सलग तीन शून्यांनंतर गावस्कर यांचा अभिषेकला सल्ला

मुंबई : टी-२० विश्वचषकाच्या साखळी फेरीत सलग तीन सामन्यांत शून्यावर बाद होणाऱ्या भारतीय सलामीवीर अभिषेक शर्माला महान फलंदाज सुनील गावस्कर यांनी कानमंत्र दिला आहे. "सुरुवातीच्या षटकांत आडवे फटके खेळण्याचा मोह टाळा आणि मैदानावर थोडा वेळ टिकण्याचा प्रयत्न करा," असा सल्ला गावस्कर यांनी अभिषेकला दिला आहे.


जगातील पहिल्या क्रमांकाचा टी-२० फलंदाज असलेल्या अभिषेक शर्मासाठी चालू विश्वचषक आतापर्यंत अत्यंत निराशाजनक राहिला आहे. पाकिस्तान, अमेरिका आणि नेदरलँड्स विरुद्धच्या सामन्यात तो सलग तीन वेळा 'डक' (शून्य धावा) होऊन तंबूत परतला. त्याच्या या फॉर्ममुळे भारताच्या सलामीच्या जोडीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असतानाच गावस्कर यांनी त्याला तांत्रिक सुधारणेचा मार्ग दाखवला आहे.


अभिषेकच्या फलंदाजीवर भाष्य करताना सुनील गावस्कर म्हणाले की, "अभिषेककडे फटक्यांची मोठी श्रेणी आहे, पण त्याला आपली नैसर्गिक आक्रमकता आणि संयम यांचा ताळमेळ बसवावा लागेल. प्रत्येक चेंडूवर मोठा फटका मारण्याची घाई करू नकोस. सुरुवातीला सरळ रेषेत खेळा आणि 'क्रॉस' फटके मारून स्वतःची विकेट बहाल करू नका." "मोठे षटकार मारण्याच्या नादात एकेरी धाव घेण्याकडे दुर्लक्ष करू नका. एकदा पाय मैदानात स्थिरावले की मोठी धावसंख्या उभारणे सोपे होईल," असे गावस्कर म्हणाले. जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असण्याचे दडपण न घेता मूलभूत क्रिकेट खेळण्यावर भर देण्याचा सल्ला त्यांनी दिला.


सुपर-८ मध्ये पुनरागमनाची आशा


भारताचा पुढचा सामना २२ फेब्रुवारी रोजी अहमदाबाद येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे. सुपर-८ च्या या महत्त्वाच्या सामन्यात अभिषेक शर्मा 'लिटिल मास्टर'चा हा सल्ला अंमलात आणून आपल्या फॉर्ममध्ये परतणार का, याकडे सर्व क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment

अफगाणिस्तानचा कॅनडाविरुद्धच्या सामन्यात मोठा विजय

चेन्नई : इब्राहिम झद्रानच्या वादळी फलंदाजीनंतर मोहम्मद नबीने केलेल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर अफगाणिस्तानने

झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियानंतर श्रीलंकेचेही उडवली दाणादाण

कोलंबो : आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकप स्पर्धेत झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियानंतर श्रीलंकेचेही दाणादाण उडवली.

वेस्ट इंडिजची विजयी घोडदौड कायम, इटलीवर विजय

कोलकाता : आयसीसी टी-२० विश्वचषकाच्या साखळी फेरीत वेस्ट इंडिजने आपला दबदबा कायम राखत इटलीचा ४२ धावांनी पराभव केला.

T20 World Cup 2026: जाणून घ्या भारताच्या सुपर ८ सामन्यांचे वेळापत्रक; कोणत्या संघासोबत कधी होणार मुकाबला

मुंबई: आयसीसीच्या टी-२० विश्वचषकात टीम इंडियाची विजयी घोडदौड सुरूच आहे. सलग चार विजयांसह, भारताने सुपर ८ मध्ये

अहमदाबादमध्ये भारताचा विजयी चौकार

शिवमचा झंझावात आणि चक्रवर्तीची फिरकी नेदरलँड्सवर १७ धावांनी मात अहमदाबाद  : अहमदाबादच्या मैदानावर भारतीय

शिवम दुबेचे अर्धशतक, भारताने नेदरलँडला दिले एवढे मोठे आव्हान

अहमदाबाद : आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकपच्या सुपर ८ फेरीसाठी पात्र ठरलेला भारत निव्वळ औपचारिकता म्हणून