मुंबई : राज्याच्या राजकारणातील दोन महत्त्वाचे नेते, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात आज 'नंदनवन' निवासस्थानी झालेली भेट राजकीय वर्तुळात चर्चेचा मोठा विषय ठरली आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर या दोन्ही नेत्यांमधील ही पहिलीच भेट असल्याने या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन्ही बंधू एकत्र येऊनही मनसेला केवळ ६ जागांवर समाधान मानावे लागले. निवडणुकीत ठाकरे गटाकडून अपेक्षित सहकार्य मिळाले नसल्याची खंत मनसे पदाधिकाऱ्यांनी बोलून दाखवली होती. या पार्श्वभूमीवर, राज ठाकरे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी स्वतंत्र तयारी सुरू करण्याचे आदेश कार्यकर्त्यांना दिले आहेत. अशा परिस्थितीत शिंदेंची भेट घेणे, हे नव्या राजकीय समीकरणांचे संकेत मानले जात आहेत.
अर्धा तास चर्चा, अनेक तर्क-वितर्क
सुमारे पाऊण तास चाललेल्या या बैठकीत मुंबईतील बदललेले राजकीय बलाबल आणि भविष्यातील रणनीतीवर सविस्तर चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. जरी ही भेट अधिकृतरीत्या 'सदिच्छा भेट' म्हणून सांगण्यात येत







