T20 World Cup 2026 IND vs PAK: पाकिस्तान विरोधात भारताचा विजय; सोशल मीडियावर पाकिस्तानची नाचक्की

मुंबई: आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकप २०२६ मध्ये पाकिस्तान विरूद्धचा साखळी सामना भारताने ६१ धावांनी जिंकला. या विजयामुळे अ गटातून पुढील फेरीसाठी (सुपर एट) भारत पात्र झाला आहे. भारताने अमेरिका, नामिबिया आणि पाकिस्तान या तिन्ही संघांविरूद्धचे साखळी सामने जिंकले. आता भारताचा बुधवार १८ फेब्रुवारी रोजी नेदरलँड विरुद्ध साखळी सामना आहे. पण या सामन्याआधीच भारत सुपर एट फेरीसाठी पात्र झाला आहे.


प्रेमदासा स्टेडियम येथे झालेल्या सामन्यात नाणेफेक जिंकून पाकिस्तानने गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या भारताने २० षटकांत सात बाद १७५ धावा केल्या. धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या पाकिस्तानचा डाव १८ षटकांत ११४ धावांवर आटोपला. पाकिस्तान विरूद्धच्या सामन्यात ४० चेंडूत ३ षटकार आणि १० चौकार मारत ७७ धावा करणारा ईशान किशन सामनावीर झाला. त्याने यंदाच्या वर्ल्डकपमधील सलग दुसरे अर्धशतक केले. याआधी ईशानने नामिबिया विरूद्धच्या सामन्यात ६१ धावांचे योगदान दिले होते.


सोशल मीडियावर या सामन्यानंतर पाकिस्तानची खिल्ली उडवणारे बरेच मीम्स व्हायरल झाले. खासकरुन बाबर आझमला टार्गेट करण्यात आलं. बाबर आझम पाकिस्तानचा महत्वाचा खेळाडू आहे. अनुभवी आहे. त्याच्याकडून टीमला बऱ्याच अपेक्षा होत्या. पण पाकिस्तानचा संघ संकटात असताना तो स्वस्तात बाद होऊन तंबूत परतला. त्यामुळे खासकरुन बाबर आझमला इंटरनेटवर लक्ष्य करण्यात आलं. संपूर्ण सामन्यात पाकिस्तानच्या खेळात कुठे समन्वयच दिसला नाही. गोलंदाजी असो वा फलंदाजी प्लानिंगचा अभाव स्पष्ट दिसत होता. कुठला बॅकअप प्लानच दिसत नव्हता.











वर्ल्ड कपमध्ये एखाद-दुसरा अपवाद वगळता भारतीय टीमने नेहमीच पाकिस्तानला हरवलं आहे. टीम इंडियासमोर पाकिस्तानचा डाव नेहमीच ढेपाळतो. कालच्या सामन्यातही हेच घडलं. पाकिस्तानची घसरण पहिल्या ओव्हरपासून सुरु झाली. हार्दिक पंड्याने साहीबझादा फरहानला शुन्यावर आऊट केलं. बुमराहच्या गोलंदाजीवर सॅम अयूबचा नशिबाने टॉप एज लागून एक सिक्स गेला. त्यानंतर परफेक्ट यॉर्करवर अयबूने तंबूची वाट धरली. या मॅचनंतर पोट धरुन हसवणारे मीम्स व्हायरल झाले आहेत.

Comments
Add Comment

Suryakumar Yadav Ind vs Pak : सूर्याचा 'नादखुळा' अंदाज! पाकिस्तानला धूळ चारल्यावर ३ शब्दांत दिला विजयाचा मंत्र; काय लिहिलंय नेमकं?

कोलंबो : टी-२० विश्वचषक २०२६ च्या हाय-व्होल्टेज सामन्यात भारताने पाकिस्तानचा ६१ धावांनी दारूण पराभव करत क्रिकेट

T20 World Cup 2026 IND vs PAK: हार्दिक पांड्या अन् कुलदीप यादवमध्ये राडा ? १८ व्या ओव्हरमध्ये नेमकं काय घडलं ?

मुंबई: आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकप २०२६ मध्ये पाकिस्तान विरूद्धचा साखळी सामना भारताने ६१ धावांनी जिंकला.

Shoaib Akhtar On IND VS PAK Match: 'भारतीय संघ विश्वचषक जिंकण्यासाठी आला होता', पाकिस्तानच्या पराभवानंतर शोएब अख्तर प्रतिक्रिया समोर, पाकिस्तानला काय म्हणाला?

मुंबई: भारतीय संघाने पुन्हा एकदा रविवारीच्या इतिहासाची पुनरावृत्ती केली, पाकिस्तानचा दणदणीत पराभव केला. टी-२०

IND vs PAK : पाकिस्तानचा पराभव होताच मोहसीन नक्वी मागच्या दाराने पळाला

मुंबई: श्रीलंकेच्या आर प्रेमदासा स्टेडिअमवर भारताने पाकिस्तानचा ६१ धावांनी पराभव केला आहे. भारताने

पाकिस्तान विरोधात भारताचा विजय, सुपर 8 मध्ये दिमाखात एन्ट्री

कोलंबो : आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकप २०२६ मध्ये पाकिस्तान विरूद्धचा साखळी सामना भारताने ६१ धावांनी जिंकला.

ईशान, सूर्या, शिवम, तिलक, रिंकूमुळे भारताने पाकिस्तानपुढे ठेवले मोठे लक्ष्य

कोलंबो : आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकप २०२६ मध्ये पाकिस्तान विरूद्धच्या सामन्यात भारताने ईशान, सूर्या, शिवम,