयाचे आभार मानले. कायदा पाळेन आणि न्यायालयाने घातलेल्या सर्व अटींचे तंतोतंत पालन करेन अशी ग्वाही त्याने न्यायालयात दिली. यानंतर काही तासांनी राजपाल तुरुंगाबाहेर आला.
खटला उच्च न्यायालयात सुरू आहे. वकील भास्कर उपाध्याय माझ्यावतीने युक्तिवाद करत आहेत. मी त्यांच्या सल्ल्याने लवकरच पत्रकार परिषद घेऊन माझी बाजू जनतेसमोर मांडेन, असे राजपालने सांगितले. चाहते आणि बॉलिवूडमधील अनेक सहकाऱ्यांनी दिलेल्या पाठिंब्यासाठी त्याने सर्वांचे जाहीर आभार मानले.
View this post on Instagram







